शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

World Environment Day: शेती करा : औद्योगीकरण व शहरीकरण थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 00:51 IST

भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकºयांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेतीतज्ज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सन १८९५ मध्ये भारतात पाठवले.

-गिरीश राऊत,निमंत्रक, भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ,भारतीय पर्यावरण चळवळ / वसुंधरा आंदोलन

आज कोरोना विषाणूचा मानवाला संदेश आहे. पुन्हा पृथ्वीशी जोडून घ्या. कृषियुगात जा. तरुणांनो नोकरी मागू नका. एक ते दीड एकर शेतजमीन सरकारकडे मागा. कारण  कोरोना, कॅन्सर व अवकाळी, गारपीट, वादळे घडवणारी तापमानवाढ, हवामान बदल इत्यादी संकटे औद्योगीकरणामुळे आली आहेत. सरकारकडे एमआयडीसीकडे जमीन मुबलक आहे. शेतकरी वा इतर खाजगी जमीन मालकांनो, आपल्या अन्नपोषणाच्या क्षमतेपेक्षा जास्त जमीन बाळगणे हा मानवजात व जीवसृष्टीविरुद्ध केलेला गुन्हा आहे, पाप आहे. मानवजात धोक्यात आहे. अधिकची जमीन जंगलांना व औद्योगीकरण सोडून शेती करू इच्छिणारांना द्या. विनोबांनी भूदान चळवळ केली होती. आज भूदान म्हणजे मानवजातीला जीवनदान आहे.

भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकºयांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेतीतज्ज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सन १८९५ मध्ये भारतात पाठवले. हॉवर्ड हे कोपर्निकस, ब्रुनो व गॅलिलिओ या शास्त्रज्ञांच्या परंपरेतले खरे शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीयांच्या शेतीविषयी कुतूहल होते. त्यांनी ठरवले की, प्रथम भारतात फिरून हा कृषिप्रधान देश हजारो वर्षे शेती कशी करतो ते पाहू. ते पाच वर्षे भारतात विविध ठिकाणी फिरून शेती समजून घेत होते. ते त्यांच्या ‘अ‍ॅन अ‍ॅग्रिकल्चरल टेस्टामेंट’ या ग्रंथात म्हणतात, ‘भारतीय शेतकरी माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून मी शिकलो की, निसर्ग हा खरा शेतकरी आहे. एकाच खाचरात जमिनीचा कस वाढता ठेवून हजारो वर्षे शेती करणे भारतीयांकडून शिकावे. ते मिश्र व फिरती पिके घेतात. या पद्धतीची जाण आम्हा ब्रिटिशांना एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, सन १८८९ पर्यंत माहीत नव्हती.’ हॉर्वर्ड पुढे लिहितात ‘रसायन हे खत नसून विष आहे, ते पिकांचे अन्न नाही.’ हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. आजही तो शेतीविषयक प्रमाणभूत मानला जातो. हॉवर्ड यांचे भाकीत की, ‘यंत्राची भूक पृथ्वी भागवू शकणार नाही’, हे आज खरे ठरले आहे. डॉ. अल्बर्ट हॉवर्ड यांनी वनस्पती व प्राणी यांच्या कुजण्यातून ‘ह्युमस’ निर्मितीतून अनेक पिकांबाबत शेती उत्पादनात काही पट वाढ करून दाखवली होती. त्यांचा वरील ग्रंथ सन १९४० मध्ये प्रथम लंडनमध्ये प्रकाशित झाला होता. सन १९५६ पर्यंत त्याच्या सात आवृत्त्याही निघाल्या होत्या. त्यांनी यंत्र व रसायनांचा शेतीत प्रवेश करण्यातील धोका दाखवला असूनही स्वतंत्र भारतात स्वामिनाथनसारख्या कुठलीही प्रतिभा नसलेल्या, कंपन्यांच्या शेतीतील हितसंबंधाचा पुरस्कार करणाºया, स्वत: शेती न करणाºया सुमार माणसांच्या नावाचे वलय निर्माण केले गेले. भारतीय शेतकºयांचे व शेतीचे वाटोळे करण्याचे ब्रिटिशांना न जमलेले काम या स्वामिनाथनांनी करून दाखवले. करोडो भारतीयांना विषारी अन्नाद्वारे कॅन्सर, हृदयविकार व इतर व्याधी देऊन यमसदनाला पाठविण्याचे महापाप त्यांनी केले. ‘स्वामिनाथन’ हे स्वत: जणू एक औद्योगिक, कृत्रिम उत्पादन आहेत. ही भारतीयांत रुजलेली पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारी एक दांभिक प्रवृत्ती आहे. भारतीयांना कायमचे गुलाम बनवण्याचे मेकॉलेचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण झाले. भारतात ब्रिटिशांना हवी तशी माणसे शिक्षणाने घडवली व स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश अंमल अशा प्रकारे चालू राहिला.

