शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

यंदा पुस्तकाविना शाळा होणार सुरू; बालभारतीकडून छपाई कमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:54 IST

राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई केले जाते; परंतु पुस्तक छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. मात्र, यंदा बालभारतीकडून पुरेशा पुस्तकांची छपाईच झाली नाही. त्यामुळे मंगळवारपासून (दि.१५) पुस्तकाविना शाळा होणार आहेत.

राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई केले जाते; परंतु पुस्तक छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बालभारतीला सुमारे दोन कोटी पुस्तकांची छपाई करता आली नाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकच पडले नाही. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात कोरी करकरीत पुस्तके दिली जातात. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना हा आनंद मिळणार नाही. त्यातच पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळांना विद्यार्थ्यांची मागील वर्षाची पुस्तके जमा करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यंदा जुनीच पुस्तके मिळणार आहेत.जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील शाळांनासुद्धा विद्यार्थ्यांना निकाल वाटप करताना त्यांच्याकडून जुनी पुस्तके जमा करून घ्यावीत, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात किती जुनी पुस्तके जमा झाली आहेत किंवा यापुढील काळात ही जुनी पुस्तके जमा केली जाणार आहेत, हे पहावे लागणार आहे.

पुस्तकांशिवाय ऑनलाइन शिक्षणशाळांबरोबरच बाजारातही काही पुस्तकांचा तुटवडा आहे. इयत्ता सहावीची इंग्रजी माध्यमाची इतिहास आणि इंग्रजी या विषयाची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शाळा सुरू झाल्या असल्यातरी विद्यार्थ्यांना पुस्तकांविनाच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Schoolशाळा