शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मेक इन इंडिया दिवास्वप्न ठरू नये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 05:37 IST

ेआपल्या देशात सध्या 'मेक इन इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. 'मेक इन इंडिया' जागराला देशाच्या आर्थिक राजधानीत प्रारंभ झाला अन् पंतप्रधान मोदींनी स्वत: जातीने उपस्थित राहून मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन केले. मुंबईला देशातील पहिला मेक इन इंडिया सप्ताह साजरा करण्याचा मान मिळाला असून मेक इन इंडियाच्या आकर्षक पोस्टर्स व बॅनर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीतेबद्दल काही शंकाही आहेत. आपल्या शहरातील तरुणाईही या प्रकल्पाच्या सकारात्मक-नकारात्मक दोन्ही पैलूंचे मूल्यांकन करीत आहे. त्याचा सीएनएक्सने घेतलेला हा विशेष आढावा... ‘मेक इन इंडिया’. पंतप्रधानांचा हा ड्रिम प्रोजेक्ट. हा ड्रिम प्रोजेक्ट भारताला नेमका किती फायदा करून देईल? विदेशी कंपन्यांची गुंतवणूक भारतात करुन पंतप्रधान भारतीय उद्योजकाला डावलत तर नाही ना अशा अनेक प्रश्नांकडे या तरुणाईने लक्ष वेधले. फक्त गुंतवणूक करुन होणार नाही तर त्यातून जनतेला नक्कीच लाभ मिळायला पाहिजे. ४९ देशांचे प्रतिनिधी आणि ६८ देशांतून दाखल झालेले शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. भारताकडे असलेल्या सर्व सोयी-सुविधा आम्ही गुंतवणूकदारासाठी खुल्या करत आहोत असे पंतप्रधान म्हणाले. मात्र विदेशी गुंतवणूक वाढल्याने त्या कंपनीचे अथवा गुंतवणूकदारांचे नखरे देखील भारताला सहन करावे लागणार आहेत, याचाही विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा या तरुणाईने व्यक्त केली.  भारतातील उद्योग, कंपन्यांचे काय?मोठा गाजावाजा करुन पंतप्रधानांनी मेक इन इंडियाचा शुभारंभ केला. विदेशातील गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे निमंत्रण देण्यात आले. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू अशी हमी दिली. अन् ते त्यांना मान्य झाले. मात्र भारतात असलेल्या छोट्या- मोठ्या उद्योजकांसाठी पंतप्रधानांनी असे काही विशेष प्रयत्न करणार आहेत का, याचे उत्तर मिळणेही गरजेचे आहे. या लहान उद्योजकांचाही विचार करायला हवा.                     - दिव्या स्वामी विदेशी गुंतवणूकदारांचे स्वागतभारतात गुंतवणुकीसाठी विदेशातून आलेल्या सर्व उद्योजकांचे मी स्वागत करते. मात्र आता जबाबदारी वाढली आहे. या उद्योजकांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी शासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर करण्याची गरज आहे.  असे झाले नाही तर पुढील काळात कोणताही देश भारतात उद्योग उभारण्याबाबत विचार करीत बसेल.                    - स्नेहल वासनिकमहाराष्ट्राचा मान वाढलापंतप्रधानांजवळ मेक इन इंडियासारखा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी अनेक राज्यांचे पर्याय खुले होते. मात्र त्यांनी महाराष्ट्राला हा बहूमान मिळवून दिला. हे आपले भाग्य आहे, असे मी समजते. मुंबईला झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योजकांचे मनोबल नक्कीच वाढेल. पंतप्रधानांचे ध्येय अन् त्यांचे दूरचे विचार नक्कीच लाभदायक ठरतील असा मला विश्वास आहे.  - अंजली टेकचंदानीपायाभूत सुविधा, दळणवळणाची साधनेही बघा हा सोहळा संपल्यानंतर राज्याला यातून काय मिळणार, हा खरा प्रश्न आहे. सर्वसामान्यांना पडलेल्या या प्रश्नाचा धांडोळाही शासनाने घ्यायला हवा. या सोहळ्यातून मुंबईची आधीचीच 'आर्थिक राजधानी' म्हणून असलेली ओळख आणखी पक्की करण्यावर असणार आहे का?. अर्थात या प्रयत्नांना कितपत यश मिळेल आणि राज्याचे रोजगार, पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने या दृष्टीने जीवन किती सुसह्य होईल हेही स्पष्ट व्हायला हवे.   - मयूर धूत  देशाची प्रगती होईल अशी आशा वाटतेयनरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते आजपर्यंत जर त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला तर फार समाधानकारक असे काही झाले नाही. मात्र मेक इन इंडियापासून परत एकदा अपेक्षा वाढल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरीता केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेकविध उपक्रमांपैकी मेक इन इंडियाची घोषणा होऊन एक वर्ष झाले. आज कुठे त्याचे पहिले पाऊल दिसू लागले आहे. यापुढे तरी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी वेळ लागू नये, अशी अपेक्षा आहे.                    - पवन पटेलफक्त विदेशी गुंतवणुकीवर देश चालेल?पंतप्रधानांनी यापूर्वीदेखील अनेकदा अशा प्रकारचे मार्केटिंग केले आहे. मोठ्या प्रमाणात ब्रॉण्डिंग करुन, जाहिराती देऊन ‘मेक इन इंडिया’ यशस्वी होणार नाही. स्थानिक उद्योजकांना या उपक्रमापासून लांब ठेवण्यात अर्थ नाही. फक्त विदेशी गुंतवणुकीवर देश चालेला या भ्रमात कुणी राहू नये. असे कुणी करीत असेल तर माझ्या मते ही फसवणूक आहे.  - विजित पाटील 

ेआपल्या देशात सध्या 'मेक इन इंडिया' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. 'मेक इन इंडिया' जागराला देशाच्या आर्थिक राजधानीत प्रारंभ झाला अन् पंतप्रधान मोदींनी स्वत: जातीने उपस्थित राहून मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन केले. मुंबईला देशातील पहिला मेक इन इंडिया सप्ताह साजरा करण्याचा मान मिळाला असून मेक इन इंडियाच्या आकर्षक पोस्टर्स व बॅनर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. परंतु या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वीतेबद्दल काही शंकाही आहेत. आपल्या शहरातील तरुणाईही या प्रकल्पाच्या सकारात्मक-नकारात्मक दोन्ही पैलूंचे मूल्यांकन करीत आहे. त्याचा सीएनएक्सने घेतलेला हा विशेष आढावा... ‘मेक इन इंडिया’. पंतप्रधानांचा हा ड्रिम प्रोजेक्ट. हा ड्रिम प्रोजेक्ट भारताला नेमका किती फायदा करून देईल? विदेशी कंपन्यांची गुंतवणूक भारतात करुन पंतप्रधान भारतीय उद्योजकाला डावलत तर नाही ना अशा अनेक प्रश्नांकडे या तरुणाईने लक्ष वेधले. फक्त गुंतवणूक करुन होणार नाही तर त्यातून जनतेला नक्कीच लाभ मिळायला पाहिजे. ४९ देशांचे प्रतिनिधी आणि ६८ देशांतून दाखल झालेले शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. भारताकडे असलेल्या सर्व सोयी-सुविधा आम्ही गुंतवणूकदारासाठी खुल्या करत आहोत असे पंतप्रधान म्हणाले. मात्र विदेशी गुंतवणूक वाढल्याने त्या कंपनीचे अथवा गुंतवणूकदारांचे नखरे देखील भारताला सहन करावे लागणार आहेत, याचाही विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा या तरुणाईने व्यक्त केली.