शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

विशीतील तरुणांमध्ये हवेत हे गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:18 IST

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते....

कुमारवयातील अल्लडपणा जाऊन 20 व्या वर्षात प्रवेश झाला की आपल्या आयुष्याची दिशा स्पष्ट व्हायला लागते. यावेळी लागलेल्या सवयी आपल्या जीवनाला कायमस्वरूपी आकार देणार्‍या असतात. म्हणूनच आनंदी आणि परिपूर्ण आयुष्यासाठी विशीतील प्रत्येक तरुणामध्ये पुढील गुण असायलाच पाहिजे. १. प्रामाणिकपणाआपल्या व्यक्तित्वाचा सर्वात मोठा अलंकार म्हणजे प्रामाणिकपणा. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुमची विश्‍वासहर्ता वाढते. एखाद्या ठिकाणी तुम्ही उशिरा पोहचला तर खोटे कारण सांगण्याऐवजी खरं खरं सांगून द्या की तुमचे आजचे नियोजन चुकले. यामुळे खोटं लपविण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.२. टीका सहन करणेस्पर्धेत टिकायचे असेल तर टीका सहन करावी लागणार हे अटळ सत्य आहे. दुसर्‍यांनी चूक दाखवून दिली तर चिडू नका. लोकांचे आपल्या बद्दलचे मत जाणून त्यावर आवश्यक ते बदल करणे खर्‍या अर्थाने प्रगतीचा राजमार्ग आहे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे जे म्हणतात ते उगीच नाही.३. रागावर नियंत्रणक्रोध हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू असतो. रागामध्ये आपली ऊर्जा आणि वेळ नाहक खर्च होतो. त्यामुळे रागावू नका. या ऊज्रेला जर योग्य दिशा दिली तर किती तरी अशक्यप्राय गोष्टीं तुमच्या हातून घडण्याची शक्ती मिळते.४. नकार पचवायला शिकाया वयात सर्वांची भावना 'आज मैं उपर, आसमाँ निचे' अशीच असते. अश स्थितीत पाहिजे ती गोष्ट नाही मिळाली तर हिरमोड होतो. परंतु सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळू नाही शकत. त्यामुळे नकार पचवून नव्या दमाने पुन्हा प्रयत्न करणारेच आयुष्यात यशस्वी होतात.५. दिलेला शब्द पाळाशब्दाला जागतो तोच खरा माणूस. 'प्राण जाए पर वचन न जाए' अशी आपली संस्कृती. दुसर्‍यांना दिलेला शब्द, वचन पाळलेच पाहिजे. वचन मोडण्यासारखा गैरप्रकार दुसरा नाही. त्यामुळे जर शक्य नसेल आधीच तसे सांगा. कारण दिलेला शब्द परत नाही घेता येत.