शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

Food: हिवाळ्यातल्या सुकलेल्या फळांचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 14:35 IST

Food:

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकारहिवाळा हा ऋतू जसे आल्हाददायक वातावरण घेऊन येतो तसेच खाण्यापिण्याची चंगळ करतो. बाजारात ताज्या भाज्या, कंदमुळे, फळफळावळ याचबरोबर सुक्यामेव्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. भारतातल्या कोणत्याही प्रांतात जा, हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त आणि त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी सुकामेवा आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनतात. हजारो वर्षांपासून जगभरातल्या लोकांना तंदुरुस्त ठेवण्याचे काम सुकामेवा करतो आहे. असे म्हणतात की, झाडावरून खाली पडून वाळलेली फळे रुचकर लागतात आणि ऊर्जाही देतात याची जाणीव आदिमानवालाही झाली होती. 

मेसोपोटेमिया, ग्रीक, रोमन, भारतीय अशा अनेक प्राचीन नागर संस्कृतींमध्ये आहारात वाळवलेल्या फळांचा आणि फळांच्या बियांचा समावेश होता. सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वी आजच्या आखाती देशांच्या प्रदेशात खजुराच्या झाडांची लागवड सुरू झाली. खजुराला मोठ्या प्रमाणात फळ धरते. त्यामुळे खजुराचे उत्पादन वाढवून त्यापासून अनेक पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. अनेकदा इतर फळे सुकवताना ती खजुराबरोबर सुकवली तर खजुरातली साखर त्यांच्यात उतरते हे लक्षात आले आणि तशा पद्धतीने फळे सुकवण्यास सुरुवात झाली. अंजिराचा उपयोग तर खूप आधीपासून होत होता. अंजीर हे गरिबांचे शक्तिवर्धक खाद्य म्हणून प्रसिध्द होते. ग्रीक गुलाम आपली शक्ती टिकवून ठेवण्यासाठी अंजीर खात. 

सुक्यामेव्यात वाळवलेल्या पदार्थांबरोबरच फळांच्या बियांचाही समावेश होतो. इराणमध्ये सुरुवात झालेला बदाम आज जगभरात सगळ्यात जास्त लोकप्रिय सुकामेवा आहे. अमेरिका, इराण, तुर्कस्थान, मोरोक्को वगैरे देशांत बदामाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते, तर ब्राझीलमध्ये जन्मलेल्या काजूची लागवड करणाऱ्या देशांमध्ये भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. हजारो वर्षांपूर्वी माणसाने सुकामेव्यातल्या घटकांचा शोध घेऊन कशात ओमेगा थ्री जास्त आहे, कोणत्या मेव्यात प्रोटीन जास्त आहे याचा शोध घेतला नव्हता, पण हे पदार्थ खाल्ल्याचे फायदे मात्र नोंदवून ठेवले, पुढच्या पिढीला सांगितले आणि त्याची लागवड, वापर सुरूच राहिला. पूर्वजांच्या हुशारीमुळे आजही हा मेवा आपल्याला उपलब्ध आहे. त्याचे योग्य सेवन ऋुतूनुसार केले तर नक्कीच फायद्याचे ठरेल. (bhalwankarb@gmail.com)

टॅग्स :foodअन्न