शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

Food: हिवाळ्यातल्या सुकलेल्या फळांचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 14:35 IST

Food:

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकारहिवाळा हा ऋतू जसे आल्हाददायक वातावरण घेऊन येतो तसेच खाण्यापिण्याची चंगळ करतो. बाजारात ताज्या भाज्या, कंदमुळे, फळफळावळ याचबरोबर सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. भारतातल्या कोणत्याही प्रांतात जा, हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त आणि त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी सुकामेवा आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनतात. हजारो वर्षांपासून जगभरातल्या लोकांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम सुकामेवा करतो आहे. असे म्हणतात की, झाडावरून खाली पडून वाळलेली फळे रुचकर लागतात आणि ऊर्जाही देतात याची जाणीव आदिमानवालाही झाली होती. 

मेसोपोटेमिया, ग्रीक, रोमन, भारतीय अशा अनेक प्राचीन नागर संस्कृतींमध्ये आहारात वाळवलेल्या फळांचा आणि फळांच्या बियांचा समावेश होता. सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वी आजच्या आखाती देशांच्या प्रदेशात खजुराच्या झाडांची लागवड सुरू झाली. खजुराला मोठ्या प्रमाणात फळ धरते. त्यामुळे खजुराचे उत्पादन वाढवून त्यापासून अनेक पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. अनेकदा इतर फळे सुकवताना ती खजुराबरोबर सुकवली तर खजुरातली साखर त्यांच्यात उतरते हे लक्षात आले आणि तशा पद्धतीने फळे सुकवण्यास सुरुवात झाली. अंजिराचा उपयोग तर खूप आधीपासून होत होता. अंजीर हे गरिबांचे शक्तिवर्धक खाद्य म्हणून प्रसिध्द होते. ग्रीक गुलाम आपली शक्ती टिकवून ठेवण्यासाठी अंजीर खात. 

सुक्यामेव्यात वाळवलेल्या पदार्थांबरोबरच फळांच्या बियांचाही समावेश होतो. इराणमध्ये सुरुवात झालेला बदाम आज जगभरात सगळ्यात जास्त लोकप्रिय सुकामेवा आहे. अमेरिका, इराण, तुर्कस्थान, मोरोक्को वगैरे देशांत बदामाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, तर ब्राझीलमध्ये जन्मलेल्या काजूची लागवड करणाऱ्या देशांमध्ये भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. हजारो वर्षांपूर्वी माणसाने सुकामेव्यातल्या घटकांचा शोध घेऊन कशात ओमेगा थ्री जास्त आहे, कोणत्या मेव्यात प्रोटीन जास्त आहे याचा शोध घेतला नव्हता, पण हे पदार्थ खाल्ल्याचे फायदे मात्र नोंदवून ठेवले, पुढच्या पिढीला सांगितले आणि त्याची लागवड, वापर सुरूच राहिला. पूर्वजांच्या हुशारीमुळे आजही हा मेवा आपल्याला उपलब्ध आहे. त्याचे योग्य सेवन ऋुतूनुसार केले तर नक्कीच फायद्याचे ठरेल. (bhalwankarb@gmail.com)

टॅग्स :foodअन्न