शहरं
Join us  
Trending Stories
1
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
2
आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 
3
Miss World 2025: कोण आहे मिस वर्ल्ड ओपल सुचाता? १६व्या वर्षी ब्रेस्टमध्ये गाठ सापडली अन्...
4
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष
5
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
6
'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई
7
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल
8
न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
9
अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित
10
मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार
11
अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल
13
लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न
14
जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण
15
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
16
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
17
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
18
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
19
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
20
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर

अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी, पण ऐच्छिक! सीईटी देणाऱ्यांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:34 IST

Education News: दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

मुंबई : दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून १०० गुणांची ही सीईटी दोन तासांच्या कालावधीत घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अकरावीची प्रवेशपरीक्षा राबविताना सामाईक प्रवेशपरीक्षा (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येईल. त्यांचे प्रवेश झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त राहिलेल्या जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. दरम्यान, सीईटी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि ती सर्व मंडळांसाठी असेल असे स्पष्ट करण्यात आले असले तरी सीबीएसई, आयसीएसई, राज्य मंडळाचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्याने सीईटी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये समतोल कसा साधला जाणार? असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला. 

 कनिष्ठ महाविद्यालयांतील रिक्त राहिलेल्या जागांवर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येतील. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र