तिसऱ्या घटस्फोटानंतर राहुल महाजनने सुरु केली थेरपी, म्हणाला, 'अजूनही प्रेम...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 01:25 PM2023-09-04T13:25:41+5:302023-09-04T13:38:33+5:30

राहुल महाजनने तिसऱ्या घटस्फोटानंतर आपलं दु:ख व्यक्त केलं.

बिग बॉस फेम राहुल महाजन (Rahul Mahajan) नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकतंच त्याचा तिसरा संसारही मोडला आहे. तिसरा घटस्फोट झाल्यानंतर राहुल महाजनने दु:ख व्यक्त केलं आहे.

२०१८ मध्ये कजाकिस्तानी मॉडेल नताल्यासोबत त्याने गुपचूप विवाह केला. ५ वर्षांनंतर त्यांच्यात खटके उडाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला.

राहुल महाजन घटस्फोटानंतर पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. तो म्हणाला,'माझ्या भावनांना आवर घालण्यासाठी मी डॉक्टरांची मदत घेत आहे. थेरपी घेणं म्हणजे आपल्या देशात कलंकच समजला जातो. पण मला अजिबातच लाज वाटत नाही.

माझ्या आयुष्यात जसा काय एक भूकंपच आला आहे. याचे झटके आजही बसत आहेत. माझ्या मनाला मोठा आघात झाला आहे. पण आयुष्य पुढे चालतच राहतं. स्ट्राँग होण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही.

माझ्या मनात अजूनही तिच्याविषयी प्रेम आणि आदर आहे. प्रेम कधीच संपत नाही. मी तिच्या संपर्कात तर नाहीए. ती कुठे आहे हेही मला माहित नाही, पण प्रेम असं सहज संपत नाही.

राहुल आणि नताल्यामध्ये लग्नानंतर मतभेद सुरुच होते. राहुलला मूल हवं होतं यावरुन त्यांच्यात भांडणं झाली असंही बोललं गेलं. पण दोघांनी एकमेकांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता. बरेच प्रयत्न केल्यानंतरही त्यांचं नातं टिकलं नाही आणि ते वेगळे झाले.

तीन घटस्फोटांनंतर राहुलने खुलासा केला की त्याला त्याच्या एकाही बायकोला गुजारा भत्ता द्यावा लागला नाही. कारण आमच्यात परस्पर सहमतीने घटस्फोट झाला.

राहुलचं पहिलं लग्न डिंपी गांगुली सोबत झालं होतं. तर श्वेता सिंह ही त्याची दुसरी पत्नी होती. दोघींनी राहुलवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.