शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

१०४ वर्षीय आजीबाईंची कमाल, राज्य साक्षरता परीक्षेत ८९ टक्क्यांनी उत्तीर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 16:27 IST

दृढ निश्चय आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही मोठ्या संकटावर आपल्याला मात करता येते.

दृढ निश्चय आणि ध्येय निश्चित असेल तर कोणत्याही मोठ्या संकटावर आपल्याला मात करता येते. कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येतं. केरळच्या अम्मा कुट्टियम्मा (Kuttiyamma) यांनीही असाच कारनामा केला आहे. शिक्षणाला वयाची अट नसते अम्मांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. कोट्टायम जिल्ह्यातील रहिवासी असेलल्या १०४ वर्षीय कुट्टियम्मा यांनी राज्य सारक्षता परीक्षेत १०० पैकी ८९ गुण मिळवून आदर्श निर्माण केला आहे. 

केरळचेशिक्षणमंत्री वायुदेवन शिवनकुट्टी (Vasudevan Sivankutty) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर राज्य सरकार अंतर्गत आयोजित एका परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १०४ वर्षीय कुट्टियम्मा यांचा फोटो ट्विट केला आहे. केरळ राज्य शिक्षा मिशन आणि राज्य सरकारकडून राज्यात साक्षरता मिशन राबवलं जातं. राज्यातील प्रत्येक नागरीक साक्षर व्हावा, चांगलं शिक्षण आणि शिक्षणाला वयाचं बंधन नसावं यांना प्रोत्साहन देण्याचं काम या योजनेअंतर्गत केलं जातं. 

कुट्टियम्मा यांच्या यशाचं शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केलं. "केरळ राज्य साक्षरता मिशन परीक्षेत कोट्टायम जिल्ह्यातील १०४ वर्षांच्या कुट्टियम्मा यांनी १०० पैकी ८९ गुण प्राप्त केले. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं आहे. मी अत्यंत प्रेम आणि सन्मानानं त्यांचं तसंच शिक्षण घेणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो", असं ट्विट शिक्षणमंत्री वायुदेवन शुवनकुट्टी यांनी केलं आहे. 

कुटियम्मा यांना नीट ऐकू येत नाही. वाढत्या वयामुळे त्यांची श्रवण क्षमता कमी झालेली आहे. पण जेव्हा केरळ राज्य साक्षरता मिशनला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी स्वत:हून पर्यावेक्षकांना जे काही बोलायचं असेल तर मोठ्या आवाजात बोलावं असं सांगितलं होतं. परीक्षा दिल्यानंतर कुट्टियम्मा यांना किती गुण प्राप्त होतील असं विचारलं असता त्यांनी मला काहीच कल्पना नाही. मी तर सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आता गुण देणं परीक्षकांचं काम आहे. कुट्टियम्मा कधीच शाळेत गेलेल्या नाहीत. त्यांना फक्त वाचता येत होतं. पण लिहिता येत नव्हता. राज्याच्या साक्षरता अभियानाअंतर्गत त्या लिहायला शिकल्या आणि परीक्षेत ८९ गुण प्राप्त केले. 

टॅग्स :KeralaकेरळEducationशिक्षण