शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

यंग क्लायमेट चॅम्पियन्ससोबत हवामान कृतीकडे दृष्टीक्षेप या विषयावरील कार्यशाळेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:38 IST

युथ की आवाजकडून १ आणि २ फेब्रुवारी २०२० रोजी क्लायमेट अ‍ॅक्शन या विषयावर दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन वायएमसीए , मुंबई सेंट्रल येथे केले जात आहे.

मुंबई - युथ की आवाजकडून १ आणि २ फेब्रुवारी २०२० रोजी क्लायमेट अ‍ॅक्शन या विषयावर दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन वायएमसीए , मुंबई सेंट्रल येथे केले जात आहे. या वेळी विविध क्षेत्रात भारताने शून्य ऊत्सर्जन साध्य करावे यासाठी निर्णयकर्त्यांकडून मागणी करणाऱ्या डिजिटल मोहिमांच्या निर्मितीत वापरली जाणारी शक्तिशाली सोशल मीडिया कौशल्ये तरूणांना शिकता येतील. 

पुढील काही महिन्यांत तयार होणाऱ्या काही सर्वोत्तम मोहिमांना ५०,००० रूपयांची फेलोशिप देण्यात येईल जेणेकरून ते आपल्या मोहिमा दीर्घकाळ चालवू शकतात आणि आपल्या मागणीला पाठिंबा देणारे जास्त लोक जमा करू शकतात. अभिर भल्ला (१८), नवी दिल्ली, पूजा जैन (२६), मुंबई, लिली पॉल (२४), नवी दिल्ली, चैतन्य प्रभू (२१), मुंबई, साहित्य पलंगंदा पूनाचा (२३), बंगळुरू, रिझवान पाशा (२७) चेन्नई असे काही तरूण या कार्यशाळेत सहभागी होणार असून ते अनेक वर्षांपासून वैयक्तिकरित्या हवामान कृती आणि शाश्वतेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 

दोन दिवसांमध्ये या तरूणांना आपले समस्या विधान स्पष्ट करून ऑनलाइन मोहीम कशी तयार करायची, निर्णयकर्त्यांसमोर ठेवण्यासाठी आपली मागणी कशी तयार करायची, आपल्या लक्ष्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणे, आपला आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करायचा, आणि ते प्रसारमाध्यमे आणि शासनाच्या विविध पातळ्यांवरील, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपासून ते शासकीय अधिकारी असलेल्या निर्णयकर्त्यांवर कृतीच्या मागणीसाठी कसा प्रभाव टाकू शकतात याचे प्रशिक्षण दिले जाईल.     युथ की आवाजचे संस्थापक आणि मुख्य संपादक अंशुल तिवारी म्हणाले की, आता आपण हवामानाबाबत कृती करण्यासाठी अधिक गंभीर झाले पाहिजे आणि आपल्या निर्णयकर्त्यांनाही गंभीर राहण्याची मागणी केली पाहिजे. जगभरात तरूण लोक हवामानाबाबत कृतीची चळवळ चालवत आहेत आणि भारतातही आपल्या भविष्याबाबत चिंतित असलेले लाखो विद्यार्थी आहेत. आता सरकारने तरूणांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे थांबवणे आणि हवामान बदलाविरोधात काम करणे गरजेचे आहे. हा कार्यक्रम आणि आमचा प्रकल्प या दिशेने एक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आहे. 

भारत हा चीन आणि अमेरिकेसारख्या विकसित देशांनंतर ग्रीनहाऊस गॅस (सीएचजी) ऊत्सर्जन करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा देश आहे. जीवाश्म इंधनांच्या ज्वलनाचा दर वाढत असल्यामुळे कार्बन डाय ऑक्साइड आणि इतर धोकादायक वायूंसारख्या ग्रीनहाऊस वायूंचे ऊत्सर्जन वाढू लागले आहे. त्यामुळे ओझोन पट्ट्याचे नुकसान झाले असून पृथ्वीचे तापमानही वाढू लागले आहे. याच दृष्टीकोनातून भारतात ऊर्जा, वाहतूक, कृषी आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांमधून कार्बनचे ऊत्सर्जन कमी करण्यासाठी शाश्वत आणि सुस्पष्ट धोरणाची कमतरता जाणवते.    या कार्यशाळेतून भारतात कार्बन डाय ऑक्साइडचे ऊत्सर्जन कमी करण्यासाठी पद्धतशीर बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि या समस्यांवर आपल्या जाहिरात मोहिमेद्वारे काम करणाऱ्या १८-३० वर्षे वयोगटातील तरूण कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जाईल. भारत नोव्हेंबर २०२० पर्यंत हवामान बदलावरील दीर्घकालीन धोरण अंतिम करण्यासाठी सज्ज होत असताना या अ‍ॅक्शन नेटवर्क कार्यशाळेतून विविध क्षेत्रांमध्ये कार्बन ऊत्सर्जन कमी करण्यासाठी भर देण्यावर प्रभाव टाकण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. मुंबईतील कार्यशाळेसाठी निवडण्यात आलेले अ‍ॅक्शन नेटवर्कचे फेलो देशभरातून आलेले आहेत. त्यांची भारतातील विविध क्षेत्रांमध्ये वाढत्या कार्बन ऊत्सर्जनाकडे लक्ष वेधून घेणाऱ्या मोहिमा तयार करण्यासाठीचे स्वारस्य आणि कल यांच्याद्वारे करण्यात आली आहे.

 

टॅग्स :environmentपर्यावरणMumbaiमुंबईStudentविद्यार्थी