शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

साखरेपेक्षा गुळाचा आहारात समावेश केल्याने होणारे फायदे वाचून आजच साखर खाणं सोडाल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 18:45 IST

आपण आहारात कोणतेही गोड पदार्थ खातो तेव्हा त्यात हमखास साखरेचा वापर केलेला दिसून येतो.

आपण आहारात कोणतेही गोड पदार्थ खातो तेव्हा त्यात हमखास साखरेचा वापर केलेला दिसून येतो. काही पदार्थात गुळाचा वापर केला जातो. पण साखरेच्या तुलनेत गुळाचे अनेक फायदे आहेत. आहारातून जर साखर वगळून आपण गुळाचा समावेश केला तर होत असलेल्या आजारांपासून सुटका मिळवता येईल. सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे  गुळाचं सेवन केल्याने एन्ड्रोफिन्स हा हॅपी हार्मोन जनरेट होत असतो.  त्यामुळे आनंदी राहण्यासाठी आणि मुड चांगला ठेवण्यासाठी गुळाचा आहारात समावेश असाव. साखरेच्या सेवनाच्या तुलनेने अनेक फायदे याचं सेवन केल्यामुळे शरीराला होत असतात. 

भारतात ऊसापासून तयार केले जाणारे गुळ आणि साखर हे पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. गुळापासून तयार करण्यात येणारे पदार्थ खाल्यामुळे शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित राहते. जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.

पोटासंबंधी विकार दूर होतात

पोटासंबंधीच्या अनेक आजारांत गुळ खूप फायद्याचा ठरतो. गुळ खाल्ल्यामुळे मुळे आपले पचन तंत्र सुधारते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते. डॉक्टर गर्भवती स्त्रियांना देखील गुळ खाण्याचा सल्ला देतात. कारण अनेकदा त्यांना पोट साफ होण्यास त्रासाचा सामना करावा लागतो.

वजन कमी करण्यासाठी 

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं सेवन न करता  वजन कमी करण्यासाठी गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

दम्याच्या त्रासापासून सुटका

थंडीमध्ये दम्याच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरात उष्णता कायम राहावी व कफ बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.  ( हे पण वाचा-पोट साफ होण्यासाठी फायदेशीर चणे आणि गुळ, इतर फायदे वाचून  व्हाल अवाक्)

मधूमेहासाठी फायदेशीर

मधुमेहावर गुणकारी गूळ- गूळ साखरेच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते. ( हे पण वाचा-मशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरी मशरूम खाल...)

मासिकपाळीचा त्रास कमी होतो

मासिकपाळी दरम्यान अनेकांना पोटदुखीच्या त्रासाने ग्रस्त असतात. ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गुळ खाल्ल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो. तसंच गुळाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासत नाही. तसंच एनिमियामुळे त्रासलेल्यांसाठी गूळ खूप फायदेशीर आहे.

टॅग्स :foodअन्न