शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अभ्यासक्रम पूर्ण कधी होणार? अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्याने महाविद्यालय प्रशासनासमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 06:07 IST

मुंबई विभागात या माध्यमातून आतापर्यंत रोज दीडशे- दोनशे हून अधिक विद्यार्थी प्रवेशित होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दैनंदिन गुणवत्ता फेरीच्या माध्यमातून सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, मुंबई विभागातून रोज १०० हून अधिक विद्यार्थी या माध्यमातून प्रवेश घेत आहेत. ही प्रक्रिया येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या काळात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पूर्ण करून घ्यायचा? या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी घ्यायच्या आणि अकरावीचे शैक्षणिक स्तर कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न आता महाविद्यालयांकडून उपस्थित केला जात आहे. 

२१ ऑक्टोबरपासून दिवाळी सुट्टीला सुरुवात होणार असल्याने, त्या आधी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा महाविद्यालयीन प्रशासनाला पूर्ण करून घ्यायच्या असतात. त्यामुळे महाविद्यालयीन प्रशासन आता उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रवेश प्रक्रियेमुळे कोंडीत सापडले आहे.दैनंदिन गुणवत्ता फेरीची ही सुविधा १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, सायंकाळी ७ ते सकाळी ९ पर्यंत विद्यार्थ्यांना या दरम्यान प्रवेशासाठी अर्ज करता येतो. त्याच दिवशी विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेशाची निश्चिती ही करता येते. 

मुंबई विभागात या माध्यमातून आतापर्यंत रोज दीडशे- दोनशे हून अधिक विद्यार्थी प्रवेशित होत आहेत. प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी असली, तरी या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचे आव्हान आता प्राचार्य आणि शिक्षकांपुढे उभे राहिले आहे. दिवाळीपूर्वी परीक्षा पूर्ण करून घ्यायच्या असल्याने, अनेक महाविद्यालयांनी परीक्षांचे नियोजन केलेले आहे. मात्र, नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे आणि केव्हा करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. 

आतापर्यंतच्या दैनंदिन फेऱ्यांमधून १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश या प्रवेश फेरीच्या दरम्यान कोटा आणि द्विलक्षी प्रवेश प्रक्रियाही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  दुबार प्रवेश घेणारे किंवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल, असे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या दैनंदिन गुणवत्ता फेरीमधून मुंबई विभागात १० हजारांहून पुढील प्रवेश निश्चित झाले आहेत. 

टॅग्स :collegeमहाविद्यालय