शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

काय सांगता? २०८०पर्यंत कॉफी होणार लूप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 22:24 IST

‘द क्लायमेट इन्स्टिट्यूट’च्या नव्या अहवालानुसार ग्लोबल वार्मिंग जर सध्याच्या वेगाने अशीच वाढत राहिली तर २०८० सालापर्यंत जगातून कॉफीचे अस्तित्व नष्ट होऊन जाईल.

कॉफीचा घोट घेतल्याशिवाय ज्यांची सकाळ होत नाही अशा जगभरातील कॉफीप्रेमींसाठी फार धक्कादायक बातमी आहे. ‘द क्लायमेट इन्स्टिट्यूट’च्या नव्या अहवालानुसार ग्लोबल वार्मिंग जर सध्याच्या वेगाने अशीच वाढत राहिली तर २०८० सालापर्यंत जगातून कॉफीचे अस्तित्व नष्ट होऊन जाईल.वाढत्या तापमानामुळे कॉफीचे उत्पादन घेणाऱ्या जमिनीची क्षमता घटून कॉफीची शेती करणे अशक्य होणार आहे. एवढेच कशाला, अगदी २०५०पर्यंतच जगातील अर्धे कॉफीचे मळे निरुत्पादक होणार असल्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. याचा अर्थ की तुमच्या आवडीचे कॉफी फ्लेवर चाखण्याचे आता मोजकेच काही वर्षे शिल्लक राहिले आहेत. स्पष्ट सांगायचे तर फक्त ६४ वर्षे!तुम्हाला जर वाटत असेल की अजून बराच वेळ आहे तर तसे नाही. कारण येणाऱ्या काही वर्षांमध्येच कॉफीच्या मूळ चवीमध्ये होणारे बदल तुम्हाला जाणवतील. तसेच उत्पादन घटल्यामुळे कॉफीचे दरदेखील गगनाला भिडतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बरं तुम्हाला कॉफीविषयी फारसे प्रेम जरी नसले तरी हा मुद्दा सर्वांसाठीच चिंता करण्याचा आहे.कॉफी इंडस्ट्री ही जगातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक आहे. कॉफी नष्ट झाली तर लाखो लोकांना बेरोजगार व्हावे लागणार. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे.