शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अभियांत्रिकीला अच्छे दिन येईनात; अभियंते फिरवत आहेत अभ्यासक्रमाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 06:19 IST

भारतात अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल घडवायला हवे आहेत

सीमा महांगडेमुंबई :  गेल्या दशकभरात अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांचे फुटलेले पेव आणि या पार्श्वभूमीवर रिक्त राहणाऱ्या जागा यांवर नियंत्रण आणण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता न देण्याची भूमिका एआयसीटीईने घेतली. तरीही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जुलैपर्यंत देशात एआयसीईटीईची मान्यता असलेल्या अभियंत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या तब्बल १४ लाखांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये देशातील शासकीय अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील १ लाख ७६ हजार ४२८ तर खासगी अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील १२ लाख ४८ हजार १२५ जागांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून देशातील विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी होण्याकडचा कल  कसा कमी होत आहे हे स्पष्ट होत आहे. 

देशाच्या अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शासकीय व खासगी शिक्षण संस्थांमधील प्रवेशाची स्थिती काय आहे? एकूण किती जागा उपलब्ध आहेत आणि किती रिक्त आहेत, यासंबंधीची माहिती जुलै २०२२ मध्ये लोकसभेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. २०२० च्या स्किल इंडिया अहवालानुसार रोजगार निर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात झालेली घट आणि उमेदवारांना असलेली मागणी परस्परविरोधी आहे. सरकारची धोरणे बरोबर आहेत काय? अभियांत्रिकीचे शिक्षण आज नोकरीच्या दृष्टीने योग्य आहे काय? विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये अभ्यासक्रमातून शिकवली जातात का? पदवी-पदविका घेऊनही नोकरी का मिळत नाही? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले असून, या क्षेत्रातील शिक्षण व नोकरी हे समीकरण बिघडले असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

भारतात अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल घडवायला हवे आहेत आणि अभियंत्यांना केवळ त्यांच्या शिक्षणास अनुकूल असे वातावरण प्रदान न करता, या व्यावहारिक, वास्तविक जगाच्या परिस्थितीत या शिक्षणाचा प्रभावी वापर करण्यास सक्षम बनविल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.