शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

समान गुण असले तरी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’; अकरावीसाठी काही निकषांत बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 05:31 IST

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ...

मुंबई :यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या समान गुणांच्या आधारे प्रवेश देताना जन्मदिनांकापासून ज्येष्ठ विद्यार्थी अगोदर याप्रमाणे क्रम आणि जन्मदिनांक समान असल्यास विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (म्हणजे नाव, वडिलांचे नाव, आडनाव) इंग्रजी घेऊन त्या वर्णाक्षरांच्या क्रमानुसार क्रम ठरविण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुण समान असले तरी विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अडचण येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणांप्रमाणे यंदा या प्रवेशाच्या कार्यपद्धतीत शासनाने बदल केले आहेत. अकरावी प्रवेशातील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) सामान्य प्रशासन विभागाच्या ५ जुलै, २०२१ च्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय  इनहाऊस कोट्यांतर्गत प्रवेश कोणत्याही टप्प्यावर करण्याची व प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहसचिव इ. मु. काझी यांनी दिल्या आहेत.

२८ मार्च २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वसई व भिवंडी तालुका व पनवेल (ग्रामीण) हा भाग तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोशी, चऱ्होली, चिखली, दिघी, डुडूळगाव या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नव्हते. मात्र यंदा या गावांचाही प्रवेश प्रक्रियेत समावेश करावा, अशा सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण संचालनालयाने आवश्यक ती कार्यवाही करून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.आता एका फेरीसाठी प्रतिबंधितप्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी आणि महाविद्यालयाने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येऊन चौथ्या विशेष फेरीत संधी देण्यात येत असे. मात्र या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नवीन निकषांप्रनुसार या विद्यार्थ्यांना पुढच्या केवळ एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येऊन त्यानंतरच्या फेरीसाठी संधी द्यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण