शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'मुलाच्या यशाचा सार्थ अभिमान'; महाराष्ट्रातील दोघांना जेईई मेन्समध्ये १०० पर्सेँटाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 07:51 IST

नवी मुंबईचा अथर्व तांबट, नाशिकच्या गार्गी बक्शीचा समावेश

मुंबई : जेईई मुख्य परीक्षेचा मार्च सेशनचा अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर करण्यात आला असून देशातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना यामध्ये १०० पर्सेँटाइल मिळाले. ही संख्या फेब्रुवारी सत्राच्या निकालापेक्षा दुप्पट आहे. यावेळी १०० पर्सेँटाइल स्कोअर करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांपैकी अथर्व अभिजीत तांबट आणि गार्गी मार्कंट बक्शी हे दाेघे महाराष्ट्रातील आहेत. यात दिल्लीच्या सिद्धार्थ कालरा, काव्या चोप्रा, तेलंगणाच्या बन्नूरू रोहित कुमार रेड्डी, मदुर आदर्श रेड्डी आणि जोसयुला व्यंकट आदित्य, पश्चिम बंगालच्या ब्रतिन मंडल, बिहारच्या कुमार सत्यदर्शी, राजस्थानच्या मृदुल अग्रवाल, जेनिथ मल्होत्रा आणि तमिळनाडूच्या अश्विन अब्राहम यांचाही समावेश आहे.

मार्च महिन्यातील परीक्षा एनटीएने १६ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत आयोजित केली होती. सध्या पेपर-१ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात एकूण ६,१९,६३८ उमेदवार सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून १०० पर्सेँटाइल मिळविणारा अथर्व अभिजीत तांबट हा नवी मुंबईचा आहे, गार्गी मार्कंट बक्शीची मुंबईच्या आयआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे.  गार्गी दादर येथील पेस कनिष्ठ महाविद्यालयात ती शिक्षण घेत असून ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बरीच तयारी करून घेतल्याचे गार्गीच्या वडिलांनी सांगितले.  दरम्यान, जेईई-मेन परीक्षा या वर्षी ४ सेशनमध्ये होणार असून यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च सेशनमधील परीक्षा पूर्ण होऊन त्यांचे निकालही जाहीर झाले आहेत.  या चारही परीक्षेतील गुणांच्या आधारावर अंतिम निकाल देण्यात येईल. ही परीक्षा १३ भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू) घेण्यात आली.

'मुलाच्या यशाचा सार्थ अभिमान'  अथर्व अभिजित तांबट यालाही १०० पर्सेँटाइल मिळाले असून त्याला ३०० पैकी ३०० गुण मिळाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आई वडिलांना त्याचा आई वडिलांनी मुलाचा अभिमान वाटत असल्याची वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. नवी मुंबईच्या सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल मधून शिक्षण घेतलेल्या अथर्वने दहावीनंतरच जेईईची तयारी करण्यास सुरुवात केली. आता जेईई ऍडव्हान्ससाठीची त्याची तयारी जोरात सुरु आहे. कोरोनाकाळात त्याने मन लावून अभ्यास केला. व्यवस्थित नियोजनामुळे त्याला भीती वाटली नसल्याची माहिती अथर्वच्या वडिलांनी दिली. पुढे त्याला आयआयटी मुंबईमध्ये कॉम्प्युटर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचे ध्येय त्याने समोर ठेवले आहे. 

टॅग्स :examपरीक्षा