'विराट-अनुष्काला बाळ झाल्यावर लोकं तैमूरला विसरतील', शर्मिला टागोर यांनीच वर्तवले होते भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:26 PM2020-08-27T18:26:47+5:302020-08-27T18:27:33+5:30

बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला नेहमीच प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतात.

Sharmila Tagore hope that Anushka Sharma and Virat Kohli have a child soon | 'विराट-अनुष्काला बाळ झाल्यावर लोकं तैमूरला विसरतील', शर्मिला टागोर यांनीच वर्तवले होते भाकित

'विराट-अनुष्काला बाळ झाल्यावर लोकं तैमूरला विसरतील', शर्मिला टागोर यांनीच वर्तवले होते भाकित

googlenewsNext

स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. मीडियाच्या नजरा कायम तैमूरवर असतात. इतक्या लहान वयातला तो एक सेलिब्रिटी बनला आहे. याबाबत आई  करिनाने सांगितले होते की, आजचं डिजीटल युग आहे. त्यातच आम्ही कलाकार असल्याने सगळ्यांच्या नजरा तैमूरवर असतात. तरीही तैमूरचे फोटो काढावे असं सगळ्यांना का वाटतं माहिती नाही.

मात्र हरकत नाही. तैमूरला कोणत्याही बाळाप्रमाणे आम्ही वाढवत आहोत. त्याचे फोटो काढले जातील म्हणून त्याला बाहेर जाण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. इतर मुलांसारखं त्यालाही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याला बाहेर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. त्याचं बालपण कुणीच हिरावून घेऊ शकत नाही.  

बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला नेहमीच प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतात. सतत प्रकाशझोतात असण-या तैमूरबाबत आजी म्हणजेच  बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी म्हटलं होते की, 'विराट आणि अनुष्काला मूल होईल तेव्हा लोकं तैमूरला विसरतील. त्यानंतर सगळ्यांच्या नजरा विराट -अनुष्काकडे वळल्या होत्या. अनेक वेळा अनुष्का प्रेग्नंट असल्याच्याही चर्चा व्हायच्या. मात्र शर्मिला टागोर यांनी सहजच बोलले हे वाक्य विराट- अनुष्कासह तंतोतंत लागू ठरला आणि काही महिन्यानंतर या कपलनेही चाहत्यांना गुड न्यूज दिली.

 2013 साली एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा दोघं एकत्र आले. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एकमेकांना ते डेट करु लागले. सुरुवातीपासूनच विराटचं अनुष्कावर जीवापाड प्रेम होतं. अनुष्काबाबत विराट जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळालं. 


अखेर ११ डिसेंबरला  २०१७ विराट-अनुष्का रेशीगाठीत अडकले आणि आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली. लवकरच दोघांच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणार असल्यामुळे सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

Web Title: Sharmila Tagore hope that Anushka Sharma and Virat Kohli have a child soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.