नितळ, निरोगी व मुलायम त्वचेसाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 23:41 IST
जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात.
नितळ, निरोगी व मुलायम त्वचेसाठी...
जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात. मात्र वृद्ध होणे कोणालाच आवडत नसल्याने आपली त्वचा नितळ, निरोगी, मुलायम व तकाकीयुक्त दिसण्यासाठी प्रत्येकजण कसोसीने प्रयत्न करताना दिसतात. आजच्या लेखात आपण नितळ व निरोगी त्वचेसाठी व तारुण्यता टिकविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे जाणून घेऊ... वाढत्या वयाबरोबर त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता जास्त असते. मात्र वेळेवरच काळजी घेतल्यास निरोगी व नितळ त्वचा दिर्घ काळापर्यंत जोपासली जाऊ शकते. आपले आरोग्य निरोगी असेल तर आपली त्वचादेखील तकाकीयुक्त, नितळ व मुलायम राहते. आपल्या शरीराचे संरक्षण करण्यात त्वचेची भूमिक ा अत्यंत महत्त्वाची आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम हा सर्वप्रथम त्वचेवरच होतो. तारुण्यातील तारुण्यपिटीका, म्हातारपणातील सुरकुत्या आणि राग आल्यास लाल रंग धारण करणे हे त्वचेचे गुणधर्म आहेत. त्वचा विकार होण्याची प्रमुख कारणे-* सतत फास्ट फूडचे सेवन करणे.* त्वचेच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्षित असणे.* सतत धूळ, माती व प्रदूषणाच्या संपर्कात राहणे.* त्वचेचे विकार झालेल्यांच्या संपर्कात राहणे. * आंघोळ किंवा घाम आल्यावर त्वचेची काळजी न घेणे म्हणजेच व्यवस्थित कोरडी न करणे. * केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर अती वापर करणे. त्वचा विकार झाल्याची काही लक्षणे* त्वचा नेहमी खाज येणे व कोरडी पडणे किंवा कोंड्याची निर्माण होणे* तारुण्यपिटीका व पुरळ येणे* त्वचेचा काहीभाग लालसर होणे तसेच दाह होणे* त्वचेचे मूळ रंग बदलणे* त्वचेला दुर्गंध येणे. त्वचेची काळजी कशी घ्याल?* आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर त्वचा ओलसर असल्यास त्वचा काळजीपूर्वक कोरडी करणे तसेच जास्त घाम येणाºया ठिकाणी पावडर वापरणे.* त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे * त्वचा नितळ व निरोगी राहण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा असून त्यात गाईचे तूप, बदाम, खजूर आदी सारख्या सुका मेवांचा समावेश असावा. * त्वचेची विशेषत: कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दुधावरची साय चांगले मॉयश्चरायझरचा वापर करावा.* त्वचेचा ओलावा टिकाविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच आॅलिव्ह आॅइल किंवा तेलाचा वापर करावा. * त्वचेला कांती मिळविण्यासाठी किंवा उजळ रंग प्राप्त होण्यासाठी त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो टाळावा. * ग्रामीण भागातील मुलांच्या त्वचेवर मोठ्या आकारातील पुरळ येत असतात. यालाच बँड असे म्हणतात. हा एक त्वचेचा विकार असून त्वचेची अस्वच्छता हेच त्याचे मुख्य कारण आहे.* केमिकल्सयुक्त साबणाऐवजी नैसर्गित घटक असलेल्या आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा. तयार करा घरगुती आयुर्वेदिक उटणेडाळीचे पीठ + संतरा साल + आवळा पावडर + अनंता + नागरमोथा + वाळा + चंदन पावडर हे सर्व घटक एकत्र वाटून घेऊन भरणीत भरून ठेवावे आणि आंघोळीसाठी याचाच वापर करावा. हे उटणे आंघोळीसाठी वापरल्याने त्वचेचे आरोग्य निरोगी राहुन नितळ व मुलायम होते.