शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

११वीसाठी ऐच्छिक सीईटी, मूल्यमापनाचा घोळ नको; विद्यार्थ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 07:23 IST

सीईटीत चांगले गुण मिळवणारे आणि ती प्रवेश परीक्षा न देणारे यांचा सारखाच विचार होणार असल्याने या ऐच्छिक परीक्षेला काय अर्थ उरला, असा मुद्दा मांडत शिक्षण विभागाने निर्णय घेताना घोळाची परंपरा कायम ठेवल्याची टीकाही त्यांनी केली आहे.  

मुंबई : दहावीच्या निकालासाठी मूल्यांकनाचे धोरण ठरवताना अंतर्गत मूल्यमापनाचा आधार, त्याला नववीच्या निकालाची दिलेली जोड यामुळे सं‌भ्रम कायम असतानाच अकरावीच्या प्रवेशासाठीची सीईटी ऐच्छिक ठेवल्याच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीईटीत चांगले गुण मिळवणारे आणि ती प्रवेश परीक्षा न देणारे यांचा सारखाच विचार होणार असल्याने या ऐच्छिक परीक्षेला काय अर्थ उरला, असा मुद्दा मांडत शिक्षण विभागाने निर्णय घेताना घोळाची परंपरा कायम ठेवल्याची टीकाही त्यांनी केली आहे.  दहावीचा निकाल जून अखेरपर्यंत लावायचा आहे. शिवाय ज्यांचे अंतर्गत मूल्यमापनाने समाधान होणार नाही, त्यांच्यासाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेचाही पर्याय आहे. मात्र, कोरोनाची स्थिती निवळल्यानंतर ही परीक्षा होणार असल्याने तोवर अकरावीचे प्रवेश पूर्ण झालेले असतील. मग सुधारित गुणांच्या आधारे शाखा बदलता येईल का, तो पर्याय ठेवला तर अकरावीचं वर्ष वेळेत सुरू होईल का, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. अंतर्गत मूल्यमापनात चांगले गुण मिळालेल्यांच्या गुणांचा अकरावीसाठी उपयोग होणार नाही का? सीईटी महत्त्वाची असेल तर ती ऐच्छिक का ठेवली, ती सक्तीची का नाही किंवा रद्दच का केली नाही, यातून फक्त संभ्रम वाढला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शिक्षण विभागाने जो निर्णय दहावी मूल्यांकनाबाबत घेतला आहे, तो नक्कीच चांगला आहे. मात्र, अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी संदर्भातील निर्णय बंधनकारक ठेवावा, असे वाटते. समान गुणवत्तेवरील प्रवेशासाठी ते आवश्यक आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनात ९० टक्क्यांहून अधिक गुण असतील मात्र काही कारणास्तव ते सीईटी देऊ शकले नाहीत तर ते त्यांचे नुकसान असेल, असे मत नवी मुंबईतील नूतन मराठी विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी विवेक खुळे याने व्यक्त केले.आमचा नववीचा निकाल चांगला लागला. त्यावरून आमचे मूल्यमापन होणे योग्यच आहे, मात्र अचानक एमसीक्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने होणाऱ्या सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्यास त्याला जबाबदार कोण? अद्याप सीईटीचे प्रारूप, आराखडा, अभ्यासक्रम काहीच उपलब्ध नसताना ती कशी देणार? असा प्रश्न नेरूळमधील दहावीची विद्यार्थिनी सिद्धी चौधरी हिने उपस्थित केला. दहावीसाठी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली होती, तो अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार का? शिवाय सीबीएसई, आयसीएसईच्या मुलांसोबत सीईटी देताना, त्यांचा अभ्यासक्रम, आमचा अभ्यासक्रम वेगळा असताना समानता कशी आणणार, असा प्रश्नही तिने उपस्थित केला. सीईटी परीक्षेची आमची अद्याप तयारी नाही, शिवाय ताेपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येणार की नाही, त्याबद्दलही सांगता येत नाही, अशी प्रतिक्रिया पांचोलिया हायस्कूलमधील दहावीची विद्यार्थीनी प्रियांका कळंबे हिने दिली आहे.स्वरूप लवकर समजणे गरजेचेशाळेतील शिक्षकांनी दिलेल्या गुणांवर माझा विश्वास आहे. मात्र, अकरावीत लवकर प्रवेश मिळण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार असेल तर किमान तिचे वेळापत्रक आणि कोणत्या विषयाला किती गुणांचे किती प्रश्न असतील, याचे स्वरूप लवकर समजायला हवे. ही प्रवेश परीक्षा सुरक्षित व्हावी.- धनश्री कुलकर्णी, दहावी, नूतन मराठी हायस्कूल