शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दप्तराचे ओझे चालेल, पण निर्णय आवरा ...! 

By सीमा महांगडे | Updated: November 7, 2022 06:47 IST

कोविडमध्ये शिक्षण क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले.

कोविडमध्ये शिक्षण क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकार अभ्यासपूर्ण बदल करेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र शिक्षण विभागाकडून बालिश निर्णयांची सरबत्ती सुरू आहे. ज्या पाठीवरच्या ओझ्याने मुलांना बेजार करून ठेवले त्याला उपाय म्हणून शिक्षणमंत्र्यांनी सुचविलेल्या पर्यायाने आता शिक्षण व्यवस्थाच बेजार झाली आहे. 

मुलांचे पाठीवरचे ओझे कमी करण्याच्या प्रयत्नात सरकार मुलांच्या गृहपाठाला, उजळणीला चौकटीत बंदिस्त करत आहे. त्यातून पुस्तके पुन्हा वापरण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. त्यामुळे शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांकडून शिक्षणमंत्र्यांच्या या कल्पनेला विरोध होत आहे. बालभारतीकडूनही यासाठी होणाऱ्या सर्वेक्षणाला शिक्षक, मुख्याध्यापकांकडून सुमार प्रतिसाद मिळत आहे.

पुस्तकासोबत वहीची पाने जोडली तर कमी पानांमध्ये मुलांना लिहायला, त्यांच्या नोंदी करायलाही कमी जागा मिळेल. एकदा वापरलेली पुस्तके पुढील वर्षीच्या किंवा त्यानंतरच्या मुलांना अभ्यासक्रम बदल होईपर्यंत वापरता येणार नाहीत. लिहून वापरलेले पुस्तक आनंदाने वापरण्याची शक्यताही नाही. एक पुस्तक दुसऱ्या मुलासाठी वापरणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबाला यामुळे भुर्दंड पडेल तो वेगळाच. शिवाय पुस्तकातच वाढलेल्या पानांच्या संख्येने पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार, हे वेगळे सांगायची गरज नाहीच.

विद्यार्थी- शिक्षक- पालक या सर्व घटकांचा विचार करत शिक्षण विभागाने ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयातून फक्त गोंधळ निर्माण होत आहे. सध्या सुरू असलेल्या कामकाजाबद्दल विनाकारण नाराजी वाढत आहे. कोणताही निर्णय घेताना त्याचा आढावा घेऊन, दूरगामी परिणामांचा अभ्यास गरजेचा आहे हे शिक्षणमंत्र्यांनी समजून घ्यावे. यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून उपाययोजना सुचवायला हव्यात. नियोजन करायला हवे, तरच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील किलो- किलोचे ओझे कमी होण्यास मदत होईल.

शिक्षण विभाग या प्रश्नांची उत्तरे देणार का?     वर्षाच्या सुरुवातीला जिथे अनेक ठिकाणी बालभारतीच्या मोफत पाठ्यपुस्तके मिळण्यास उशीर होत असतो तिथे पाने जोडलेली पुस्तके वेळेवर कशी मिळणार?     पुस्तकेच नसतील तर अभ्यासाला सुरुवात कधी करणार?     स्वतंत्र वह्यांऐवजी पुस्तके तपासणीसाठी शिक्षकांकडे गेली तर विद्यार्थी त्या काळात काय करणार?    गणितासाठी चौकटीच्या आणि इतर विषयांसाठी रेघेच्या वह्या पुस्तकात सरकार कशा देणार?

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र