शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

School Reopening: ८० टक्क्यांहून अधिक शाळा राज्यात पहिल्याच दिवशी सुरू; लवकरच संख्या वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 07:26 IST

शहरी, ग्रामीण मिळून उपस्थिती ४७ टक्के, शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शाळांमध्ये ग्रामीणमधील आणि शहरी भागातील मिळून ५४ लाख १५ हजार १३६ विद्यार्थी आहेत.स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती

मुंबई : सोमवारपासून राज्यातील शहरी भागात ८ वी ते १२ वी तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी शाळा सुरू झाल्या आहेत. या शिक्षणोत्सवाच्या पहिल्या दिवशीच रात्री ९ पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २० जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून ८३ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत तर ४७ टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा व विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रात्री ९ पर्यंतच्या माहितीमध्ये राज्यातील आणखी काही जिल्ह्यांची माहिती येणे अपेक्षित असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बऱ्याच कालावधीनंतर शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील २० जिल्ह्यातील शाळांच्या माहितीनुसार ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण ३२ हजार १३ शाळा आहेत, त्यापैकी २६ हजार ६९४ शाळा सोमवारी सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये ग्रामीणमधील आणि शहरी भागातील मिळून ५४ लाख १५ हजार १३६ विद्यार्थी आहेत. त्यापैकी सोमवारी २५ लाख ३७ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थिती दर्शविल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला असून विविध पद्धतींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. याचे तंतोतत पालन शाळांमध्ये झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा