शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

World Environment Day: पर्यावरण, आपले आरोग्य आणि आपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 00:57 IST

आरोग्य म्हणजे नुसता आजारांचा अभाव नाही, तर संपूर्ण मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि  सामाजिकदृष्टीने संपूर्ण संतुलित जीवन, अशी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. यात मला एक प्रचंड अभाव जाणवतो तो म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने संतुलित जीवन.

ज्या पद्धतीने कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे, त्यादृष्टीने बघता ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ या म्हणीपेक्षा आता ‘आपले आरोग्य निसर्गाच्या हाती’ हे मानवाने समजणे जास्त योग्य ठरेल. खरे म्हणजे हेच खरेही आहे. कारण मानव हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक छोटा घटक आहे; परंतु मानव पिढ्यान्पिढ्या निसर्गाचे आधिपत्य न मानता स्वत:च्या मनाने वागून निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे जेव्हाही निसर्गचक्र अति जास्त बिघडल्याने प्रश्न उभे झाले आहेत, तेव्हा निसर्गाने एक प्रकारचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आह,े हे आपल्याला बºयाच उदाहरणांतून दिसून येते. एका पद्धतीने कोरोनासारख्या विषाणूंना रोखण्यास आपण असमर्थच ठरतो आहे, हे सतत अनुभवास येते आहे.

आरोग्य म्हणजे नुसता आजारांचा अभाव नाही, तर संपूर्ण मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि  सामाजिकदृष्टीने संपूर्ण संतुलित जीवन, अशी जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आरोग्याची व्याख्या आहे. यात मला एक प्रचंड अभाव जाणवतो तो म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने संतुलित जीवन. वायू, जल, ध्वनी, प्रकाश, असे विविध प्रकारचे प्रदूषण, उत्सर्जन, जंतुमय भूजल, खराब अन्नपदार्थ, अति प्रचंड बांधकामे, अनियंत्रित वृक्षतोड, शेतीतील जंतुनाशके आणि पर्यावरणीय बदल हे सतत आपल्या आयुष्यावर परिणाम करीत असतात. यात कुठेही पर्यावरणाशी आपले २८ल्लू्रल्लॅ (संक्रमण) नाही. जिवंत प्राणी खाण्यासाठी निर्माण केलेले आशिया खंडातील विविध देशांतील मोठाले खाटीकखाने, जिथे प्राणी अक्षरश: अमानवीय दृष्टीने कोंबलेले असतात, अशा ठिकाणी कित्येक विषाणू जनुकीय परिवर्तन करून प्राण्यांमधून माणसांमध्ये येत असतात. हा काही पहिला कोरोना विषाणू आलेला नाही. असे अनेक कोरोना विषाणू आजवर आपल्या पिढीत येऊन त्यांच्या  साथी येऊन गेल्या आहेत. जसे मागे वटवाघळे व डुकरांतील विषाणूंचे combination होऊन swine acute diarrhoea syndrome आला होता जो SADS-CoV या कोरोना विषाणूपासून आला होता किंवा सौदी अरेबियात Middle East respiratory syndrome (MERS) हा २०१२ मध्ये MERS-CoV मुळे आला होता. MERS मध्ये मृत्यूदर ३४.४ टक्के इतका अधिक असल्याने रुग्ण बºयाचदा घरीच मरून जायचा. त्यामुळे तो फक्त २८ देशांमध्ये पसरला. कोविड-१९ मध्ये मृत्यूदर ३.९ टक्के आहे म्हणजेच साधारण ९६ टक्के लोक बरे व्हायला हवेत.  त्याचा The basic reproduction rate म्हणजेच R-naught (RO) हा साधारण १.७ ते २.४ असल्याने अधिक व्यक्तींना त्याची लागण होत आहे. उदा. जर एखाद्या रोगाचा R-naught १.३ असेल, तर १,००० रुग्णांमुळे एका सायकलमध्ये १,३०० लोकांना लागण होऊ शकते व दहाव्या सायकलमध्ये म्हणजे अनियंत्रित असल्यास ४२,६२१ लोकांना लागण होऊ शकते.  Lockdown मध्ये जेव्हा लोक नियमांचे काटेकोर पालन करतात तेव्हा R-naught  कमी होतो, जो १ च्या खाली आल्यास परिस्थतीत सुधारणा करता येऊ शकते.

