शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रोबोट ‘कुत्रा’ विरुध्द रोबोट ‘खेचर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:33 IST

Technology: नव्या काळात तर भारत चीनसह इतरही बलाढ्य देशांना ‘अरे ला कारे’ करायला शिकला आहे. एक नवी शक्ती म्हणून भारत उदयाला येत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बराच पुढे आहे, पण भारतही त्या दिशेनं आपली पावलं टाकू लागला आहे. भारत-चीन सीमेवर त्याचं प्रत्यंतर येतं आहे. 

‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत चीननं आपल्या पाठीत कसा खंजीर खुपसला होता, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यामुळे भारतानंही एक मोठा धडा घेतला आणि चीनपासून कायम सावधच राहायला हवं ही शिकवण आपल्याला मिळाली. नव्या काळात तर भारत चीनसह इतरही बलाढ्य देशांना ‘अरे ला कारे’ करायला शिकला आहे. एक नवी शक्ती म्हणून भारत उदयाला येत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बराच पुढे आहे, पण भारतही त्या दिशेनं आपली पावलं टाकू लागला आहे. भारत-चीन सीमेवर त्याचं प्रत्यंतर येतं आहे. 

चीननं भारताच्या सीमेवर अलीकडेच रोबोटिक डॉग स्कॉड तैनात केला आहे. चीननं आपल्या सैन्यात या रोबोटिक डॉग्जची ‘भरती’ केली आहे. त्याचे काही व्हिडीओही मध्यंतरी व्हायरल झाले होते. त्यापासून सावध होत आणि त्या दिशेनं पावलं उचलत भारतानंही आता भारत-चीन सीमेवर ‘रोबोटिक आर्मी’ तैनात केली आहे. अर्थात, ही रोबोटिक आर्मी प्रत्यक्ष लढाईवर जाणार नसली तरी सैनिकांना त्यांची फार मदत होणार आहे. भारत-चीन सीमेवरील प्रदेश अत्यंत बर्फाळ, दुर्गम आणि मानवी क्षमतेची कसोटी पाहणारा आहे. कोणतीही वाहनं इथे चालू शकत नाही. त्यामुळे अशा उंचीवर आणि कडाक्याच्या थंडीत सर्व सामानही सैनिकांनाच आपल्या खांद्यावर, पाठीवर वाहून न्यावं लागतं किंवा त्यासाठी प्राण्यांचा वापर करावा लागतो, पण बऱ्याचदा या प्राण्यांचीही अशा ठिकाणी मर्यादा असते. त्यावर मात करण्यासाठी आणि उत्तर शोधण्यासाठी भारतानं ‘रोबोटिक आर्मी’ तयार केली आहे. विशेषत: सामान वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. ही रोबोटिक आर्मी म्हणजे रोबोटिक म्यूल्स- मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट्स आहेत. एका वेळी १५ ते ३० किलो वजन घेऊन हे रोबोट्स दहा फुटांपर्यंतचा उभा चढ अगदी सहजतेनं चढू शकतात. उणे ४० अंश तापमानातही ते क्रियाशील राहू शकतात. रिमोटच्या साहाय्यानंही त्यांना ऑपरेट करता येऊ शकतं. येत्या पाच वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत सामान वाहतुकीचं सुमारे ७० टक्के काम या आर्मीकडे सोपवलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. आपल्याप्रमाणे तंत्रज्ञान कोणालाच बनवता येणार नाही, असं चीनला वाटत होतं, पण भारतानं अल्पावधीत ही ‘रोबोटिक आर्मी’ तयार केल्यानं चीनही आश्चर्यचकित झाला आहे. 

सध्या भारताकडे अशा ७० रोबोटिक म्यूल्सची आर्मी आहे. म्युल म्हणजे खेचर! हळूहळू या आर्मीची भरती वाढवण्यात येईल. उत्तरेला चीन सीमेलगत ही आर्मी तैनात करण्यात आली असून त्यांनी आपलं कामही सुरू केलं आहे. भारतीय रोबोटिक म्यूल्स आर्मी दिसायला ‘रोबोटिक डॉग’सारखीच आहे. ७७व्या राष्ट्रीय लष्कर दिनानिमित्त पहिल्यांदा ही रोबोटिक आर्मी सीमेवर पाहायला मिळाली होती. भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना या आर्मीनं सलामीही दिली. द्विवेदी म्हणाले होते, अत्यंत दुर्गम अशा भारत-चीन सीमेवरील लष्कराच्या अडचणी कमी करण्यासाठी खास या आर्मीची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या काळात भारतीय लष्कराच्या मदतीला यापेक्षाही आधुनिक आणि लष्कराचं प्रत्यक्ष काम करू शकतील अशा ‘ताज्या दमाच्या’ रोबोट्सची भरती केली जाणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानIndiaभारतchinaचीन