शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरल प्रणालीत नोंदविलेल्या नववीच्या गुणांचा दहावीला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:39 IST

यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय १०० गुणांनुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येईल.

मुंबई : शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार ५० टक्के अंतर्गत मूल्यांकनासाठी त्यांच्या मागील वर्षीच्या म्हणजेच नववीच्या अंतिम निकालाचा आधार घेतला जाईल. सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीनुसार ५० टक्के गुण दिले जातील.यंदा दहावीची परीक्षा देणे अपेक्षित असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० ला नववीची परीक्षा दिलेल्या राज्यातील १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांची माहिती सरळ प्रणालीत नोंद केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. २०१९-२० ला नववीला असलेल्या या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ९४.६९ टक्के म्हणजेच १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी राज्यात उत्तीर्ण होते. त्यापैकी केवळ १.२५ टक्के म्हणजेच जवळपास २४ हजार १०७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ४ टक्के म्हणजे ७८ हजार विद्यार्थ्यांच्या माहितीची नोंद सरल प्रणालीत नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय १०० गुणांनुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येईल. गेल्या म्हणजेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. मात्र, त्यापूर्वी नववीच्या विद्यार्थ्यांची दोन चाचणी परीक्षा आणि सहामाही परीक्षा झाली होती. त्याआधारे नववीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून, त्याची नोंद सरल प्रणालीत आहे. सर्व राज्यातील पालघर, ठाणे आणि मुंबई पालिका विभाग वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील २०१९-२० वर्षाचा नववीचा निकाल हा ९० टक्क्यांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. या ३ जिल्ह्यांचा निकालही ८५ टक्क्यांहून अधिकच आहे. यंदाचा निकाल विद्यार्थ्यांना नववीच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित असाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागतच होत आहे.काही महत्त्वाच्या जिल्ह्यांतील नववीच्या मूल्यमापनाची आकडेवारी (२०१९-२०)जिल्हा    विद्यार्थीसंख्या    उत्तीर्णतेचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)    अनुत्तीर्णमुंबई (पालिका)    १८,४२४    ८६.०२    ६. ५९मुंबई (डीव्हायडी)    १,५६,८२९    ९३    २.८५ठाणे    १,४३,६८६    ८८. २०    ३. ०३