शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कार्बन डायऑक्साइड नियंत्रणावर तंत्रज्ञान; IIT मुंबईचे विद्यार्थी ठरले ८५ लाखांचे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 06:03 IST

एक्स्प्राइज कार्बन रिमूव्हल आणि एलन मस्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या २३ चमूंमध्ये आयआयटी मुंबईच्या या चमूचा सहभाग आहे. 

मुंबई : औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर व्यावसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या टीमची तब्बल ८५ लाखांच्या बक्षिसासाठी निवड झाली आहे. 

एक्स्प्राइज कार्बन रिमूव्हल आणि एलन मस्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या २३ चमूंमध्ये आयआयटी मुंबईच्या या चमूचा सहभाग आहे. या चमूमध्ये श्रुती भामरे, श्रीनाथ अय्यर, अन्वेषा बॅनर्जी आणि शुभम कुमार या चार विद्यार्थ्यांचा समावेश असून प्राध्यापक अर्णब दत्त आणि प्राध्यापक विक्रम विशाल यांनी  मार्गदर्शन केले आहे. वाढत्या तापमानवाढीमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर मार्गदर्शन होणे ही काळाची गरज आहे. तापमानवाढीसाठी मोठ्या प्रमाणात होणारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन प्रमुख कारण असून मिथेन आणि नायट्रस ऑक्साइडसारखे ग्रीनहाऊस वायूही कारणीभूत आहेत.

विद्यार्थ्यांनी बनविलेल्या तंत्रज्ञानात पहिल्या टप्प्यांत उद्योगातून वायुरूपात असलेल्या कार्बन डायऑक्साइडला वेगळे करणे आणि दुसऱ्या टप्प्यांत त्याचे महत्त्वाच्या रसायनांमध्ये रूपांतर करणे याचा समावेश आहे. हा पुरस्कार जिंकणारी देशातील आयआयटी मुंबई ही एकमेव संस्था ठरली आहे. एक्सप्राइझ आणि एलन मस्क फाउंडेशनने एप्रिल महिन्यात सुमारे १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. 

या तंत्रज्ञान निर्मितीनंतर, कार्बन उत्सर्जनानंतर त्याच्यामधून विविध रसायनांच्या निर्मितीसाठी जे व्यापक वापरासाठी उपयुक्त असतील, स्वस्त, किफायतशीर असतील आणि भरपूर काळ टिकणारी शाश्वत असतील अशा उत्पादन निर्मितीमध्ये भारत महत्त्वाची भूमिका जगात बजावू शकेल, अशी प्रतिक्रिया शुभम कुमार या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान, उत्सर्जन कमी करून तापमानवाढीची समस्या कमी होणार नसून त्या कार्बन डायऑक्साइडला नियंत्रित करणे किंवा त्याचा नाश करून इतर निर्मितीला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम विशाल यांनी दिली. औद्योगिक क्रांतीनंतर जागतिक तापमानामध्ये १.१ अंश सेल्सिअसने वाढल्याचे समोर आले आहे. कार्बन डायऑक्साइडच्या उगमाच्या ठिकाणीच रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे दत्ता यांनी सांगितले.

प्रत्यक्ष प्रयोग करवा लागणारया चार वर्षांच्या या स्पर्धेत या चमूची आता निवड झाली आहे त्यांना आता त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर त्यांना अंतिम बक्षीस मिळणार आहे.