शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरीत प्रवेश नेमका द्यायचा कोणाला ? अडीच की तीन वर्षे; वयाबाबत संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 08:40 IST

- रेश्मा शिवडेकर  लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यभरात बहुतांश शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश ...

- रेश्मा शिवडेकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यभरात बहुतांश शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली, तरी विद्यार्थ्यांच्या वयाबाबत असलेला संभ्रम कायम आहे. अडीच वर्षे पूर्ण झालेल्या मुलाला नर्सरीत प्रवेश द्यायचा की तीन, याबाबत शाळांमध्ये गोंधळाचे वातावऱण असून हा संभ्रम तातडीने दूर करण्याची मागणी होत आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या वयासंबंधीच्या नियमानुसार सध्या साडेपाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश देता येतो. कारण ,शिक्षण हक्क कायद्यानुसार वय वर्षे सहापर्यंतचे शिक्षण कायद्याच्या चौकटीत येत नाही. शाळा याचा फायदा घेत अडीच वर्षांच्या मुलांनाही नर्सरीत प्रवेश देतात. दुसरीकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार नर्सरीकरिता वय वर्षे तीन पूर्ण केलेली असावी. जेणेकरून मूल पहिलीत येईपर्यंत ते सहा वर्षांचे असेल. परंतु, त्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणविषयक कायदा करणे आवश्यक आहे. त्यामुळे  नर्सरीसह, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी शिक्षणाचेही नियमन होईल.

 बदल लवकरच होणार   महाराष्ट्रात वयाबाबतच्या जुन्याच नियमांचा आधार घेतला जात आहे. म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुरूप त्यात बदल करण्याची मागणी ‘अर्ली चाईल्डहुड असोसिएशन -प्राथमिक शिक्षण आणि संशोधन संस्थे’च्या अध्यक्ष डॉ. स्वाती पोपट-वत्स यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे. राज्यपालांनी यात हस्तक्षेप करून कायद्यात बदल करण्याची सूचना राज्य सरकारला करावी, असे वत्स यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. या संभ्रमाबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, तीन वर्षे पूर्ण झालेल्यांनाच नर्सरीत प्रवेश देणे शाळांना बंधनकारक असेल. २०२४-२५ पासून हा बदल लागू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. 

मुलांच्या वयातील फरक अवघ्या तीन ते सहा महिन्यांचा असला, तरी या वयात त्यांना ज्या पद्धतीने शिकविले जाते त्याचा परिणाम त्यांच्या भाषा, सामाजिक-भावनिक विकासावर होतो. पुढे अनेक हानीकारक परिणामांना आयुष्यभर त्यांना सामोरे जावे लागते.- स्वाती पोपट-वत्स

टॅग्स :Schoolशाळा