शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:08 IST

जास्तीत जास्त वेळ बैठं काम केल्यामुळे लोकांना पोट वाढण्याच्या समस्येचा किंवा वजन वाढण्याच्या समस्येचा त्रास होऊ लागतो. काही लोकं तर दररोज जिम करण्यासोबतच प्रॉपर एक्सरसाइजही करतात पण तरिही त्यांचं वजन कमी होत नाही.

जास्तीत जास्त वेळ बैठं काम केल्यामुळे लोकांना पोट वाढण्याच्या समस्येचा किंवा वजन वाढण्याच्या समस्येचा त्रास होऊ लागतो. काही लोकं तर दररोज जिम करण्यासोबतच प्रॉपर एक्सरसाइजही करतात पण तरिही त्यांचं वजन कमी होत नाही. याचं कारण म्हणजे तुमचा आहार. तुमच्या आहारात समाविष्ट असणाऱ्या पदार्थांमुळे तुम्हाला वजन वाढीच्या समस्या सतावतात. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा बनून उभ्या आहेत. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर चुकूनही या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू नका. 

1. बटाटा आणि मटण

सर्वसामान्य लोकांच्या आहारामध्ये बटाट्याचा समावेश होतो. स्वयंपाक घरांमध्येही बटाटा सहज आढळून येतो. परंतु बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. त्यामुळे बटाटा खाल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश करू नये. याव्यतिरिक्त मटण, अंड, खेकडे, प्रॉन्स यांसारख्या पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे या पदार्थांचेही सेवन करणे टाळावे. 2. मैदा

आपण बऱ्याचदा भूक भागवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जंक फूडचा आधार घेतो. त्यामध्ये मैदाचं प्रमाण अधिक असतं. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर आणि पॅटीस तसेच मॅगी यांसारख्या गोष्टींमध्ये मैद्याचं प्रमाण अधिक असतं. मैद्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मधुमेह आणि कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका संभवतो. 

3. मद्यपान

सतत मद्य सेवन केल्याने अन्ननलिका आणि गळ्यामध्ये जळजळ होते. त्यामुळे शरीरामध्ये सूज आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. तसेच दारूमुळे लिव्हरला सूज येते. त्यामुळे दारू पिणं शक्यतो टाळावं.

4. सोडा किंवा कोल्ड्रिंक्स

कोल्ड्रिंक्समध्ये सर्वात जास्त साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे जास्त कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी हानिकारक असून लठ्ठपणा होतो. कोल्ड्रिंक्समध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असून त्याच्या जास्त सेवनाने मधुमेह होण्याचा धोका संभवतो. 

5. तांदूळ

भारतामध्ये मुख्यतः तांदळाचा वापर फार करण्यात येतो. परंतु तांदळामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन वाढते. त्यासाठी तांदूळ उकडल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या आणि मगच खा.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य