शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check: गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 20:08 IST

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दैनंदिन पातळीवर चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या भीतीचा फायदा घेऊन काहीजण अफवा देखील पसरवताना दिसत आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दैनंदिन पातळीवर चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या भीतीचा फायदा घेऊन काहीजण अफवा देखील पसरवताना दिसत आहेत. कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. गरम पाणी प्यायल्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पण यामागचं सत्य काय आहे याचं स्पष्टीकरण आता खुद्द केंद्र सरकारनंच सांगितलं आहे. गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Indian Government said drinking warm water does not kill corona virus)

केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करण्यात आलं आहे. "गरम पाणी प्यायल्यानं किंवा गरम पाण्यानं आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये", असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

याशिवाय पीआयबीच्या फॅक्टचेक टीमनंही याबाबत अधिकृत खुलासा केला आहे. सोशल मीडियात सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय आणि औषधांचे सल्ले दिले जात आहेत. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. यात गरम पाणी पिण्याचा सल्ला खूपच व्हायरल झाला आहे. यासोबतच खायच्या पानांचं सेवन करण्याचाही सल्ला देण्यात येत आहे. पण अशाप्रकारचे सल्ले न ऐकण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस