शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

नोकऱ्यातील कमी होणाऱ्या प्रमाणांमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा ऱ्हास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 01:09 IST

नोकऱ्यातील कमी होणाऱ्या प्रमाणांमुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येतही घट होत आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये ५० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.

डॉ. एस. एस. मंठा

देशातील २३ आयआयटीमध्ये एकूण १२,००० जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असतात. याशिवाय ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत १६,०००, आयआयटीमध्ये १,००० आणि ३०० हून अधिक शासकीय अनुदानित संस्थांकडून २०,००० पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध असतात. याशिवाय देशातील २,००० खासगी महाविद्यालयांकडून यात दोन लाख जागांची भर घालण्यात येते. खासगी विद्यापीठांची या संदर्भातील आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. कारण त्यांच्या जागांचे प्रमाण गरजेनुसार कमी-जास्त होत असते. या जागांसाठी प्रामुख्याने बी.टेक केलेले विद्यार्थी येतात.

नोकऱ्यातील कमी होणाऱ्या प्रमाणांमुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येतही घट होत आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये ५० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिकाम्या राहू नये यासाठी आयआयटीने आपली कट-ऑफ पातळी कमी करून १३,५४२ जागा अंडर ग्रॅज्युएटसाठी मोकळ्या केल्या. ही स्थिती गेल्या पाच वर्षांत प्रथमच उद्भवली आहे. त्यामुळे गुणवत्ता यादी १३,५४२ वरून ३१,००० इतकी झाली आहे. याविषयी तज्ज्ञांनी चिंताही व्यक्त केली आहे. कारण त्यामुळे गुणवत्ता कमी होण्याचा धोका वाढला आहे. आयआयटीमध्ये प्राध्यापक विद्यार्थी यांचे प्रमाण एकास दहा असे असायला हवे. ते सध्या एकास १५ झाले आहे.

सध्या एम.टेक आणि पीएच.डी. करणाºयांना जी.ए.टी. (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) उत्तीर्ण करावी लागते. ही उत्तीर्ण करून पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाºयांना रु. १२,४०० (एम.टेकसाठी) आणि रु.२५,००० (पीएच.डीसाठी) प्रति महिना शिष्यवृत्ती देण्यात येते. दोन वर्षांनंतर ती पीएच.डीसाठी रु.२८,००० करण्यात येते. देशात संशोधनाची मनोभूमिका रुजावी यासाठी हे करण्यात येते. देशातील संशोधनविषयक कार्यक्रमाचे भवितव्य निश्चित करण्यासाठी आयआयटीच्या कौन्सिलने एम.टेकच्या कार्यक्रमाच्या फीमध्ये ९०० टक्के वाढ करून ती वार्षिक दोन लाख रुपये केली आहे. सध्या एम.टेकसाठी प्रतिसत्र रु.५,००० ते १०,००० फी आकारण्यात येते. सरकारी आणि अनुदानित संस्थांमध्ये ती याहून जास्त असते. याशिवाय आयआयटीकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ फीमध्ये दसपट वाढ होणे अपेक्षित असून त्याची गरज आहे का? याच पद्धतीचा अवलंब देशातील अन्य संस्थांकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी संस्थांमधील फीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी या प्रस्तावात गरजू विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून सरकारतर्फे शैक्षणिक कर्ज देण्याबाबत विचार व्हायला हवा. अन्यथा पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरविण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे पदव्युत्तर क्षेत्रात रिकाम्या राहणाºया जागात वाढ होऊ शकते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यातील विद्यार्थ्यांच्या उदासीनतेची आणखीही कारणे आहेत.

अभ्यासक्रमाच्या प्रॅक्टिकल उपयोगाकडे फॅकल्टीजकडून दुर्लक्ष होणे हे एक कारण आहे. अभ्यास शिकविण्याची पद्धती किचकट हे आणखी एक कारण आहे. प्राध्यापकांकडून स्लाइडशोवर अधिक भर दिला जातो, त्याऐवजी त्यांनी पूर्वीप्रमाणे फळ्याकडे वळून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. प्राध्यापक संशोधनाकडे अधिक लक्ष पुरवीत असल्याने त्यांचे शिकवणीकडे दुर्लक्ष होते. वास्तविक अध्यापन आणि संशोधनासाठी पूर्ण वेळ देण्याची गरज आहे. त्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरकही आहेत. त्यातून मार्ग काढावा लागेल.

गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून देऊ नये, याकडे शासनाने लक्ष पुरवले पाहिजे. फी परवडत नाही म्हणून विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहता कामा नये. वाढीव फीमुळे जे शिक्षण घेण्याविषयी गंभीर आहेत तेच अभ्यासक्रमात प्रवेश घेतील, असाही युक्तिवाद करण्यात येतो. त्यासाठी मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाचे उदाहरण देण्यात येते; पण तांत्रिक शिक्षणाने जर रोजगार उपलब्ध होत असेल तरच फी वाढीचे समर्थन होऊ शकेल; पण रोजगार देणाºयांना पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार देऊन नंतर त्यांना प्रशिक्षण देणे अधिक परवडते कारण पदव्युत्तर शिक्षण घेऊन येणाºयांची पगाराची अपेक्षा अधिक असते. प्राध्यापकांच्या संशोधनात सक्तीचा भाग अधिक असतो, त्यामुळे संशोधनामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत नाही.

भारतात कोणतेही मॉडेल यशस्वी झाले की त्याचे अनुकरण करण्यासाठी सारेच प्रयत्न करतात. त्यामुळे त्याचे मूल्य आणि महत्त्व कमी होते. त्याचे परिणाम घातक ठरू शकतात. आयआयटी पद्धतीत केलेले बदल हळूहळू सर्व तºहेच्या अभ्यासक्रमात झिरपतात. त्यातही चांगल्या अभ्यासक्रमांनी त्याचे अनुकरण केले तर ते फायदेशीर ठरू शकते; पण जी पद्धत आयआयटीसाठी उपयुक्त असते ती अन्य अभ्यासक्रमांसाठी उपयोगी पडेलच असे नसते. कारण प्रत्येकाची कामाची स्वतंत्र पद्धत असल्याने मॉडेलही वेगळे असते. ज्या मॉडेलद्वारे गुणवत्ता साध्य होत असते त्यांची वारंवार चाचणी घेऊन त्यांची उपयुक्तता तपासावी लागते. अशा यशस्वी चाचणीनंतर त्या मॉडेलचे अनुकरण करणे योग्य ठरते; पण प्रत्येक अभ्यासक्रमाच्या परिसरातील परिस्थिती इतकी वेगळी असते की त्यातून समान निष्कर्ष निघणे क्वचितच साध्य होते. 

(लेखक कौशल्य विकास प्राधिकरण माजीचेअरमन, एआयसीटीई, सदस्य आहेत)

टॅग्स :Educationशिक्षण