शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

नापास झालात म्हणून काय झालं? अंधारवेळा येतात-जातात, त्यात आपण कशाला हरवायचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 08:21 IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीवेळा नकारात्मक गोष्टी येतात, पुढे अंधार दिसायला लागतो; पण उजेडाच्या वेळाही प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काहीवेळा नकारात्मक गोष्टी येतात, पुढे अंधार दिसायला लागतो; पण उजेडाच्या वेळाही प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच...

अभ्यास, करिअर या सगळ्या आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टी आहेत; पण नेमकं काही मुलांच्या बाबतीत त्या तितक्याशा सकारात्मक राहात नाहीत. याचं कारण नकारात्मक शब्दांची मालिका अभ्यासाला जोडून आलेली असते. जसं, माझं बरोबर असेल का, माझा अभ्यास झाला नव्हता, खूप चुकलं असेल का, भविष्याबद्दलची अपार भीती, वर्तमानात योग्य विचार करू न शकणं,  अभ्यास, करिअर, दडपण, ओझं... अशा या नकारात्मक शब्दांच्या आणि भावनेच्या गुंत्यात आपण केव्हा अडकत जातो, हे कोणालाच समजत नाही. 

या नकारात्मकतेत राहणं कोणासाठीच योग्य नाही. म्हणून कायम अनेक पर्यायांचा विचार करून ठेवायचा असतो. पर्याय आपल्याला हे सांगतात की, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर दुसरी गोष्ट आहे. ती करता येण्यासारखी आहे. यातून मनाला उभारी मिळते. 

आपल्याकडे दहावी आणि बारावी या शब्दांना खूप महत्त्व आलेलं आहे. पण त्यातून बहुतांश मुलांचं नुकसानच जास्त होतं, हे लक्षात आल्यामुळे त्याचं महत्त्व कमी करण्याचाही प्रयत्न सातत्याने विविध पातळ्यांवर होत असतो. उदाहरणार्थ, गुणवत्ता यादी बंद करणं हे फार महत्त्वाचं पाऊल होतं. आता विविध विषयांच्या सीईटी होतात. बारावीला गुण कितीही असले तरी सीईटी असतेच. तिथे आपल्याला लगेच पुन्हा प्रयत्न करता येतात. 

मुख्यत: लेखन, वाचन, स्मरणशक्ती यावर या परीक्षा आधारित असतात. या तीन कौशल्यांवर आधारित अनेक परीक्षा आपण देऊ शकतो. त्यात छान पद्धतीने यशस्वीही होऊ शकतो; पण आयुष्य या तीन गोष्टींपुरतं मर्यादित नसतं. त्यासाठी सहनशक्ती, उद्योजकता, सृजनशीलता, आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची क्षमता अशा अनेक गोष्टी जमल्या पाहिजेत. कधी कोणती गोष्ट लागेल, हे सांगता येत नाही. 

आपण या गोष्टी जमवायच्या ठरवल्या की त्या जमतात. आयुष्य जमून येण्यासाठी हेच आवश्यक असतं. अंधाराच्या वेळा येतात आणि जातात... त्या अंधारात हरवून जायचं नाही; आपला आपण उजेड करायचा एवढं ठरवलं तरी पुरे आहे!  

पालकांनी लक्षात ठेवावं...मुलांना ताण असतोच, त्यांनी चेहऱ्यावर किंवा वर्तनातून  दाखवला, नाही दाखवला तरी ताण असतोच. त्यात आपण नकारात्मक शब्द बोलत राहिलो, तर तो ताण अजून वाढतो. नकारात्मक भावना अजून वाढतात आणि मुलं विचार करत करत कुठे जाऊन पोहोचतील आणि काय कृती करतील, हे सांगता येत नाही.   

या काळात मुलं बहुतेकवेळा पालकांच्या आसपास असतात. कारण शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी असते. अशावेळेला शब्द जपून वापरा. सगळं नीट होईल, आयुष्य कधी थांबत नसतं, अडचणी आल्या तरी त्यातून वाट काढायची असते, कोणतीच परीक्षा कधीच अंतिम नसते, एक दार बंद झालं तर दुसरी अनेक दारं उघडत असतात, अनेक शक्यता निर्माण होत असतात... अशा शब्दांची पेरणी अधूनमधून करत राहायला हवी. कारण  हे सकारात्मक शब्द आहेत. जीवन कसं जगायचं असतं, हे दर्शविणारे हे शब्द आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंदूत ‘आनंदाची रसायनं’ निर्माण करणारे हे शब्द आहेत.- डॉ. श्रुती पानसे, करिअर समुपदेशक

टॅग्स :Educationशिक्षणSSC Resultदहावीचा निकाल