शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 11:36 IST

सरकारनेच गांभीर्याने झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करावा.

सयाजी शिंदे, अभिनेते - वृक्षप्रेमी

आपल्याकडे अनेक ठिकाणी महामार्गांच्या बांधणीचे आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे; पण या सर्वात मोठ्या प्रमाणावर बळी जातोय तो आपल्याला अखंड ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचा. नुकतीच पुणे-बंगळुरू रस्त्यावर काही झाडे कापली गेली. त्यातही एक मोठे किमान २०० वर्षे जुने वडाचे झाड देखील पाडले. वड हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. आता या झाडाने गेल्या २०० वर्षांत जो ऑक्सिजन दिला, त्याच्या सानिध्यात वाढलेल्या अन्य झाडांना-वेलींना जीवदान दिले, झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांचा आसरा दिला, त्यांचा एक अधिवास पाडण्यात आला, त्याची किंमत आपण कशी मोजणार आहोत?

आपण  याचा कधीतरी गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही? कुठे चाललो आहोत आपण? आपल्याला भविष्यात याची काय व किती किंमत मोजावी लागेल, याची काही कल्पना आहे का? अलीकडेच पुणे-बंगळुरू रस्त्यावर पाडलेल्या या वडाच्या झाडाची माहिती मिळाल्यावर मी माझ्या टीमसह तिथे पोहोचलो. तिथे कायतर म्हणे मधमाश्यांनी आमच्यावर हल्ला केला. अरे, त्यांनी हल्ला नाही केला. त्या झाडाला पाडल्यावर आम्ही तिथे पाहायला गेलो. आम्ही त्यांच्या अधिवासात प्रवेश केला. तेव्हा त्यांची ती प्रतिक्रिया होती, असे म्हणायला हवे. आज त्या रस्त्यावर जी झाडे पडली आहेत, त्या झाडांच्या फांद्यांवर झालेल्या वाऱ्यामुळे त्यातून पांढरा चिक गळतो आहे. हा पांढरा चिक म्हणजे त्या झाडांचे रक्त आहे हो ! ही भळभळती जखम आपल्याला कधी समजणार? किती बदललो आपण! गावात एखादा सरपंच वारला तर आपण मोठी शोकसभा घेतो. गाव धाय मोकलून रडतो. त्या सरपंचाची महती सांगतो. अरे पण तो सरपंच होता पाच वर्षे. त्यातही दोन पक्षांची इकडची-तिकडची कामे त्याने केली. पण ही झाडे तब्बल २०० वर्षे इथे आहेत.

ज्या झाडाने २०० वर्षे तुम्हाला निरपेक्षपणे निर्मळ श्वास दिला, सावली दिली आणि मोजण्यापलीकडचे उपकार तुमच्यावर केले, ते उन्मळल्यावर त्याची शोकसभा व्हायला नको?, एवढी आपली संवेदनशीलता हरपली का? तुमच्या सरणावर रचले जाण्यासाठी या झाडांनी आज स्वतःचा जीव गमावला आहे, असे मला राहून राहून वाटते.

- विकासकामे करताना वृक्षतोड केली जाते; पण अशावेळी झाडांची कत्तल करण्यापूर्वी जरा नियोजन करा. या झाडांना अन्यत्र हलवून तिथे त्यांचे पुनर्वसन करा. ते करणे सहज शक्य आहे. निसर्गाची स्वतःची एक जैवसाखळी आहे. - ती अशा पद्धतीने नष्ट करणे भविष्यात मानव जातीच्या मुळावर बेतू शकते, याचा किमान विचार होणे ही काळाची गरज आहे. - औरंगाबाद, परभणी येथील रस्त्यांची कामे सुरू असताना आम्ही ४०० पैकी ४० झाडे वाचवली. त्यांचे प्रत्यारोपण केले; पण माझ्यासारख्या एका माणसाच्या क्षमतेला मर्यादा आहेत.

सरकारनेच जर गांभीर्याने याचा विचार करून झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करून कृती करत, मग विस्ताराची आणि विकासाची कामे केली तर निसर्गाचा तोलही सांभाळला जाईल. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याचे माझे सरकारला नम्र आवाहन आहे.

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदेforestजंगलenvironmentपर्यावरण