शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

'तो' पुन्हा येणार? सुरुवात नदी, तलावांपासून होणार; नव्या रिपोर्टनं सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 09:52 IST

जागतिक तापमान पर्मियन काळाच्या बरोबरीस पोहचले आहे. जगातील अनेक नदी, तलावात घातक जीवाणू आणि विषारी शेवाळं यांचे प्रमाण वाढत आहे

सिडनी - मागील ४०० कोटी वर्षांत पृथ्वीवर अनेकदा प्रलय आलेला आहे. निसर्गाने अनेकदा प्रकोप दाखवत मोठ्या प्रमाणात जीवहानी केली आहे. आता पुढील प्रलयाची सुरूवात झाली आहे. जगातील नदी, तलावांपासून याचा प्रारंभ झाला आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि जलवायू परिवर्तनामुळे घातक जीवाणू आणि विषारी शेवाळ(Toxic Algal Bloom) वेगाने वाढत आहे. पृथ्वीवरील प्रलयासाठी हेच मुख्य कारणीभूत ठरणार आहे. ज्यामुळे अनेक जीवांचा नाश होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

सर्वात धोकादायक प्रलय स्थिती पर्मियन काळाच्या(२३ते२० कोटी वर्षापूर्वीचा काळ) अखेरीस आली होती. त्यावेळी नकारात्मक स्थिती तयार झाली होती जे त्याकाळातील जीवांना घातक ठरली. चहुबाजूने जंगलाला आग, दुष्काळ, समुद्रातील पाणी गरम झाले. धोकादायक जीवाणू, विषारी शेवाळ वाढलं होते. नदी, तलाव आणि अन्य पाण्याचे स्त्रोत जीवघेणे ठरले. ऑक्सिजन संपला होता. जीव मृत्यू पडत होते. अत्यंत कमी जीव या काळात वाचले होते. या काळात पृथ्वीवरील ७० टक्के जीव संपुष्टात आले होते. समुद्रातील ८० टक्के प्रजाती नष्ट झाली होती. सध्या माणूस या सर्व घटनांकडे दुर्लक्ष करत आहे. सातत्याने जीवाश्म इंधने काढत आहे. पृथ्वीच्या ज्या थरांमधून जीवाश्म इंधन बाहेर पडतात त्या थरांवर प्रलयाचे पुरावे सापडत आहेत.

अलीकडेच झालेल्या अनेक स्टडी अहवालात याचा खुलासा झाला आहे की, जागतिक तापमानवाढीची पातळी सातत्याने वाढत आहे जुन्या प्रलयावर रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमचे क्रिस्टोफर फील्डिंग म्हणाले की, जागतिक तापमान पर्मियन काळाच्या बरोबरीस पोहचले आहे. जगातील अनेक नदी, तलावात घातक जीवाणू आणि विषारी शेवाळं यांचे प्रमाण वाढत आहे. अशास्थितीत पर्मियन काळासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एक प्रजाती संपली तर त्याचा परिणाम दुसऱ्यावर पडणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय संतुलन बिघडेल आणि प्रलयाची सुरुवात होईल. 

सध्याची स्थिती काय? जाणून तुम्हीही हैराण व्हालज्यारितीने तापमानात वाढ होत आहे. जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होतेय. २०१९ आणि २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीचं सर्वात मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. ज्यात कोट्यवधी जीव मृत्युमुखी पडले. कॅलिफोर्नियापासून युरोपपर्यंत, रशियाच्या आर्कटिकपासून भारताच्या उत्तराखंडपर्यंत प्रत्येक ठिकाणी तापमान वाढीमुळे जगंलात आगीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या जीवांसाठी जीवघेणी स्थिती आहे. 

पुढील प्रलय कधी येईल याबाबत वैज्ञानिकांनी सांगितले नाही परंतु महत्त्वाचं म्हणजे, या प्रलयाची सुरुवात झाली आहे. कार्बन डायऑक्साइड वाढल्याने तापमानात वाढ होत आहे. रोग पसरणे, जंगलाला आग लागणे, समुद्रातील पाण्याची पातळी वाढणे या घटना घडत आहेत. परंतु त्याची सुरुवात नदी आणि तलावापासून होत आहे. जेव्हा आपले पाण्याचे स्त्रोत ऑक्सिजन विरहित होतील तेव्हा जीव नष्ट होतील, झाडे मृत होतील. हीच परिस्थिती पृथ्वीवरील सर्व जीवांच्या मृत्यूचं कारण बनेल.