शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवे शैक्षणिक धोरण कळले का? जूनपासून पॅटर्न बदलणार, महाविद्यालयांची अद्याप तयारी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 14:08 IST

अभियांत्रिकीबरोबरच मेडिकल एज्युकेशनही  मराठीत शिकविले जाणार...

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाची तंतोतंत अंमलबजावणी २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांनी गुणवत्तेचा स्तर वाढवावा. नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांना नोटीस देण्यात आली होती. परंतु, महाविद्यालयांची अद्याप तयारी दिसत नाही आणि पॅटर्नबाबतही साशंकता आहे. 

नव्या शैक्षणिक धोरणात २१ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विद्यापीठांवर धोरण राबविण्याची मोठी जबाबदारी आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी अशा विविध पातळीवर विद्यापीठांचे काम सुरू आहे. अभियांत्रिकीबरोबरच मेडिकल एज्युकेशनही  मराठीत शिकविले जाणार आहे. शैक्षणिक धोरण भविष्यात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. 

काय असणार महाविद्यालयीन शिक्षणात बदल पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांना असेल. याला ‘ऑनर्स पदवी’ असे म्हटलं जाईल. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम कायम राहील. 

मल्टिपल एन्ट्री व एक्झिटपदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण सुरू असताना काही अटींसह विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडून पुन्हा प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सात वर्षांची मुदत दिली जाणार आहे. यापूर्वी ही मुदत सहा वर्षांपर्यंत होती.

विद्यापीठात प्रवेश शक्य एखादा विद्यार्थी विज्ञान शाखेत आहे; पण त्याला जर दुसऱ्या शाखेचा एखादा अभ्यास करायचा असेल तर तो करणे आता शक्य होणार आहे. इतकेच नव्हेतर, ग्रेड सिस्टीममुळे त्या विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेणे शक्य होणार आहे. 

एकसमान क्रेडिट पद्धती आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी अशा विविध पातळीवर विचार होणार आहे. पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.

प्राचार्य वर्तुळातील सूर : शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नवीन  वर्षापासून करण्यात येईल, असे मंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, हे धोरण कशापद्धतीने अंमलात आणणार आहे, त्यासाठी काय पूर्वतयारी करण्यात येणार आली आहे याविषयी सर्व स्तरांवर संभ्रम आणि साशंकतेचे वातावरण आहे. त्यामुळे यंत्रणांनातही गैरसमज आणि गोंधळाची स्थिती दूर करण्यासाठी सुरुवातीला शाळा असो महाविद्यालय यांना हे धोरण अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले पाहिजे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