निसर्ग आणि मानवी आरोग्य यांचा इतका घनिष्ठ संबंध आहे की, निसर्ग सुरक्षित ठेवल्याशिवाय मानव जातीस काहीही भविष्य नाही. गेल्या एका महिन्यात आपण बघितले, तर कोरोनाच्या केसेस वाढणे, टोळधाड आणि आता चक्रीवादळ ही संकटे एकाच वेळी आली आहेत आणि यास कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत, हे जागतिक ते गावपातळीवर कुठेही भांडणे न करता मानवजातीने मान्य करून त्वरित उपाय केले, तरच आपल्यास आपल्या पुढच्या पिढीसाठी काही करता येण्यासारखे आहे.आता उपायांकडे बघू या :१. जागतिक पातळीवर : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने व्यापक करणे व त्यात आरोग्य व पर्यावरणीय बाजू ही संकल्पना मांडणे अत्यावश्यक आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेस एका शिष्टमंडळाने निवेदन देता येईल, जेणेकरून त्यांच्याकडून पर्यावरणीय बाबी व मानवी आरोग्य यावर संशोधन सुरु होईल.२. वैयक्तिक व सामाजिक पातळीवर :- प्रदूषण करणाºया सर्व घटकांना कायद्यानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांचे pressure groups तयार करणे जरूरी आहे. कायद्याचे ज्ञान नसल्याने केमिकल फॅक्टºयांपासून लोक वर्षानुवर्षे नुसते आपले आरोग्य धोक्यात ठेवत असतात.- मोठ्या प्रमाणावर युवावर्गाला सोबत घेऊन स्थानिक झाडे प्रचंड प्रमाणात लावली पाहिजेत. शेतीतही स्थानिक वाण आणि जनावरांना स्थानिक चारा उपलब्ध केला पाहिजे. स्थानिक झाडांवर कीड खूप कमी येते. मुख्य म्हणजे स्थानिक झाडे अन्नसाखळीत खूप महत्त्वाचा भाग आहेत. पशू-पक्ष्यांना व मधमाशांना अन्न, परागीभवन आणि अन्नसाखळी व्यवस्थित चालणे या सर्व प्रक्रियेत स्थानिक जंगली झाडे महत्त्वाचा घटक आहेत. ही झाडे आज १ टक्क्यापेक्षाही कमी शिल्लक आहेत. त्यामुळे UN चा एक रिपोर्ट म्हणतो की, २०  वर्षांतच आपल्याला oxygen  बारमध्ये जावे लागेल.- शाळेतील अभ्यासक्रमात कोणती झाडे, कुठे, कधी, कशी आणि का, हे प्रकरण प्रत्येक परिसर अभ्यासात असलेच पाहिजे, ज्यामुळे कॉलेजमध्ये येईपर्यंत अन्नसाखळी जपण्यासाठी संवेदनशील प्रशिक्षित युवावर्ग तयार होईल व त्यावर काम करील.- शासनाने व गावपातळीवर हिरवा रोजगार उपलब्ध केला पाहिजे, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.- शेवटचे म्हणजे पर्यावरण मला जगण्यास अन्न, पाणी, प्राणवायू आणि कितीतरी अधिक देते, मी पर्यावरणाचे काही देणे लागतो, ही भावना निर्माण करणे आणि जपणे हे प्रत्येक परिवाराचे आद्यकर्तव्य आहे आणि जे प्रत्येकाने केले पाहिजे.अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आपण सर्वच प्रयत्नशील असतो. अर्थ म्हणजे meaning पैसा आणि इंग्रजीत पृथ्वी किंवा निसर्ग. या तिघांचाही समतोल असेल, तरच मानवी जीवन सुखी राहू शकते. फक्त या तिघांमध्ये पैसा इतका वरचढ झाला आहे की, आपण बाकी दोन सोडून पळत्याच्या पाठी लागलो आहोत. त्यात विविध रोग, ताणतणाव आणि भांडणे यामागे आयुष्य जाते. ते सर्व विसरायला आपण निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जातो. म्हणजे पहिले पैशाच्या मागे लागून निसर्गाचा विनाश करायचा आणि मग पैशाने शरीर पोखरले की, निसर्गाच्या कुशीत जायचे. हा मानवी स्वभावाचा पैलू खरे मला कधीच उमगला नाही. एक सुंदर कविता आहे.

I go down to the shore :I go down to the shore in the morningand depending on hour the wavesAre rolling in or moving out,And I say, oh I am miserable,What shall-What should I do? And the sea saysin its lovely voice :Excuse me, I have work to do.Mary Oliverनिसर्ग निसर्गाचे काम करतोच आहे. आपण आपल्या जीवनात कुठल्या अर्थाला महत्त्व द्यायचे ते आजच ठरविणे गरजेचे आहे. कारण आपल्या आजच्या निर्णयावर पुढील हजारो पिढ्या अवलंबून आहेत.

 

- डॉ. शीतल आमटे-करजगी,मुख्य कार्यकारी अधिकारी,महारोगी सेवा समिती, वरोरा,(आनंदवन)  

टॅग्स :World Environment DayWorld Environment Dayenvironmentपर्यावरण