शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अती घाम आणि घामाचा वास यावर उपाय आहे !

By madhuri.pethkar | Updated: January 3, 2018 19:26 IST

खरंतर तुझ्या अंगाला घामाचा वास येतो असं दुसरं कोणी सांगण्यापेक्षा आपली समस्या आपणच ओळखायला हवी. आपल्याला जास्त घाम येत असेल , घामाला वास येत असेल तर त्यावरचे उपाय लगेच करायला हवेत. यामुळे इतरांना बरं वाटणं ही दूरची गोष्ट पण आधी स्वत:लाच छान वाटू लागतं. घामाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळवता येते त्यासाठी अतिशय सोपे उपाय आहेत.

ठळक मुद्दे* शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास घामाची समस्या जाणवतेच. घाम खूप येत असेल , सतत येत असेल तर आंघोळीचा साबण वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. * घामाला वास येण्याची समस्या असेल तर त्या संबंध आहाराशीही असू शकतो. त्यामुळे आपण काय खातो याकडेही लक्ष द्यायला हवं.* लिंबामुळे जीवाणूंची वाढ नियंत्रणात राहाते. घाम आणि घामाचा वास दोन्ही नियंत्रणात राहातं.

- माधुरी पेठकरघामाच्या वासानं माणसं दुरावतात, लांब लांब राहातात, हे सत्य आहे. बूट काढल्यानंतर पायांना येणाºया आंबट वासामुळे स्वत:लाच संकोचल्यासारखं होतं. खरंतर घाम येणं ही वैयक्तिक बाब. पण या घामाच्या वासानं आजू बाजूचे जेव्हा रिअ‍ॅक्ट होवू लागतात आणि त्या प्रतिक्रियांचा जेव्हा आपल्यावर नकारात्मक परिणाम होवू लागतो तेव्हा घामाची ही समस्या वैयक्तिक बाब राहात नाही. केवळ घामामुळे आपली हेटाळणी होते आहे हेही अनेकांना सहन होत नाही.अती घाम येणं, घामाला वास येणं याची अनेक कारणं आहेत. वयात येताना ही समस्या जाणवते. तर कधी मधुमेहासारखे आजार याला कारणीभूत असतात. शरीरातून निघणा-या घामरूपी पाण्याचा संबंध जीवाणूंशी येतो आणि त्यातून घामाशी निगडित इतर समस्यांचा जन्म होतो.खरंतर तुझ्या अंगाला घामाचा वास येतो असं दुसरं कोणी सांगण्यापेक्षा आपली समस्या आपणच ओळखायला हवी. आपल्याला जास्त घाम येत असेल , घामाला वास येत असेल तर त्यावरचे उपाय लगेच करायला हवेत. यामुळे इतरांना बरं वाटणं ही दूरची गोष्ट पण आधी स्वत:लाच छान वाटू लागतं.घामाच्या दुर्गंधीपासून मुक्तता मिळवता येते त्यासाठी अतिशय सोपे उपाय आहेत. हे उपाय केल्यास केवळ घामाच्या वासाची समस्या म्हणून आपण चार चौघात जायला संकोच करत नाही आणि इतर चार चौघे आपल्याला केवळ घामाच्या वासामुळे टाळत नाही.

 

स्वच्छ राहा

कोणी म्हणेल हा काही उपाय आहे का? पण खरंतर हाच पहिला आणि मूलभूत उपाय आहे. शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास घामाची समस्या जाणवतेच. घाम खूप येत असेल , सतत येत असेल तर आंघोळीचा साबण वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. नुसता सुगंधी साबण वापरून भागत नाही तर यासाठी अ‍ॅण्टिबॅक्टेरिअल साबण वापरायला हवा. या प्रकारच्या साबणानं त्वचेवरील जीवाणू घटतात. हा साबण शरीरावर लावताना जिथे जास्त घाम येतो तिथे जास्त लावावा. आणि घाम खूप येत असेल तर दिवसातून दोनदा आंघोळ करावी. किंवा खूप श्रमाचं काम केल्यानंतरही घाम येतो. अशा वेळेस कामानंतर आंघोळ केल्यास घामाची दुर्गंधी येत नाही.अंग नीट कोरडे करा.

