शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांना मिळाली गतवर्षीची प्रश्नपत्रिका; विधी अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:54 IST

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र विधी शाखेच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र ‘कॉन्स्टिट्यूशन लॉ’ विषयाच्या पहिल्याच पेपरला विद्यापीठाने घातलेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यापीठाने महाविद्यालयांना गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवल्याने परीक्षा तब्बल तासभर उशिराने सुरू करण्याची वेळ महाविद्यालयांवर आली. 

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर देण्यात आलेला पेपर हा गतवर्षीचा असल्याचे लक्षात आले. ही बाब महाविद्यालयांनी तातडीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविली. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा एक तासासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा का पुढे ढकलली याचे उत्तरच मिळाले नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला.

राज्यपाल, मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ  विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदने दिली. परंतु महाराष्ट्रातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या खात्याकडे लक्ष घातल्याचे दिसत नाही.  कारण मुंबई विद्यापीठातील सर्व प्रमुख अधिकारी हे प्रभारी असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याची टीका युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.  

‘जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करा’  ऐन परीक्षेच्यावेळी प्रश्नपत्रिका काढून घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाने योग्य न्याय द्यावा, मात्र जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी मनविसेचे सहसचिव संतोष धोत्रे यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