गांधीजी म्हणत की, ‘भारतातील प्रत्येक शेत ही एक प्रयोगशाळा आहे व प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ.’ आता जमीन माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा निघाल्या आहेत व वेळोवेळी मातीपरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीची मानसिकता यासाठी घडवली जाते. हे जणू आईची परीक्षा घेण्यासारखे आहे. ज्या मातीने करोडो वर्षे सृष्टी प्रसवली, तिची सर्जनक्षमता तपासायची यांना गरजच काय? माती निर्जीवच मुळी यांच्या तंत्रज्ञानाच्या लादण्यामुळे झाली. जंगलाला कुणी खत देत नाही. पाणी देत नाही. नांगरणी करीत नाही. तरीही जंगल करोडो वर्षे आहे. आजही जंगलाकडून बोध घेतला, तर या आपत्तीतून सुटका होऊ शकते. शेतकºयांनी आत्महत्या करण्याची गरज नाही. मात्र, मग पैशांमागे धावणेदेखील थांबले पाहिजे. असा पैशामागे धावणारा समाज असलेली शहरे ही चूक आहे, हे समजून घेतले पाहिजे. विदर्भासारख्या फक्त ४०० ते ६०० मि.मी. पाऊस पडणाºया क्षेत्रातही घनदाट जंगल होते. ही जंगलाची क्षमता गळणाºया पानांच्या, वनस्पतींच्या व प्राणी-पक्ष्यांच्या अवशेषांच्या व उत्सर्जनाच्या जमिनीवर सतत निर्माण होणाºया थरामुळे, आच्छादनामुळे आहे. त्याचे विघटन करून पचवणाºया जिवाणू व गांडुळांमुळे आहे. त्यांनी झाडांना पुरवलेल्या पोषक द्रव्यांमुळे आहे. जमीन सच्छिद्र केल्यामुळे पाणी व हवा खेळल्यामुळे, निचरा करण्यामुळे आहे. या नव्या संकरित जाती व रासायनिक खतांमुळे तात्कालिक वाढलेल्या उत्पादनाचे गाजर शेतकºयांना दाखवले गेले; परंतु याचे दुष्परिणाम नंतर समजणार होते. ५० वर्षांपूर्वी याचे व्यसन लावण्यासाठी बियाणे व खते फुकट दिली गेली. संकरित बियाण्यांमध्ये किडीला तोंड देण्याची क्षमता नव्हती. शिवाय तणे जास्त उंच ठरू लागली. मग कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके बनवणाºया कंपन्या वाढीस लागल्या. तण, कीटक, बुरशीने रसायनांना तोंड देण्याची क्षमता वाढवली की, अधिकाधिक विषारी रसायने शेतात ओतण्यात आली. एक दुष्टचक्र सुरू झाले.पराशर ऋषींनी २,००० वर्षांपूर्वी म्हटले की, ‘जंतुनाम् जीवनम् कृषि:’ कृषी हे सजिवांच्या, जीव-जिवाणूंच्या जगण्याचे रूप आहे. हे जिवाणू व गांडुळे जमिनीत सच्छिद्रता ठेवत होते. हवा खेळवत होते. मुळांना प्राणवायू देत होते. पाण्याचा निचरा करीत होते. मुख्य म्हणजे वरील थरात पडणारा पालापाचोळा व इतर सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्या वनस्पतींना योग्य अशा अन्नात बदल घडवीत होते. हा जीव-जिवाणू गांडुळांचा दुवा हरित क्रांतीने नष्ट झाला. रासायनिक खतांना तिप्पट वा चौपट पाणी लागत होते. त्यामुळे नद्या अडवणारी धरणे बांधली गेली. तरीही पाणी कमी म्हणून बोअरवेल खणल्या गेल्या. भूजलाचा उपसा वाढत गेला. रसायनांमुळे सर्वच कीटक नष्ट होत गेले. विषारी रसायने शिरलेल्या अळ्यांना खाऊन पक्षी मेले. जमिनीतील सच्छिद्रता संपल्याने ती टणक झाली. मग ट्रॅक्टर वापरले जाऊ लागले. गायी-गुरे निरुपयोगी ठरू लागली. त्यांच्या शेणाची, खताची व नांगरणीची गरज संपली, असे मानले गेले. बुटक्या वाणांमुळे काड, पाने कमी झाली. त्याचा चारा, जमिनीत खत होणे, जळण म्हणून उपयोग होणे थांबले. जंगलांची क्षमता सर्वांत वरच्या पालापाचोळा व अवशेषांच्या कुजत असलेल्या मातीच्या थराने बाष्पीभवन थांबविण्यामध्ये आहे. निसर्गाचे चक्राकार संतुलन राखण्यात आहे. जैविक  नियंत्रणात आहे. स्वत:चे थंड वातावरण निर्माण करण्यात आहे. अधिक गुंतागुंतीच्या, तरीही सुनियोजित विलक्षण अद्भुत कार्यपद्धतीमध्ये आहे. त्याचे आकलन अबोध सजिवांना व आदिम जमातींना आहे. म्हणून वादळे, पाऊस, भूकंप, त्सुनामी इत्यादींचा मागोवा त्यांना आधी लागतो; परंतु स्वत:ला बुद्धिवान म्हणवणाºया शिक्षित मानवाला याचे ज्ञान नाही. माणसाने या आधुनिक बनण्याच्या चुकीच्या प्रक्रियेत अनेक नैसर्गिक क्षमता गमावल्या आहेत. आपण फक्त दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी जंगल सोडले आणि अगदीच थोड्या, म्हणजे सुमारे ५० ते २५० वर्षांत जंगल आपल्याला जगवते हे भानही सोडले. जीवनाच्या ३९० कोटी वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात हा नगण्य काळ आहे. वस्तूंचे जग निर्माण करून औद्योगिकीकरणाने, आपले अस्तित्व ज्याचा भाग आहे व ज्यावर अवलंबून आहे, त्या खºया नैसर्गिक जगाशी उभा दावा मांडला. हे मानव जातीने स्वत:ला नष्ट करून घेणे आहे.भारतात फक्त १०० वर्षांपूर्वी भाताच्या दोन लाख जाती होत्या. अनेक प्रांतांत तर खाचरागणिक वेगळी जात होती. ही निसर्गाची व त्याचा आदर करणाºया कल्पक भारतीय शेतकºयांची किमया होती.

