शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सावधान! वर्षातील दिवस ३६५, संकटे येणार ५६०; २०३० पर्यंत दाहक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 08:17 IST

हवामान बदलांचे परिणाम, उष्णतेचा लाटा तिपटीने वाढणार

नवी दिल्ली : अतिपाऊस, अतिउष्णतामान, अतिथंडी हे चक्र सध्या सुरू आहे. हवामानातील बदलांमुळे निसर्गचक्रात हा बिघाड निर्माण झाला आहे. त्याचे विपरीत परिणाम मानवी जीवनावर होत आहेत. हवामान बदलांचे हे परिणाम २०३० पर्यंत तीव्र होत जाणार असून दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांचा सामना पृथ्वीवासीयांना करावा लागणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात दिला आहे. 

युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन (यूएनडीआरआर) यांनी हा अहवाल तयार केला असून सद्यस्थिती पाहता येत्या आठ वर्षांत जगभरात दरवर्षी किमान ५६० नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागणार असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नैसर्गिक संकटांचे हे प्रमाण २०१५ पासून दरवर्षी ४०० असे आहे. 

काय सांगतो अहवाल?२०३० पर्यंत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण तिपटीने वाढेल. दुष्काळाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढेल. गरीब देशांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल.लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाईल. 

हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांची आताच गंभीर दखल घेणे नितांत गरज आहे. नैसर्गिक संकटांचे प्रमाण कमी कसे होईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसान ‘भूतो न भविष्यति’ असेल. - मामी मिजुटोरी, यूएनडीआरआरच्या प्रमुख.

नैसर्गिक संकटांमुळे १९९० च्या दशकात जगाला ७० अब्ज डॉलरचे नुकसान झाले होते. आता हे प्रमाण १७० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहे. हवामान बदलामुळेच नैसर्गिक संकटेच नव्हे तर कोरोना महासाथ, आर्थिक संकटे व खाद्यान्नांची टंचाई यांमध्येही वाढ होत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.