शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

​नितळ, निरोगी व मुलायम त्वचेसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 23:41 IST

जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात.

जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात. मात्र वृद्ध होणे कोणालाच आवडत नसल्याने आपली त्वचा नितळ, निरोगी, मुलायम व तकाकीयुक्त दिसण्यासाठी प्रत्येकजण कसोसीने प्रयत्न करताना दिसतात. आजच्या लेखात आपण नितळ व निरोगी त्वचेसाठी व तारुण्यता टिकविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे जाणून घेऊ...वाढत्या वयाबरोबर त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता जास्त असते. मात्र वेळेवरच काळजी घेतल्यास निरोगी व नितळ त्वचा दिर्घ काळापर्यंत जोपासली जाऊ शकते. आपले आरोग्य निरोगी असेल तर आपली त्वचादेखील तकाकीयुक्त, नितळ व मुलायम राहते. आपल्या शरीराचे संरक्षण करण्यात त्वचेची भूमिक ा  अत्यंत महत्त्वाची आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम हा सर्वप्रथम त्वचेवरच होतो. तारुण्यातील तारुण्यपिटीका, म्हातारपणातील सुरकुत्या आणि राग आल्यास लाल रंग धारण करणे हे त्वचेचे गुणधर्म आहेत. त्वचा विकार होण्याची प्रमुख कारणे-*  सतत फास्ट फूडचे सेवन करणे.*  त्वचेच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्षित असणे.*  सतत धूळ, माती व प्रदूषणाच्या संपर्कात राहणे.*  त्वचेचे विकार झालेल्यांच्या संपर्कात राहणे. *  आंघोळ किंवा घाम आल्यावर त्वचेची काळजी न घेणे म्हणजेच व्यवस्थित कोरडी न करणे. *  केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर अती वापर करणे. त्वचा विकार झाल्याची काही लक्षणे*  त्वचा नेहमी खाज येणे व कोरडी पडणे किंवा कोंड्याची निर्माण होणे*  तारुण्यपिटीका व पुरळ येणे*  त्वचेचा काहीभाग लालसर होणे तसेच दाह होणे*  त्वचेचे मूळ रंग बदलणे*  त्वचेला दुर्गंध येणे. त्वचेची काळजी कशी घ्याल?*  आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर त्वचा ओलसर असल्यास त्वचा काळजीपूर्वक कोरडी करणे तसेच जास्त घाम येणाºया ठिकाणी पावडर वापरणे.*  त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे *  त्वचा नितळ व निरोगी राहण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा असून त्यात गाईचे तूप, बदाम, खजूर आदी सारख्या सुका मेवांचा समावेश असावा. * त्वचेची विशेषत: कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दुधावरची साय चांगले मॉयश्चरायझरचा वापर करावा.*  त्वचेचा ओलावा टिकाविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच आॅलिव्ह आॅइल किंवा तेलाचा वापर करावा. *  त्वचेला कांती मिळविण्यासाठी किंवा उजळ रंग प्राप्त होण्यासाठी त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो टाळावा. * ग्रामीण भागातील मुलांच्या त्वचेवर मोठ्या आकारातील पुरळ येत असतात. यालाच बँड असे म्हणतात. हा एक त्वचेचा विकार असून त्वचेची अस्वच्छता हेच त्याचे मुख्य कारण आहे.* केमिकल्सयुक्त साबणाऐवजी नैसर्गित घटक असलेल्या आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा. तयार करा घरगुती आयुर्वेदिक उटणेडाळीचे पीठ + संतरा साल + आवळा पावडर +  अनंता + नागरमोथा + वाळा + चंदन पावडर  हे सर्व घटक एकत्र वाटून घेऊन भरणीत भरून ठेवावे आणि आंघोळीसाठी याचाच वापर करावा. हे उटणे आंघोळीसाठी वापरल्याने त्वचेचे आरोग्य निरोगी राहुन नितळ व मुलायम होते.