शेतकरी हजारो वर्षे भुकेसाठी अन्न  पिकवत होते. जसे की, ते इतर प्राणिमात्रांसाठी असते. मात्र, हरित क्रांतीने बाजारासाठी धान्य पिकवण्याची कल्पना रुजवली. त्यातून दुप्पट, तिप्पट उत्पादनाद्वारे मोठे उत्पन्न मिळवण्याची इच्छा आली. पूर्वी अन्न उत्पादन हा हेतू होता. आता पैशांचे उत्पन्न हा हेतू बनला. हे हवा व पाण्यांप्रमाणे असलेली अन्न ही मूलभूत गरज भागवण्यासाठी नव्हते. उलट, असा शहरी समाज वाढवला जात आहे,  जो हवा, पाणी व अन्न एव्हढ्याच इतर प्राणिमात्रांप्रमाणे आपल्या गरजा आहेत हे विसरून गेला आहे. त्या सहज भागत असल्याने कृत्रिमरीत्या उद्योगातून बनलेल्या असंख्य वस्तू चलनाद्वारे मिळविण्याच्या मागे लागला आहे. त्याला ‘आधुनिक जीवनशैली’ असे गोंडस नाव दिले आहे. हा उदरनिर्वाह नाही. कार, टीव्ही, संगणक, मोबाईल इत्यादी वस्तुनिर्वाह आहे. मात्र, यांना जगवणारा, मूलभूत गरज असलेले अन्न पिकवणारे शेतकरी मात्र, यांच्या एखाद्या महिन्याच्या पगारापेक्षाही कमी रकमेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करू लागले. अशी विषम बेगडी व्यवस्था बदलण्याचा तो प्रयत्न करीत नाही. समाजदेखील ही खोटी, अन्यायकारक, अशाश्वत व्यवस्था बंद करू, असे म्हणत नाही. कर्जमाफी, खत, वीज, पाणी, बियाणे घरे इ. फुकट किंवा सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी मागण्या होत आहेत. मरत असलेल्या शेतकºयांना कर्जमाफी तर हवीच; परंतु खते, वीज, पाणी, बियाणी कशाला? यामुळे तो पुन्हा औद्योगिकीकरणाने निर्माण केलेल्या सापळ्यात अडकतो. यापूर्वी हजारो वर्षांत त्याने अशा मागण्या त्या वेळच्या सत्ताधारी राजांकडे केल्या नव्हत्या. तो स्वावलंबी, स्वतंत्र होता. तोच राजा होता. त्याच्या गावांच्या स्वयंपूर्णतेमुळे भारतात स्वराज्य होतेच. 

टॅग्स :environmentपर्यावरणWorld Environment DayWorld Environment Day