शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

​‘दंगल’ चित्रपटातून प्रेरणा घेऊन होऊ शकता यशस्वी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 14:53 IST

आयुष्यात चढउतार येतातच. मात्र बरेचजण थोडे जरी अपयश आले तर पूर्णत: खचतात आणि आपले जीवनच संपवतात. आयुष्यात अपयशाने खचणाऱ्यासाठी मात्र ‘दंगल’ चित्रपट एक प्रेरणादायी ठरु शकतो.

-Ravindra Moreआयुष्यात चढउतार येतातच. मात्र बरेचजण थोडे जरी अपयश आले तर पूर्णत: खचतात आणि आपले जीवनच संपवतात. आयुष्यात अपयशाने खचणाऱ्यासाठी मात्र ‘दंगल’ चित्रपट एक प्रेरणादायी ठरु  शकतो. यात महावीर सिंघ फोगाट यांच्या संर्घषाची कहाणी आहे. त्यांनी अनेक अड्चणींवर मात करुन आपल्या मुलींना स्वत: कुस्ती शिकवून त्यांना योग्य मार्गदर्शन देउन भारतासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. या चित्रपटाची प्रेरणा घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. * आहे त्यात समाधान मानून त्यातुनच नवनिर्माण कराआयुष्य म्हणजे इच्छापुर्तींचा कारखाना नव्हे. इथे आपल्याला जे हवे आहे ते आपणहून मिळवावे लागते. महावीर सिंघ फोगाट यांचे सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न होते, परंतु वडिलांच्या निबंर्धामुळे ते फक्त राष्ट्रीय पातळी  पर्यन्तच येऊ शकले. त्यांनी पुढे आपल्या मुलाला स्पर्धेत उतरवून आपले स्वप्न साकार करण्याचे स्वप्न बघितले. परंतु नशिबाने त्यांचे स्वप्न साकार करण्यात अडथळे आणले. त्यांच्या पत्नीने तीन वेळा मुलीनांच जन्म दिला.परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले स्वप्न आपल्या मुलींमध्ये साकारले. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांना पुष्कळ वेळा हवे तसे ग्राहक / कर्मचारी / गुंतवणूकदार मिळत नाही त्यावेळी सर्वात महत्वाचे असते कि जे आपल्याजवळ आहे त्याचा योग्य वापर करुन चांगल्यात चांगले उत्पादन काढायचे. साध्यात साधा कारागीर सुद्धा आपल्या कौशल्याने आणि चांगल्या सल्ल्याने आपल्या कामात तरबेज होऊ शकतो. * बलस्थाने ओळखून त्यावर फोकस करामहावीर सिंघ स्वत:शाकाहारी होते परंतु मुलींना चांगले शरिरसौष्ठ्व देण्यासाठी त्यांना मांसाहार(चिकन) देणे महत्त्वाचे होते मात्र आर्थिक परिस्थितींमुळे त्यांना ते शक्य नव्हते. तरीही त्यांनी चिकन विक्रेत्याला नाममात्र दरात चिकन देण्यास भाग पाडले.आणि त्याला खात्री करुन दिली कि त्याच्या या उपकारामुळे त्यांच्या मुली पुढे जाऊन सुवर्णपदक मिळवतील. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांनाही सप्लायर्स हवे असतात. परंतु आवश्यक ती विश्वासार्हता किंवा बाजारात नाव नसल्यामुळे नवीन उद्योजकांनाही वाजवी दरात सप्लायर्स मिळविणे कठिण जाते. अशावेळी दंगल' चित्रपटातुन आपण हे शिकू शकतो कि समोरच्याला आपल्या बरोबर व्यवहार किंवा उद्योग केल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो हे पटवून देणे फार महत्त्वाचे आहे.  * मिळालेल्या संधीचे सोनं करा‘दंगल’ चित्रपटात दाखविल्याप्रमाणे आपल्याला नवीन काही शिकता येत असेल तर ते अंगीकारले पाहिजे,नुसत्या जुन्याच कल्पना घेऊन पुढे जाणे धोकादायक ठरू शकते. गीताने आपल्या नॅशनल चॅम्पियनशिप  नंतर आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप पदाच्या विजेते पदासाठी गेली असताना आपल्या नवीन कोचच्या शिक्षणाचा अवलंब केला आणि विजेतेपदाकडे वाट्चाल केली. त्याचप्रमाणे नवीन उद्योजकांनाही आपल्या उद्योग वाढीसाठी नवनवीन संधींचा,धोरणांचा,कल्पनांचा विचार करून त्यांचा वापर करुन आपला उद्योग वाढविला पाहिजे.* धोका पत्कराज्याप्रमाणे 'दंगल' चित्रपटात दंगल स्पर्धेत पुरुषांएवजी मुलींना खेळ्ण्याचा निर्णय देऊन त्या स्पर्धेकडे पाहण्याची प्रेक्षकांना नवीन दिशा दिली आणि जी अतिशय यशस्वी झाली. त्याचप्रमाणे उद्योजकांनीही आपला उदयोग वाढविण्यासाठी आवश्यक असल्यास धोका पत्करला पाहिजे. नविन प्रयोग केले पाहिजेत. काही प्रयोग फसतील त्याची फार चिंता न करता त्यापासुन शिकून पुढे गेले पाहिजे. परंतु आपण धोका पत्करलाच नाही तर आपल्याला उद्योजक म्हणवता येणार नाही.कारण जसे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तसेच रिस्क घेणे आणि उदयोग वाढविणे ही यशस्वी उदयोगाची गुरुकिल्ली आहे.