शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

आता नर्सरीसाठीही लागणार परवानगी; शिक्षणमंत्री केसरकरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 07:17 IST

मुले आता एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील. पुस्तकात प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे पान जाेडलेले आहे. त्यावर विद्यार्थी टीपा काढतील, त्यावरून शिक्षकांनी उत्तमरीत्या शिकविले आहे का नाही? याचेही मूल्यमापन हाेणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क  पुणे : ज्युनिअर व सीनिअर केजी, नर्सरी सुरू करताना नियम पाळले जात नाहीत. काेणीही खाेली भाड्याने घेतात आणि विद्यार्थी बसवून नर्सरी सुरू करतात. यावर्षीपासून त्याला चाप बसणार आहे.  नर्सरी  सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.  प्राथमिक शिक्षणात मुलांचा पाया घडताे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम  करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही ते म्हणाले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयाेजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर म्हणाले, पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांच्या वह्या-पुस्तकांच्या ओझ्याचा प्रश्न निकाली काढला आहे. 

मुले आता एकच पुस्तक घेऊन शाळेत जातील. पुस्तकात प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे पान जाेडलेले आहे. त्यावर विद्यार्थी टीपा काढतील, त्यावरून शिक्षकांनी उत्तमरीत्या शिकविले आहे का नाही? याचेही मूल्यमापन हाेणार आहे. परीक्षा नसल्याने पहिली ते आठवीतील मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांचे मूल्यमापन कसे करावे?  यासह सहावीनंतर त्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायचे, याचा विचार करीत आहाेत.  

गुरुवार ते शनिवार सारखा गणवेश काही शाळांनी गणवेशाच्या ऑर्डर दिल्या हाेत्या. त्यामुळे उत्पादन थांबवून जे गणवेश तयार आहेत ते  शाळांना साेमवार ते बुधवार हे तीन दिवस वापरता येतील. तसेच गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांसाठी  सर्वत्र ब्ल्यू शर्ट आणि डार्क ब्ल्यू पँट, बुट, साॅक्स असा गणवेश वापरावा लागणार आहे. कापडाचा दर्जा ठरवून टेंडर काढण्यात येईल. प्रत्येक शाळेपर्यंत कापड पाेहोचविले जाईल. महिला विकास अर्थिक महामंडळ, बचतगटाच्या माध्यमातून गावांतील शासकीय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, साॅक्स, पुस्तके दिली जाणार आहेत, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.  

शालेय विद्यार्थ्यांना स्काउट-गाइड अनिवार्यमुलांना शिस्त लागावी, श्रमाचे महत्त्व कळावे, सामाजिक बांधिलकी विकसित व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना स्काउट-गाइड अनिवार्य करण्यात येणार आहे; तसेच यासाठी शासनाने दिलेले गणवेश वापरता येतील. या कपड्यांवर कवायतही घेतली जाणार असल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. 

स्थगिती उठताच नवीन शिक्षक भरती शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे; परंतु औरंगाबाद खंडपीठाने सुमाेटाे पाच जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती उठल्यानंतर  ३० हजार शिक्षक भरती करण्यात येतील. सर्व शाळांना शिक्षक मिळतील, असेही शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :Schoolशाळा