शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

रोबोट ‘कुत्रा’ विरुध्द रोबोट ‘खेचर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:33 IST

Technology: नव्या काळात तर भारत चीनसह इतरही बलाढ्य देशांना ‘अरे ला कारे’ करायला शिकला आहे. एक नवी शक्ती म्हणून भारत उदयाला येत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बराच पुढे आहे, पण भारतही त्या दिशेनं आपली पावलं टाकू लागला आहे. भारत-चीन सीमेवर त्याचं प्रत्यंतर येतं आहे. 

‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणत चीननं आपल्या पाठीत कसा खंजीर खुपसला होता, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यामुळे भारतानंही एक मोठा धडा घेतला आणि चीनपासून कायम सावधच राहायला हवं ही शिकवण आपल्याला मिळाली. नव्या काळात तर भारत चीनसह इतरही बलाढ्य देशांना ‘अरे ला कारे’ करायला शिकला आहे. एक नवी शक्ती म्हणून भारत उदयाला येत आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन बराच पुढे आहे, पण भारतही त्या दिशेनं आपली पावलं टाकू लागला आहे. भारत-चीन सीमेवर त्याचं प्रत्यंतर येतं आहे. 

चीननं भारताच्या सीमेवर अलीकडेच रोबोटिक डॉग स्कॉड तैनात केला आहे. चीननं आपल्या सैन्यात या रोबोटिक डॉग्जची ‘भरती’ केली आहे. त्याचे काही व्हिडीओही मध्यंतरी व्हायरल झाले होते. त्यापासून सावध होत आणि त्या दिशेनं पावलं उचलत भारतानंही आता भारत-चीन सीमेवर ‘रोबोटिक आर्मी’ तैनात केली आहे. अर्थात, ही रोबोटिक आर्मी प्रत्यक्ष लढाईवर जाणार नसली तरी सैनिकांना त्यांची फार मदत होणार आहे. भारत-चीन सीमेवरील प्रदेश अत्यंत बर्फाळ, दुर्गम आणि मानवी क्षमतेची कसोटी पाहणारा आहे. कोणतीही वाहनं इथे चालू शकत नाही. त्यामुळे अशा उंचीवर आणि कडाक्याच्या थंडीत सर्व सामानही सैनिकांनाच आपल्या खांद्यावर, पाठीवर वाहून न्यावं लागतं किंवा त्यासाठी प्राण्यांचा वापर करावा लागतो, पण बऱ्याचदा या प्राण्यांचीही अशा ठिकाणी मर्यादा असते. त्यावर मात करण्यासाठी आणि उत्तर शोधण्यासाठी भारतानं ‘रोबोटिक आर्मी’ तयार केली आहे. विशेषत: सामान वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. ही रोबोटिक आर्मी म्हणजे रोबोटिक म्यूल्स- मल्टी युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट्स आहेत. एका वेळी १५ ते ३० किलो वजन घेऊन हे रोबोट्स दहा फुटांपर्यंतचा उभा चढ अगदी सहजतेनं चढू शकतात. उणे ४० अंश तापमानातही ते क्रियाशील राहू शकतात. रिमोटच्या साहाय्यानंही त्यांना ऑपरेट करता येऊ शकतं. येत्या पाच वर्षांत म्हणजे २०३० पर्यंत सामान वाहतुकीचं सुमारे ७० टक्के काम या आर्मीकडे सोपवलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. आपल्याप्रमाणे तंत्रज्ञान कोणालाच बनवता येणार नाही, असं चीनला वाटत होतं, पण भारतानं अल्पावधीत ही ‘रोबोटिक आर्मी’ तयार केल्यानं चीनही आश्चर्यचकित झाला आहे. 

सध्या भारताकडे अशा ७० रोबोटिक म्यूल्सची आर्मी आहे. म्युल म्हणजे खेचर! हळूहळू या आर्मीची भरती वाढवण्यात येईल. उत्तरेला चीन सीमेलगत ही आर्मी तैनात करण्यात आली असून त्यांनी आपलं कामही सुरू केलं आहे. भारतीय रोबोटिक म्यूल्स आर्मी दिसायला ‘रोबोटिक डॉग’सारखीच आहे. ७७व्या राष्ट्रीय लष्कर दिनानिमित्त पहिल्यांदा ही रोबोटिक आर्मी सीमेवर पाहायला मिळाली होती. भारतीय लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांना या आर्मीनं सलामीही दिली. द्विवेदी म्हणाले होते, अत्यंत दुर्गम अशा भारत-चीन सीमेवरील लष्कराच्या अडचणी कमी करण्यासाठी खास या आर्मीची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या काळात भारतीय लष्कराच्या मदतीला यापेक्षाही आधुनिक आणि लष्कराचं प्रत्यक्ष काम करू शकतील अशा ‘ताज्या दमाच्या’ रोबोट्सची भरती केली जाणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानIndiaभारतchinaचीन