शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

माळढोक पक्ष्यासाठी परिसर अनुकूल ठेवणे, ही आता सर्वांचीच जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 11:49 IST

सोलापुरातील पर्यावरण प्रेमींचे मत; माळढोक अन् लोकांचाही अध्यादेशात विचार, अटींचे पालन व्हावे

ठळक मुद्देमाळढोक हा सोलापूरची शान आहे. आपल्याकडे माळढोक पुन्हा मोठ्या संख्येने यायला हवासध्या या परिसरात माळढोक दिसत नसले तरी भविष्यात तो पुन्हा येऊ शकतोमाळढोकच्या या अभयारण्यात प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्यावी

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयातर्फे माळढोक अभयारण्यासंदर्भात अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. अभयारण्य क्षेत्रात कोणता भाग येतो, तिथे कोणत्या प्रकारचे उद्योग करता येतील, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून नागरिकांनी अटीचे पालन करावे असे आवाहन केले आहे. आपला परिसर माळढोक पक्ष्यासाठी अनुकूल असला पाहिजे, ही आता आपली जबाबदारी आहे.

पक्ष्यांना धोका निर्माण होऊ नये यादृष्टीने कुटीर उद्योग, गवताळ क्षेत्र, नैसर्गिक शेती करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. माळढोकचा विचार करताना नागरिकांना यामुळे नुकसान होऊ नये अशा तरतुदी केल्या आहेत. इको सेन्सेटिव्ह झोनमधील क्षेत्रामध्ये काही परवानगीची गरज असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासहित नऊ जणांची समिती नेमण्यात येणार आहे.

राजस्थानमध्येही माळढोकची संख्या कमी झाली आहे. आपल्या अभयारण्यात तो पुन्हा येऊ शकतो. माळढोकच्या या अभयारण्यात प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्यावी. जैवविविधतेच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही सूचना मांडण्यात आल्या आहेत. याचे तंतोतंत पालन करायला हवे. काही ठिकाणी अनधिकृतरित्या खाणी सुरु असल्यास त्या बंद व्हायला हव्यात, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली.

यापूर्वी इको सेन्सेटिव्ह झोन मोठा होता. आता त्याची नेमकी सीमा निश्चित करण्यात आली आहे. सध्या या परिसरात माळढोक दिसत नसले तरी भविष्यात तो पुन्हा येऊ शकतो. यासाठी तेथील परिसर माळढोक पक्ष्यांसाठी अनुकूल असायला हवा. याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.- डॉ. निनाद शहा, मानद वन्यजीव रक्षक

माळढोक हा सोलापूरची शान आहे. आपल्याकडे माळढोक पुन्हा मोठ्या संख्येने यायला हवा. माळढोकमुळे इतर जीवांनाही अभय मिळते. गवताळ रानाला महत्त्व नसल्याची मानसिकता आपल्याकडे आहे. यामुळे गवताळ रानाला आणखी महत्त्व प्राप्त होईल. तसेच नागरिकांच्या मनातील गवताळ रानाविषयीचे गैरसमज दूर होतील.- भरत छेडा, प्रमुख, नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरण