शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कार्बन डायऑक्साइड नियंत्रणावर तंत्रज्ञान; IIT मुंबईचे विद्यार्थी ठरले ८५ लाखांचे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 06:03 IST

एक्स्प्राइज कार्बन रिमूव्हल आणि एलन मस्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या २३ चमूंमध्ये आयआयटी मुंबईच्या या चमूचा सहभाग आहे. 

मुंबई : औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर व्यावसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या टीमची तब्बल ८५ लाखांच्या बक्षिसासाठी निवड झाली आहे. 

एक्स्प्राइज कार्बन रिमूव्हल आणि एलन मस्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या २३ चमूंमध्ये आयआयटी मुंबईच्या या चमूचा सहभाग आहे. या चमूमध्ये श्रुती भामरे, श्रीनाथ अय्यर, अन्वेषा बॅनर्जी आणि शुभम कुमार या चार विद्यार्थ्यांचा समावेश असून प्राध्यापक अर्णब दत्त आणि प्राध्यापक विक्रम विशाल यांनी  मार्गदर्शन केले आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर मार्गदर्शन होणे ही काळाची गरज आहे. तापमानवाढीसाठी मोठ्या प्रमाणात होणारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन प्रमुख कारण असून मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडसारखे ग्रीनहाऊस वायूही कारणीभूत आहेत.

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या तंत्रज्ञानात पहिल्या टप्प्यांत उद्योगातून वायुरूपात असलेल्या कार्बन डायऑक्साइडला वेगळे करणे आणि दुसऱ्या टप्प्यांत त्याचे महत्त्वाच्या रसायनांमध्ये रूपांतर करणे याचा समावेश आहे. हा पुरस्कार जिंकणारी देशातील आयआयटी मुंबई ही एकमेव संस्था ठरली आहे. एक्सप्राइझ आणि एलन मस्क फाउंडेशनने एप्रिल महिन्यात सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. 

या तंत्रज्ञान निर्मितीनंतर, कार्बन उत्सर्जनानंतर त्याच्यामधून विविध रसायनांच्या निर्मितीसाठी जे व्यापक वापरासाठी उपयुक्त असतील, स्वस्त, किफायतशीर असतील आणि भरपूर काळ टिकणारी शाश्वत असतील अशा उत्पादन निर्मितीमध्ये भारत महत्त्वाची भूमिका जगात बजावू शकेल, अशी प्रतिक्रिया शुभम कुमार या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान, उत्सर्जन कमी करून तापमानवाढीची समस्या कमी होणार नसून त्या कार्बन डायऑक्साइडला नियंत्रित करणे किंवा त्याचा नाश करून इतर निर्मितीला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम विशाल यांनी दिली. औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक तापमानामध्ये १.१ अंश सेल्सिअसने वाढल्याचे समोर आले आहे. कार्बन डायऑक्साइडच्या उगमाच्या ठिकाणीच रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे दत्ता यांनी सांगितले.

प्रत्यक्ष प्रयोग करवा लागणारया चार वर्षांच्या या स्पर्धेत या चमूची आता निवड झाली आहे त्यांना आता त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर त्यांना अंतिम बक्षीस मिळणार आहे.