शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

३० टक्क्यांनी शहरांचे प्रदूषण कमी करणार; एमपीसीबीच्या कार्यशाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 02:23 IST

राज्यात २६ महापालिका असून, यामध्ये २३ हजार टन कचरा जमा होता. यात ९ हजार एमएलडी सांडपाणी निर्माण होेते.

औरंगाबाद : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि दिल्ली आयआयटी माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आॅनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात २०२४ पर्यंत राज्यातील प्रमुख शहरांतील प्रदूषण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले.कार्यशाळेत १२ वेबिनार होणार असून, याची सुरुवात २० आगस्ट रोजी झाली. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ई. रवींद्रन, डॉ. व्ही. एम. मोटघरे, डॉ. दीपांकर सहा, दिल्ली आयआयटीचे अध्यक्ष रवींद्र कुमार, प्रो. प्रसाद मोडक, प्रकल्प समन्वयक डॉ. गीतांजली कौशिक यांच्यासह राज्यातील स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यालये, निरी, दिल्ली आयआयटीचे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असे १५० जण सहभागी झाले होते.

ई. रवींद्रन म्हणाले की, राज्यात २६ महापालिका असून, यामध्ये २३ हजार टन कचरा जमा होता. यात ९ हजार एमएलडी सांडपाणी निर्माण होेते. या शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी दीर्घकालीन लढा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. गीतांजली कौशिक म्हणाल्या की, जून महिन्यात पुणे, नाशिक आणि ठाणे महापालिका प्रशासनाशी संवाद साधला. प्रकल्प समजावून घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज त्यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत डॉ. मोटघरे, तज्ज्ञ डॉ. दीपांकर सहा, प्रसाद मोडक यांनीही मार्गदर्शन केले.रवींद्र कुमार म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या आॅनलाईन कार्यशाळेत दिल्ली आयआयटी माजी विद्यार्थी संस्था प्रथमच सोबत काम करीत आहे. नॅशनल क्लीन एअर अभियानांर्तगत राज्यात मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालेले आहे. अनेक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासह उपाययोजना आखल्या जात आहेत. मार्च २०२१ मध्ये प्रदूषण कमी करण्यासह जनजागृती करणाऱ्या राज्यातील सर्वोत्तम तीन शहरांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी जनजागृती करणाºया विद्यार्थ्यांना महायुवा पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

टॅग्स :pollutionप्रदूषण