शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी

By admin | Updated: June 28, 2017 12:17 IST

जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टीक आणि औषधीसुद्धा असतात.

ऑनलाइन लोकमत
जुन्नर, दि 1 -  जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात दरवर्षी पावसाळ्यात विविध रानभाज्या आढळून येतात. या भाज्या चवीला रुचकर असतातच शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टीक आणि औषधीसुद्धा असतात. 
 
जाणून घेऊया काही रानभाज्यांचे महत्त्व
 
टाकळा  
- ही भाजी साधारणतः पावसाळ्यात अधिक उपलब्ध असते.  ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात
- टाकळाला सुगंध उग्र असला तरी कोवळ्या पानांची भाजी रुचकर लागते 
- ही भाजी सर्व प्रकारच्या त्वचा रोगावर उत्तम औषध आहे, टाकळ्याच्या बिया वाटून त्याचा लेप त्वचेवरही लावला जातो.
- तसंच ही भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ कमी होण्यास मदत होते
 
 
आंबुशी 
- आंबुशी राज्यात सर्व आढळते 
- आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून भूक वाढीसाठी उपयुक्त आहे 
- तसेच कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे
 
मायाळू  
- मायाळू ही बहुवर्षायू वेल असून या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात
- मायाळूचे वेल कोकणात सर्वाधिक प्रमाणात आढळतात  
- मायाळूची कोवळी पाने भाजीसाठी वापरतात 
- रक्ताची किंवा पित्ताची उष्णता अतिशय वाढल्यास मायाळूची भाजी गुणकारी आहे 
- गुणधर्माने ही भाजी थंड स्वरूपाची आहे
- मायाळूची भाजी पालकाप्रमाणे पचण्यास हलकी आहे.
 
 
 
करटोली 
- करटोलीची वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम घाट व पश्‍चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात
- करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात
- करटोलीच्या फळांची भाजी कारल्यासारखीच असून पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात उपलब्ध होते
- करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते
 
 
कपाळफोडी 
- कपाळफोडी या वनस्पतीची वेल राज्यात वनात, शेत आणि ग्रामीण भागात आढळते
- सांधांना सुज आल्यास पाण्यात किंवा दुधात ही वनस्पती वाटून त्याचा लेप करावा व तो लाववा. यामुळे वेदना कमी होतात व सूजदेखील उतरते.
- कानाच्या दुखण्यावरही  ही वनस्पती गुणकारी आहे 
 
 
शेवळा 
- शेवळा ही वर्षायू, कंदवर्गीय वनस्पती आहे
- महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते
- शेवळ्याचा कंद औषधात वापरतात
- शेवळ्याचे कंद व कोवळी पाने भाजीसाठी वापरतात.
 
 
 
मोरशेंड 
- ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती पावसाळ्यात सर्वत्र आढळते
- मोरशेंड वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी करतात
- या भाजीच्या सेवनामुळे रक्तातील अॅसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते
 
नळीची भाजी 
- नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
- नागिणीच्या उपचारात ही वनस्पती वापरली जाते. तसेच कावीळ, श्‍वासनलिका दाह व यकृत विकारासाठी या वनस्पतीचा वापर करतात
 
आघाडा 
- आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.
- प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात ही वनस्पती आढळते 
- या वनस्पतीची मुळे, पाने, फुले, फळे (पंचांग) औषधात वापरतात
- अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत
- जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते.
- रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात.
 
भुईआवळी 
- भुईआवळी ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून 20 ते 50 सें.मी.पर्यंत उंच वाढते. 
- भुईआवळी ही वनस्पती  एरंडाच्या कुळातील आहे 
- याची पाने, कोवळी खोडे व फांद्या भाजी करण्यासाठी वापरतात
- थंडीताप, सर्दी-खोकला या आजारांवर ही भाजी गुणकारी आहे