शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
3
पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
4
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
5
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
6
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
7
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
8
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
9
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
10
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
11
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
12
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
13
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
14
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
15
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
16
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
17
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
18
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
19
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
20
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

विशीतील तरुणांमध्ये हवेत हे गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:18 IST

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते....

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते. यावेळी लागलेल्या सवयी आपल्या जीवनाला कायमस्वरूपी आकार देणार्‍या असतात. म्हणूनच आनंदी आणि परिपूर्ण आयुष्यासाठी विशीतील प्रत्येक तरुणामध्ये पुढील गुण असायलाच पाहिजे. १. प्रामाणिकपणाआपल्या व्यक्तित्वाचा सर्वात मोठा अलंकार म्हणजे प्रामाणिकपणा. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमची विश्‍वासहर्ता वाढते. एखाद्या ठिकाणी तुम्ही उशिरा पोहचला तर खोटे कारण सांगण्याऐवजी खरं खरं सांगून द्या की तुमचे आजचे नियोजन चुकले. यामुळे खोटं लपविण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.२. टीका सहन करणेस्पर्धेत टिकायचे असेल तर टीका सहन करावी लागणार हे अटळ सत्य आहे. दुसर्‍यांनी चूक दाखवून दिली तर चिडू नका. लोकांचे आपल्या बद्दलचे मत जाणून त्यावर आवश्यक ते बदल करणे खर्‍या अर्थाने प्रगतीचा राजमार्ग आहे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे जे म्हणतात ते उगीच नाही.३. रागावर नियंत्रणक्रोध हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असतो. रागामध्ये आपली ऊर्जा आणि वेळ नाहक खर्च होतो. त्यामुळे रागावू नका. या ऊज्रेला जर योग्य दिशा दिली तर किती तरी अशक्यप्राय गोष्टीं तुमच्या हातून घडण्याची शक्ती मिळते.४. नकार पचवायला शिकाया वयात सर्वांची भावना 'आज मैं उपर, आसमाँ निचे' अशीच असते. अश स्थितीत पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली तर हिरमोड होतो. परंतु सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळू नाही शकत. त्यामुळे नकार पचवून नव्या दमाने पुन्हा प्रयत्न करणारेच आयुष्यात यशस्वी होतात.५. दिलेला शब्द पाळाशब्दाला जागतो तोच खरा माणूस. 'प्राण जाए पर वचन न जाए' अशी आपली संस्कृती. दुसर्‍यांना दिलेला शब्द, वचन पाळलेच पाहिजे. वचन मोडण्यासारखा गैरप्रकार दुसरा नाही. त्यामुळे जर शक्य नसेल आधीच तसे सांगा. कारण दिलेला शब्द परत नाही घेता येत.