घाईघाईत अंघोळ करणं, आंघोळीनंतर घाईघाईनं तयार होणं अशा या घाईमुळेही घामाची आणि घामाच्या दुर्गंधीची समस्या निर्माण होते. आंघोळीनंतर अंग नीट कोरडे करण्याची काळजी घ्यायलाच हवी. अंगाचा जो भाग ओला राहातो तिथे मग जीवाणू वाढतात आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होते. पाय ओलसर असताना सॉक्स बूट घालणे यामुळेही घाम आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होते.डीओडरण्टस आणि अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट

आपल्या घामाचा वास येवू नये म्हणून डीओडरण्टस किंवा अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट वापरण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. पण आपल्यासाठी म्हणून दोघांपैकी एकाची निवड करायची असल्यास या दोघांमधला फरक आधी समजून घ्यायला हवा. डीओडरण्टस हे घामावर सुगंधी वासाचं वेष्टण चढवतात तर अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट हे घाम नियंत्रित करतात. आपल्याला अगदी कमी घाम येत असेल तर नुसत्या सुगंधासाठी म्हणून डीओडरण्टस वापरलं तरी चालतं पण जर घामच खूप येत असेल तर मग सुगंधापेक्षाही समस्या नियंत्रित करण्यावर भर द्यायला हवा. अति घाम येणा-यानी डीओडरण्टस ऐवजी अ‍ॅण्टिपर्सपिरण्ट वापरायला महत्त्व द्यायला हवं.काय खातो हे बघा!

घामाला वास येण्याची समस्या असेल तर त्या संबंध आहाराशीही असू शकतो. त्यामुळे आपण काय खातो याकडेही लक्ष द्यायला हवं. अतिमसालेदार, तिखट, कांदा, लसूण यांचं अतिप्रमाण, चहा, कॉफी, अल्कोहोल यांचं अतिसेवन यामुळेही घामाला वास येतो. या पदार्थांवर नियंत्रण आणलं तरी समस्या सुटू शकते.

 

 

लिंबाचा रस

लिंबामुळे जीवाणूंची वाढ नियंत्रणात राहाते. लिंबू सहज उपलब्धही असतं. लिंबाचा रस काढून तो थोड्या पाण्यात मिसळून हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचं. आणि हा स्प्रे शरीरात ज्या भागात जास्त घाम येतो तिथे आंघोळीआधी मारावा. स्प्रेचं पाणी कोरडं होवू द्यावं आणि मग आंघोळ करावी. यामुळे घाम आणि घामाचा वास दोन्ही नियंत्रणात राहातं.अ‍ॅपल सायडर

अ‍ॅपल सायडर हे अ‍ॅण्टिसेप्टिक म्हणूनही काम करतं. जीवाणूंच्या वाढीवर अ‍ॅपल सायडर नियंत्रण आणतं. आंघोळीआधी कापसाचा बोळा अ‍ॅपल सायडरमध्ये बुडवून तो घाम येण्याच्या ठिकाणी लावावा. आणि नंतर आंघोळ करावी. अ‍ॅपल सायडर सगळ्यांनाच चालतं असं नाही तर काहींना त्याची अ‍ॅलर्जीही येवू शकते. त्यामुळे आधी टेस्ट घेवूनचे नंतर त्याचा उपयोग करायला हवा.पायांची काळजी घ्या

पायाला येणा-या घामाचा खूप वास येतो. पायात घातल्या जाणा-या सॉक्समुळे तर यासमस्येत जास्त भरच पडते. घाम शोषून घेणा-या सॉक्सपेक्षा कॉटन सॉक्स वापरावेत. पायांच्या तळव्यांना भेगा असतील तर त्यात घाण साठते आणि तिथे जीवाणूंची वाढ होते. हे जीवाणू घाम आणि घामाच्या दुर्गंधीचे कारण ठरतात. तेव्हा पायांना भेगा असतील तर त्यावर आधी उपाय करावा. पाय हे दगडानं घासून स्वच्छ करावेत. सतत पायात सॉक्स आणि बूट नसावेत.अनवाणी पायांनी थोडं रोज चालायला हवं. यामुळे पायांना मोकळा श्वास घ्यायला मिळतो.भरपूर पाणी प्या

आपण पुरेसं पाणी पित आहोत ना याकडेही लक्ष द्यावं. कारण पाणी पुरेसं प्यायलं तरच त्वचा छान ओलसर आणि सुदृढ राहाते. शरीरातील टॉक्सिन्स पाण्यामुळेच बाहेर पडतात. आणि टॉक्सिन्स बाहेर पडले तर मग अती घामाचा आणि घामाच्या दुर्गंधीचा प्रश्नच येत नाही.