शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पर्यावरणाचे नुकसान;  राज्य शासनाला १३.८८ कोटी रुपये भरण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 17:52 IST

पर्यावरणाचे नुकसान पोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद, दिल्ली ने दिले आहे.

- विजय मिश्राशेगाव :  शेगाव विकास आराखडा अंतर्गत राज्य जीवन प्राधीकरणतर्फे करण्यात आलेली सिवरेज ( भू - गटार ) योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पर्यावरणाचे नुकसान पोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद, दिल्ली ने दिले आहे.शेगाव शहरात दहा वर्षांपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. जमिनीचा पोत घसरल्याने बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिल्याने राज्य शासनाला वर्ष २०१९ मध्ये राष्ट्रीय हरित लवादला एक कोटी रुपयाची बँक हमी द्यावी लागली होती. परंतु त्यानंतर प्रशासनिक ताळमेळ नसल्याने आतापर्यंत झालेल्या पर्यावरणाचे नुकसान पोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार भरण्याचे आदेश दिले आहे. शेगाव विकास आराखड्या अंतर्गत २०१० - ११ मध्ये ३३ कोटी रुपयाची भू - गटार योजनेच्या कामाला राज्य शासन कडून मंजुरात देण्यात आली. सदर योजनेचे काम दिल्ली येथील एस एम एस या कंपनी ला देण्यात आले. यामध्ये शेगाव शहरात ६४ कि.मी ची भू - गटार योजनेकरीता पाईप लाईन टाकने, सफाई करिता चेंबर बांधणे, यामधून येणाºया घाण पाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करणे इत्यादी अनेक प्रकारचा कामाचा समावेश होता. काम तीन वर्षात पूर्ण करणे, त्यापुढील तीन वर्ष त्याची निगा राखण्याची जबाबदारी कंपनीची होती. मात्र या कंपनीने आठ वर्षात शेगाव शहरात ६४ पैकी ५२ की.मी ची पाईप लाईन टाकली होती. टाकण्यात आलेल्या पाईप लाईनचे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश जयपुरीया व गोपाल चौधरी यांनी राष्ट्रीय हरित लवादमध्ये सन २०१७ - १८ मध्ये तक्रार केली. त्यानंतर २४ सप्टेंबर २०१९ मध्ये पुणे येथून व्हिडिओ कांफर्सिंगच्या माध्यमातून सुनावणी करण्यात आली. ज्यामधे तक्रारकर्त्यांना कोणताही वकील न लावता बाजू मांडण्याची परवानगी देण्यात आली. त्यामध्ये उपरोक्त चुकीची जबाबदारी कुठलीही शासकीय विभाग घ्यावयास तयार नसल्याचे दिसून आले. त्यामुळे लवादचे तीन सदस्य न्यायधीशांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश देऊन दोन आठवड्यात एक कोटी रुपयाची बँक हमी द्यावयास लावली होती. असे असतांनाही उपरोक्त प्रकरणातून राज्य शासनाने कोणतीही गंभीर दखल घेतली.त्यानंतर सहा महिन्याचा अवधी मिळूनही उपरोक्त योजनेतील त्रुटी कंत्राटदार कंपनीकडून पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्यानंतर  १५ जून २०२० ला न्यायधीश शिवकुमार सिंग, सिद्धांत दास यांनी केलेल्या आदेश प्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी केलेल्या पाहणी ५ निष्कर्ष प्रमाणे शेगाव शहरातील वातावरण प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते व आजही याबाबत शासनाचे प्रत्येक विभाग ही जबाबदारी टाळत आहे. त्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोडार्ने आजपर्यंत पर्यावरणाचे झालेल्या नुकसानपोटी १३ कोटी ८८ लक्ष २५ हजार रुपयांचे सांगितले आहे. सदर रक्कम शासनाने पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर २०२० चा आधी जमा करावयाची आहे. असे आदेश राष्ट्रीय हरित लवाद, दिल्ली यांनी दिले आहे .  

 भू - गटार योजनेतील कामात अनेक त्रुटी व दोष असल्याने मागील अनेक वर्षांपासून शेगाव नगरपालिका व शहरातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. याबाबत आम्ही वारंवार शासनाला , जीवन प्राधिकरण, संबंधित कंत्राटदारांना अनेकवेळा पत्र पाठविले.परंतु कारवाही होताना दिसत नाही.- प्रशांत शेळके,  मुख्याधिकारी , न. प शेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाShegaonशेगावenvironmentपर्यावरण