शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:14 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली.

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. मुंबईतील ६३५ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली. आज पहिल्याच पेपरमध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर होता. यात तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता या सहा मार्कांसाठी बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज इंग्रजी या विषयाचा पहिलाच पेपर होता. पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नांमध्ये घोळ झाल्याचे समोर आले, इंग्रजी पेपरच्या पान नंबर १० वर प्रश्न क्र. ३ वर आणि त्यातील उपप्रश्न A3, A4 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही यात A5 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही, तर A4 मध्ये थेट उत्तरच दिलेले आहे. यामुळे बारावीचे विद्यार्थी संभ्रमात आहेत. याबाबत आता बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. यावरच लवकरच निर्णय घेऊ असं बोर्डाने सांगितले आहे. तीनही प्रश्न ६ गुणांचे आहेत. त्यामुळे आता या प्रश्नावर बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.   

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये म्हणून मंडळाकडून प्रत्येक विभागीय मंडळामध्ये समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय उपलब्ध करून दिल्याचेही बोरसे यांनी सांगितले. मुंबईतील परीक्षकांची संख्या ६७ आहे. शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून सोमवारपर्यंत अर्ज स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षा काळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. याशिवाय मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त दहा मिनिटांच्या सुविधेचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा.

- सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

टॅग्स :Educationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षा