शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

Alert : ​आॅनलाइन अफेयरमुळे वैवाहिक आयुष्य धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 17:11 IST

चॅटिंग करणे, मेसेज पाठवणे हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात. मात्र वरकरणी हार्मलेस वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.

सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढतच असून त्याचा परिणाम आपल्या खाजगी आयुष्यावर जाणवायला लागला आहे. विशेष म्हणजे काही चित्रपटांमध्येही याचे धोके दाखविण्यात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणास जरी तात्पूरता आनंद मिळतो मात्र यांचे भयंकर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यात घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता, चिंता, डिप्रेशन, तीव्र दु:खांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. त्याऐवजी एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं. असे केल्यास वैवाहिक आयुष्याचा खरा आनंद मिळू शकातो. चॅटिंग करणे, मेसेज पाठवणे हे हार्मलेस आहे असा युक्तिवाद काही जण करतात.  मात्र वरकरणी हार्मलेस  वाटणाऱ्या या प्रकाराचे दुष्परिणाम अनेक आहेत.बऱ्याचजणांना आॅनलाइन चॅटिंग करुन आपल्या पार्टनरची फसवणूक करण्याचे थ्रिल वाटते. विशेष म्हणजे असा प्रकार करत असताना व्यक्ती ही कॉम्पुटरच्या मागे सुरक्षित असते त्यामुळे तिच्यात एक फाजील धाडस आलेलं असतं. ‘इतर जे करतात ते मीही करू शकतो. मला कोणी पकडू शकत नाही’ अशी भावना निर्माण होते. ज्यांच्यात व्हर्च्युअल करेज-धाडस निर्माण होतं ते असे प्रकार करतात; पण हे खर धाडस नाही. याच्यातून आपले वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ शकते. सायबर चीटिंग हे व्हर्च्युअल  वर्ल्डमध्येच होतं आणि यात जे भावनिकरीत्या गुंतलेले असतात त्यांना स्वत:च वागणं चुकीचं, अप्रामाणिक वाटत नाही.‘मी काही कोणाला प्रत्यक्षात बघत नाही किंवा सोअर्स करत नाही ती फसवणूक कशी होईल’, असा युक्तिवाद ते करतात. विशेष म्हणजे ती फसवणूकच असते. जर दोन व्यक्तींचं नातं कसं असावं याचे काही नियम असतील तर ते सायबरवरही पाळायला हवेत. वास्तव आणि आभासी अशी आपल्या जीवनाची विभागणी झालेली नाही. तुमची निष्ठा हि सगळीकडे असायला हवी. माणसाचं व्यक्तिमत्व हे संमिश्र आहे. त्यामुळे फसवणूक चुकीचीच आहे. आजकाल पती -पत्नी किंवा पार्टनर्स  हे बरेचदा आॅनलाइन बिझी असल्याने एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यातून त्याचा भावनिक संपर्क तुटतो. याचा परिणाम नात्यावर होतो.  स्वत:च्या पार्टनरमध्ये भावनिकरीत्या गुंतलेले का नाहीत हा खरा प्रश्न आहे. जर केअच नात्यात तुम्ही मनाने गुंतलात तर आॅनलाईन भटकंतीची गरजच भासणार नाही. आॅनलाईन  चीटिंगचे परिणाम भयंकर आहेत.  घटस्फोट तर होतोच शिवाय मानसिक परिणामही होतात. शिवाय अस्वस्थता , चिंता, डिप्रेशन, तीव्र दु:खांचा आवेग, असोशी, बदल्याची भावना असे परिणाम कमी अधिक प्रमाणात दोघांवरही दिसून येतात. एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांना वेळ देणं याला प्राधान्य द्यायला हवं.