शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीला अच्छे दिन येईनात; अभियंते फिरवत आहेत अभ्यासक्रमाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 06:19 IST

भारतात अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल घडवायला हवे आहेत

सीमा महांगडेमुंबई :  गेल्या दशकभरात अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांचे फुटलेले पेव आणि या पार्श्वभूमीवर रिक्त राहणाऱ्या जागा यांवर नियंत्रण आणण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता न देण्याची भूमिका एआयसीटीईने घेतली. तरीही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जुलैपर्यंत देशात एआयसीईटीईची मान्यता असलेल्या अभियंत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या तब्बल १४ लाखांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये देशातील शासकीय अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील १ लाख ७६ हजार ४२८ तर खासगी अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील १२ लाख ४८ हजार १२५ जागांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून देशातील विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी होण्याकडचा कल  कसा कमी होत आहे हे स्पष्ट होत आहे. 

देशाच्या अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शासकीय व खासगी शिक्षण संस्थांमधील प्रवेशाची स्थिती काय आहे? एकूण किती जागा उपलब्ध आहेत आणि किती रिक्त आहेत, यासंबंधीची माहिती जुलै २०२२ मध्ये लोकसभेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. २०२० च्या स्किल इंडिया अहवालानुसार रोजगार निर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात झालेली घट आणि उमेदवारांना असलेली मागणी परस्परविरोधी आहे. सरकारची धोरणे बरोबर आहेत काय? अभियांत्रिकीचे शिक्षण आज नोकरीच्या दृष्टीने योग्य आहे काय? विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये अभ्यासक्रमातून शिकवली जातात का? पदवी-पदविका घेऊनही नोकरी का मिळत नाही? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले असून, या क्षेत्रातील शिक्षण व नोकरी हे समीकरण बिघडले असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

भारतात अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल घडवायला हवे आहेत आणि अभियंत्यांना केवळ त्यांच्या शिक्षणास अनुकूल असे वातावरण प्रदान न करता, या व्यावहारिक, वास्तविक जगाच्या परिस्थितीत या शिक्षणाचा प्रभावी वापर करण्यास सक्षम बनविल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.