शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

धक्कादायक ! गोदाकाठी मृत माशांचा खच; कारण अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:24 IST

पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच जलचर प्राणी प्राण्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविली होती.

ठळक मुद्देनदीत चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मृत माशांचा खच पडला होता पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधण्याचे पर्यावरण प्रेमींचे आवाहन

नांदेड : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठी जवळपास सर्वच घाटांवर माशांचा खच पडला आहे. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मासे नेमकी कशामुळे मेले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड शहरातून गोदावरी वाहते, 'गुरु-ता-गद्दी'च्या काळात नदीकाठच्या सर्वच घाटांचा विकास करण्यात आला आहे. परंतु, नांदेड शहरातून निघणारे जवळपास 18 ड्रेनेज लाईनचे घाण पाणी थेट गोदावरी पात्रात सोडण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी यापूर्वीच जलचर प्राणी प्राण्यांना धोका असल्याची शक्यता वर्तविली होती.

जागतिक पर्यावरण दिनी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती प्रा.डॉ. किरण शिल्लेवार यांनी केली होती. परंतु याकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले. आज गोदावरी नदीकाठी ठिकाणी मृत माशांचे ढिगारे लागले आहेत. माशांच्या मृत्यूला महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी तसेच पर्यावरण प्रेमी कडून करण्यात येत आहे.

यापूर्वी देखील घडली होती अशी घटनानांदेड शहरापासून जवळच असलेल्या शिकारघाट परिसरात आसना नदीत चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे मृत माशांचा खच पडला होता त्याचबरोबर इतर जलचर प्राणी मृत पावले होते. सदर घटना परिसरातील एका कारखान्याचे दूषित पाणी थेट नदीत सोडल्यामुळे घडली होती.

पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधावेगोदावरी नदीकाठी मृत माशांचा खच पडला आहे. ही घटना दुर्दैवी आहे. परंतु ही मासे नेमकी कशामुळे मृत झाली याचे कारण आताच सांगणे शक्य नाही. नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. लवकरच पाण्यातील दोष शोधून मृत्यूचे कारण शोधले जाईल.  त्याचबरोबर मृत मासे कोणीही मासे विक्री व्यवसायिकांनी विक्री करू नये अथवा नागरिकांनीदेखील ते खाऊ नये. कारण त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मृत मासे खाल्ल्याने अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - प्रा.डॉ. किरण शिल्लेवार, मत्स्यशास्त्र विभाग प्रमुख, सायन्स कॉलेज, नांदेड

महापालिका प्रशासनाने सतर्क व्हावेगोदावरी नदी काठावर मृत माशांचा खच पडला असून ही घटना दुर्दैवी आहे या माशांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे हे माहिती नाही. परंतु मृत माशांचा खच पाहून खूप वाईट वाटले गोदावरी नदी नांदेड शहराचे वैभव असून तिच्या सुशोभीकरणाचा सह स्वच्छता आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता तरी सतर्क व्हावे. - किशोर वागदरीकर, पर्यावरण प्रेमी नागरिक

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरीenvironmentपर्यावरण