शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! वर्षातील दिवस ३६५, संकटे येणार ५६०; २०३० पर्यंत दाहक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 08:17 IST

हवामान बदलांचे परिणाम, उष्णतेचा लाटा तिपटीने वाढणार

नवी दिल्ली : अतिपाऊस, अतिउष्णतामान, अतिथंडी हे चक्र सध्या सुरू आहे. हवामानातील बदलांमुळे निसर्गचक्रात हा बिघाड निर्माण झाला आहे. त्याचे विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. हवामान बदलांचे हे परिणाम २०३० पर्यंत तीव्र होत जाणार असून दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांचा सामना पृथ्वीवासीयांना करावा लागणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात दिला आहे. 

युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन (यूएनडीआरआर) यांनी हा अहवाल तयार केला असून सद्यस्थिती पाहता येत्या आठ वर्षांत जगभरात दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नैसर्गिक संकटांचे हे प्रमाण २०१५ पासून दरवर्षी ४०० असे आहे. 

काय सांगतो अहवाल?२०३० पर्यंत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तिपटीने वाढेल. दुष्काळाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढेल. गरीब देशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल.लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाईल. 

हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांची आताच गंभीर दखल घेणे नितांत गरज आहे. नैसर्गिक संकटांचे प्रमाण कमी कसे होईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसान ‘भूतो न भविष्यति’ असेल. - मामी मिजुटोरी, यूएनडीआरआरच्या प्रमुख.

नैसर्गिक संकटांमुळे १९९० च्या दशकात जगाला ७० अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. आता हे प्रमाण १७० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे. हवामान बदलामुळेच नैसर्गिक संकटेच नव्हे तर कोरोना महासाथ, आर्थिक संकटे व खाद्यान्नांची टंचाई यांमध्येही वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.