शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

जवसाचं पाणी वजन कमी करण्यासाठी आणि ब्लडप्रेशरसाठी ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 10:33 IST

दिवसेंदिवस बदलत जाणारे वातावरण तसंच धकाधकीचे आयुष्य आणि जीवन जगण्याची पध्दत यांच्यात ताळमेळ न राहिल्याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो.

दिवसेंदिवस बदलत जाणारे वातावरण तसंच धकाधकीचे आयुष्य आणि जीवन जगण्याची पध्दत यांच्यात ताळमेळ न राहिल्याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. तसंच यामुळे आयुष्यावर नकारात्मक परीणाम होत असतो. जेव्हा लहान मोठ्या आरोग्याच्या कुरबूरी सुरू असतात तेव्हा प्रत्येकवेळी दवाखान्यात जाणं शक्य नसतं.  खाण्यापिण्याच्या अनियमितेमुळे वजन वाढत जातं. आणि एकदा वजन वाढलं तर ते कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. 

अनेकदा कामामुळे व्यायाम  करण्यासाठी वेळ मिळत नाही तसंच डाएट  करण्यासाठी योग्य आहार सुध्दा घेतला जात नाही. अशावेळी वजन कमी करण्याच्या आणि आजारांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. तुम्हाला सुध्दा हीच समस्या जाणवत असेल तर अत्यंत कमी पैशात उपलब्ध असलेल्या आणि घरगुती वापरातील एका पदार्थांचा वापर करून तुम्ही आपलं आरोग्य व्यवस्थीत ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया  जवस या पदार्थाचा वापर करून कशाप्रकारे तुम्हाला ब्लडप्रेशरची तसंच लठ्ठपणाची समस्या दूर ठेवता येईल.

तुम्हाला माहितही नसेल पण जवस या पदार्थाचा वापर करून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. जवसेचे सेवन केल्यास पोट भरल्याची जाणीव होते. तसंच बराचवेळ भूक लागण्याची जाणीव होत नाही. जवसेचे पाणी पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता. 

 

जवसाचे पाणी कसं तयार करायचं

त्यासाठी  अर्धा लिटर पाणी गरम करा. पाण्याला उकळ आल्यानंतर त्यात अर्धा कप जवस घाला, त्यासोबत त्यात दालचीनीचा एक तुकडा घाला . आणि ३० मिनिटं उकळत ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. या पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यात मध आणि लिंबू घाला. दिवसातून २ वेळा या पाण्याचं सेवन करा.

जवसाच्या पाण्याचे फायदे

या पाण्यामुळे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. हृदयाला रक्तपूरवठा सुरळीत  होतो. 

शरीरातील टॉक्जीन्स काढून टाकण्यास फायदेशीर ठरते.

या पाण्यात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटामीन्स असतात.

आर्यन, मॅन्गनीज यांसारखे शरीराला आवश्यक असणारे घटक असतात.

शरीरातील एक्सट्रा फॅट निघून जाण्यास हे पाणी फायदेशीर ठरतं.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न