शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Union Budget 2022 : देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा, नोकरीच्या संधीसाठी पोर्टल लाँच होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 16:24 IST

Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी देशात शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. अर्थसंकल्पात मांडलेल्या अनेक घोषणांबाबत चर्चा केली जात आहे. शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना अर्थमंत्र्यांनी देशातील पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणा केली असून, शिक्षणाशी संबंधित जुन्या योजनांमध्येही बदल केले आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, यासाठी देशात शिक्षण देण्यासाठी डिजिटल विद्यापीठाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यासोबतच हे डिजिटल विद्यापीठ 'हब अँड स्पोक मॉडेल'च्या आधारे उभारण्यात येणार असल्याची माहितीही निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

याचबरोबर, PM eVIDYA योजनेचा 'वन क्लास वन टीव्ही चॅनल' कार्यक्रम आता 12 वरून 200 टीव्ही चॅनेलवर वाढवला जाईल. या कार्यक्रमात अनेक भारतीय भाषांचा समावेश केला जाईल, असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सरकारचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे नुकसान झाले आहे, त्यांना शिक्षण देणे सोपे होईल.

नोकरीच्या संधी मिळतीलउद्योगाच्या बदलत्या गरजांनुसार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कमध्ये सुधारणा केली जाईल, असेही अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगण्यात आले आहे. यासोबतच डिजिटल इकोसिस्टम फॉर स्किलिंग अँड लाइव्हलीहूड नावाचे ई-पोर्टल देखील सुरू केले जात आहे, जेणेकरून लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Educationशिक्षणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनdigitalडिजिटल