Rakhi Sawant : "जोपर्यंत मला योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करत राहीन", राखीने स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:26 PM2023-12-29T13:26:47+5:302023-12-29T13:52:18+5:30

Rakhi Sawant : राखी पुन्हा एकदा तिच्या नवीन जोडीदाराच्या शोधात आहे. तिला पुन्हा एकदा लग्न करायचंय.

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री राखी सावंतने आपल्या आवडीचा जोडीदार मिळेपर्यंत लग्न करत राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. ड्रामा क्वीन राखी नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.

न्यूज वेबसाईट इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आदिल खानपासून विभक्त झाल्यानंतर राखी पुन्हा एकदा तिच्या नवीन जोडीदाराच्या शोधात आहे. तिला पुन्हा एकदा लग्न करायचंय.

राखी आणि आदिलचा निकाह झाल्याचे अनेक फोटो समोर आले होते. मात्र त्यानंतर राखी सावंतने आदिलवर तिच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा गंभीर आरोप केला होता.

राखी सावंतने कोर्टात अपील केलं आहे की लवकरात लवकर तिला तलाक मिळाला म्हणजे ती दुसऱ्या लग्नाचं प्लॅनिंग करेल. जोपर्यंत तिला योग्य जीवनसाथी मिळत नाही तोपर्यंत ती लग्न करत राहणार असल्याचे तिने सांगितलं.

राखीने आदिलने तिच्याकडून घेतलेले पैसे परत करावेत असं म्हणत कोर्टाकडे दाद मागितली आहे. आदिलने पैशासाठी लग्न केलं, छळ केला तसेच आपली मोठी फसवणूक केल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

'फिल्मज्ञान' शी बोलताना ती म्हणाली, "कोर्ट आदिलकडून माझे पैसे परत मिळवून देईल आणि मी त्याच्यापासून तलाक घेईन, जेणेकरून मी लवकरच एका चांगल्या मुलाशी पुन्हा लग्न करू शकेन आणि नवीन आयुष्य सुरू करू शकेन."

"मी जाहीर करते की जोपर्यंत मला जीवनसाथी मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करत राहीन. जोपर्यंत माझ्याकडे आयुष्य आहे, तोपर्यंत मी नेहमीच प्रेम करेन कारण माझ्याकडे एकच जीवन आहे."

"मृत्यूनंतर दुसरे कोणतेही जीवन नाही. हॉलीवूडमध्ये जा आणि पाहा लोक 10-10 वेळा लग्न करतात. तिथे मुलींना कोणी काही बोलत नाही. सर्व लक्ष्मण रेखा फक्त भारतात आहेत."

अभिनेत्रीने आदिलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आदिलला अनेक दिवस जेलमध्ये राहावं लागलं. जेलमधून बाहेर आल्यानंतर आदिलने देखील राखीवर खूप आरोप केले आहेत.