शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

वजन कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:08 IST

जास्तीत जास्त वेळ बैठं काम केल्यामुळे लोकांना पोट वाढण्याच्या समस्येचा किंवा वजन वाढण्याच्या समस्येचा त्रास होऊ लागतो. काही लोकं तर दररोज जिम करण्यासोबतच प्रॉपर एक्सरसाइजही करतात पण तरिही त्यांचं वजन कमी होत नाही.

जास्तीत जास्त वेळ बैठं काम केल्यामुळे लोकांना पोट वाढण्याच्या समस्येचा किंवा वजन वाढण्याच्या समस्येचा त्रास होऊ लागतो. काही लोकं तर दररोज जिम करण्यासोबतच प्रॉपर एक्सरसाइजही करतात पण तरिही त्यांचं वजन कमी होत नाही. याचं कारण म्हणजे तुमचा आहार. तुमच्या आहारात समाविष्ट असणाऱ्या पदार्थांमुळे तुम्हाला वजन वाढीच्या समस्या सतावतात. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा बनून उभ्या आहेत. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर चुकूनही या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू नका. 

1. बटाटा आणि मटण

सर्वसामान्य लोकांच्या आहारामध्ये बटाट्याचा समावेश होतो. स्वयंपाक घरांमध्येही बटाटा सहज आढळून येतो. परंतु बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. त्यामुळे बटाटा खाल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश करू नये. याव्यतिरिक्त मटण, अंड, खेकडे, प्रॉन्स यांसारख्या पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे या पदार्थांचेही सेवन करणे टाळावे. 2. मैदा

आपण बऱ्याचदा भूक भागवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जंक फूडचा आधार घेतो. त्यामध्ये मैदाचं प्रमाण अधिक असतं. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर आणि पॅटीस तसेच मॅगी यांसारख्या गोष्टींमध्ये मैद्याचं प्रमाण अधिक असतं. मैद्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मधुमेह आणि कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका संभवतो. 

3. मद्यपान

सतत मद्य सेवन केल्याने अन्ननलिका आणि गळ्यामध्ये जळजळ होते. त्यामुळे शरीरामध्ये सूज आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. तसेच दारूमुळे लिव्हरला सूज येते. त्यामुळे दारू पिणं शक्यतो टाळावं.

4. सोडा किंवा कोल्ड्रिंक्स

कोल्ड्रिंक्समध्ये सर्वात जास्त साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे जास्त कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी हानिकारक असून लठ्ठपणा होतो. कोल्ड्रिंक्समध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असून त्याच्या जास्त सेवनाने मधुमेह होण्याचा धोका संभवतो. 

5. तांदूळ

भारतामध्ये मुख्यतः तांदळाचा वापर फार करण्यात येतो. परंतु तांदळामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन वाढते. त्यासाठी तांदूळ उकडल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या आणि मगच खा.

टॅग्स :foodअन्नHealthआरोग्य