शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पुस्तकात कोरी पाने असूनही वह्यांचे ओझे कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:37 IST

पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयाची यंदापासून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी होत आहे. नवीन पुस्तकाच्या रचनेनुसार, इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत;  तसेच प्रत्येक पुस्तकामध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही वह्या लागणार असल्याने दप्तरांचे ओझे कायम राहणार आहे. 

पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना आधी जुन्या पुस्तकांचा साठा संपविण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी वह्या आणाव्यात, यासाठी प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले असून, या पानावर दोन्ही बाजूंना धड्याशी संबंधित नोंदी करता येऊ शकणार आहेत.  

 ही पुस्तके अद्याप विनाअनुदानित/ खासगी शाळांसाठी बाजारात उपलब्ध नाहीत.  खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे मंडळाच्या मूल्यांकन सूत्रांनुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येणार आहेत. 

 पुस्तकातील नोंद होणाऱ्या पानावरील वॉटर मार्कमुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणात अडचणी येणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  या योजनेमुळे पुस्तकाचा पुनर्वापर हे तत्त्व शिक्षण विभागाकडून गुंडाळून ठेवले जाणार असून, पुनर्वापर न झाल्यामुळे दरवर्षी कित्येक टन पुस्तकांची रद्दी निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे.

वह्या विकत घ्याव्याच लागणार

गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी स्वतंत्र वह्या करण्याचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे वहीचे पान पुस्तकामध्ये जोडले असले, तरी संबंधित विषयांच्या वह्या आणाव्या लागणार असल्याचे राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दप्तरातील वह्यांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकातील पानांचा उपयोग होणार नाही; पण प्रत्येक विषयानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   

काही अवघड शब्द, संकल्पना, आकृत्या, काही महत्वाच्या पुस्तकाबाहेरील नोंदी करता येऊ शकतात. त्यामुळे आता या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर हा प्रयोग किती यशस्वी होईल, हे समजेल.  - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक संघ  

टॅग्स :Schoolशाळा