शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

२७०० मुलांचे शिक्षण बंद! ‘मिशन झीरो ड्रॉप आऊट’ मध्ये समोर आले भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2022 07:10 IST

कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही शोध मोहीम राज्यातील सर्व भागांत प्रभावीपणे पूर्ण करता आली नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ ते २० जुलैदरम्यान राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडमुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाली. या मुलांचा शोध घेण्यासाठी शासनाच्या सर्व शासकीय विभागांनी एकत्र येऊन राबविलेल्या ‘मिशन झीरो ड्रॉप आउट’ मोहिमेत मुंबई विभागात २,७५७ मुले शाळाबाह्य झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर तसेच रायगड, पालघर, बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे या जिल्ह्यांतील मिळून ३ ते १८ वयोगटातील आतापर्यंत कधीच शाळेत न गेलेली आणि अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ७०० हून अधिक असल्याची परिस्थिती मिशन झीरो ड्रॉप आउट मोहिमेतील समिती सदस्यांनी मांडली आहे. दरम्यान, मिशन झीरो ड्रॉप आउटचे उद्दिष्ट समोर ठेवून या मोहिमेसाठी गठित समितीकडून या सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाच्या २ वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळाबाह्य होण्याची कारणे अनेक असून, अशा स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांचे शिक्षण थांबू नये यासाठी राज्यात मार्च २०२१ मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. 

 बालकामगारांचाही समावेश मिशन झीरो ड्रॉप आउट या मोहिमेत मुंबई विभागात शाळाबाह्य ठरलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये बालकामगार आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.  पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालकामगार असून, मुंबई विभागातील एकूण बालकामगारांची संख्या १२, तर विशेष गरजा असलेल्या मुलांची संख्या ४७ आहे. त्यामुळे अन्य कारणांमुळे शाळाबाह्य झालेले विद्यार्थी २ हजार ६९८ आहेत.

अनियमित उपस्थितीमुळे मुले शाळाबाह्यकोविड काळात अनेक पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे स्थलांतर करावे लागले. त्यामुळे या काळात अनेक मुलांची शाळांतील उपस्थिती अनियमित झाली. परिणामी ही मुले शाळाबाह्य ठरली. मुंबई विभागात अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, या विद्यर्थ्यांची संख्या १ हजार ९०० हून अधिक आहे. पालघर जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक असून, अनियमित असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८१० आहे. यामध्ये शाळेत अनियमित असणाऱ्या मुला-मुलींच्या संख्येत फारसा फरक नसून मुलांची संख्या ९७३, तर मुलींची संख्या ९६६ आहे.८०० हून अधिक मुले कधीच शाळेत नाहीत  मिशन झीरो ड्रॉप आउट मोहिमेत ३ ते १८ वयोगटातील ८०८ मुले ही आतापर्यंत कधीच शाळेत गेली नसल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.  यामध्ये दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबईमधील २०, रायगडमधील ३४, पालघरमधील १९६ मुलांचा समावेश आहे.  मनपातील ११७, तर ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ४०४ मुलांचा समावेशही यामध्ये आहे.  या आकडेवारीनुसार मुंबई विभागातील कधीही शाळेत न गेलेल्या मुलांमध्ये ४२५ मुले आणि ३८३ मुलींचा समावेश आहे. 

कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही शोध मोहीम राज्यातील सर्व भागांत प्रभावीपणे पूर्ण करता आली नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ ते २० जुलैदरम्यान राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली. 

टॅग्स :Schoolशाळा