शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:14 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली.

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. मुंबईतील ६३५ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली. आज पहिल्याच पेपरमध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर होता. यात तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता या सहा मार्कांसाठी बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज इंग्रजी या विषयाचा पहिलाच पेपर होता. पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नांमध्ये घोळ झाल्याचे समोर आले, इंग्रजी पेपरच्या पान नंबर १० वर प्रश्न क्र. ३ वर आणि त्यातील उपप्रश्न A3, A4 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही यात A5 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही, तर A4 मध्ये थेट उत्तरच दिलेले आहे. यामुळे बारावीचे विद्यार्थी संभ्रमात आहेत. याबाबत आता बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. यावरच लवकरच निर्णय घेऊ असं बोर्डाने सांगितले आहे. तीनही प्रश्न ६ गुणांचे आहेत. त्यामुळे आता या प्रश्नावर बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.   

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये म्हणून मंडळाकडून प्रत्येक विभागीय मंडळामध्ये समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय उपलब्ध करून दिल्याचेही बोरसे यांनी सांगितले. मुंबईतील परीक्षकांची संख्या ६७ आहे. शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून सोमवारपर्यंत अर्ज स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षा काळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. याशिवाय मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त दहा मिनिटांच्या सुविधेचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा.

- सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

टॅग्स :Educationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षा