शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सीईटी शुल्काचा विद्यार्थ्यांना ‘रिफंड’; शिक्षण मंडळाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 08:54 IST

मागील वर्षी दहावीची परीक्षा अंतर्गत मूल्यमापन धोरणांनुसार घेण्यात आली, त्यामुळे प्रवेशात एकसूत्रीपणा येण्यासाठी मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अकरावी प्रवेशासाठी आयोजित सीईटी रद्द करण्यात आली. त्यामुळे या परीक्षेसाठी घेतलेले नोंदणी शुल्क जवळपास ४४ हजार विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहे. ज्या गेटवेमधून विद्यार्थ्यांकडून नोंदणी शुल्क भरले होते त्याच मार्गाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शुल्काची रक्कम परत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 

मागील वर्षी दहावीची परीक्षा अंतर्गत मूल्यमापन धोरणांनुसार घेण्यात आली, त्यामुळे प्रवेशात एकसूत्रीपणा येण्यासाठी मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात आला होता. परीक्षा रद्द होण्याआधी या सीईटीच्या नोंदणीची प्रक्रिया मंडळाने पूर्ण केली होती. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आणि त्यानुसार परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सीईटीसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आले नव्हते. मात्र, सीबीएसई, सीआयएससीई व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १७८ रुपये शुल्क घेतले होते. सीईटीच रद्द झाल्याने परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी मागणी विद्यार्थी, पालक व संघटनांनी केली होती. इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांकडून सीईटीचे शुल्क त्यांना लवकरच परत करण्यात येणार आहे. 

प्रतिविद्यार्थी १४३ रुपये परतावाराज्य मंडळाच्या संकेतस्थळावर २,०५२ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक या संकेतस्थळावर ४१,५८२ विद्यार्थ्यांना ज्या पेमेंट गेटवेद्वारे व ज्या माध्यमातून परीक्षा शुल्क जमा केले आहे. त्याच मार्गाने प्रतिविद्यार्थी १४३ रुपयांप्रमाणे परीक्षा शुल्काचा परतावा करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.