शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पुस्तकात कोरी पाने असूनही वह्यांचे ओझे कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:37 IST

पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयाची यंदापासून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी होत आहे. नवीन पुस्तकाच्या रचनेनुसार, इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत;  तसेच प्रत्येक पुस्तकामध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही वह्या लागणार असल्याने दप्तरांचे ओझे कायम राहणार आहे. 

पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना आधी जुन्या पुस्तकांचा साठा संपविण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी वह्या आणाव्यात, यासाठी प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले असून, या पानावर दोन्ही बाजूंना धड्याशी संबंधित नोंदी करता येऊ शकणार आहेत.  

 ही पुस्तके अद्याप विनाअनुदानित/ खासगी शाळांसाठी बाजारात उपलब्ध नाहीत.  खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे मंडळाच्या मूल्यांकन सूत्रांनुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येणार आहेत. 

 पुस्तकातील नोंद होणाऱ्या पानावरील वॉटर मार्कमुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणात अडचणी येणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  या योजनेमुळे पुस्तकाचा पुनर्वापर हे तत्त्व शिक्षण विभागाकडून गुंडाळून ठेवले जाणार असून, पुनर्वापर न झाल्यामुळे दरवर्षी कित्येक टन पुस्तकांची रद्दी निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे.

वह्या विकत घ्याव्याच लागणार

गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी स्वतंत्र वह्या करण्याचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे वहीचे पान पुस्तकामध्ये जोडले असले, तरी संबंधित विषयांच्या वह्या आणाव्या लागणार असल्याचे राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दप्तरातील वह्यांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकातील पानांचा उपयोग होणार नाही; पण प्रत्येक विषयानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   

काही अवघड शब्द, संकल्पना, आकृत्या, काही महत्वाच्या पुस्तकाबाहेरील नोंदी करता येऊ शकतात. त्यामुळे आता या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर हा प्रयोग किती यशस्वी होईल, हे समजेल.  - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक संघ  

टॅग्स :Schoolशाळा