शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्यातील कमी होणाऱ्या प्रमाणांमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा ऱ्हास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 01:09 IST

नोकऱ्यातील कमी होणाऱ्या प्रमाणांमुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येतही घट होत आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये ५० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.

डॉ. एस. एस. मंठा

देशातील २३ आयआयटीमध्ये एकूण १२,००० जागा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असतात. याशिवाय ३१ राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत १६,०००, आयआयटीमध्ये १,००० आणि ३०० हून अधिक शासकीय अनुदानित संस्थांकडून २०,००० पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा उपलब्ध असतात. याशिवाय देशातील २,००० खासगी महाविद्यालयांकडून यात दोन लाख जागांची भर घालण्यात येते. खासगी विद्यापीठांची या संदर्भातील आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. कारण त्यांच्या जागांचे प्रमाण गरजेनुसार कमी-जास्त होत असते. या जागांसाठी प्रामुख्याने बी.टेक केलेले विद्यार्थी येतात.

नोकऱ्यातील कमी होणाऱ्या प्रमाणांमुळे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येतही घट होत आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये ५० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. जागा रिकाम्या राहू नये यासाठी आयआयटीने आपली कट-ऑफ पातळी कमी करून १३,५४२ जागा अंडर ग्रॅज्युएटसाठी मोकळ्या केल्या. ही स्थिती गेल्या पाच वर्षांत प्रथमच उद्भवली आहे. त्यामुळे गुणवत्ता यादी १३,५४२ वरून ३१,००० इतकी झाली आहे. याविषयी तज्ज्ञांनी चिंताही व्यक्त केली आहे. कारण त्यामुळे गुणवत्ता कमी होण्याचा धोका वाढला आहे. आयआयटीमध्ये प्राध्यापक विद्यार्थी यांचे प्रमाण एकास दहा असे असायला हवे. ते सध्या एकास १५ झाले आहे.

सध्या एम.टेक आणि पीएच.डी. करणाºयांना जी.ए.टी. (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट) उत्तीर्ण करावी लागते. ही उत्तीर्ण करून पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाºयांना रु. १२,४०० (एम.टेकसाठी) आणि रु.२५,००० (पीएच.डीसाठी) प्रति महिना शिष्यवृत्ती देण्यात येते. दोन वर्षांनंतर ती पीएच.डीसाठी रु.२८,००० करण्यात येते. देशात संशोधनाची मनोभूमिका रुजावी यासाठी हे करण्यात येते. देशातील संशोधनविषयक कार्यक्रमाचे भवितव्य निश्चित करण्यासाठी आयआयटीच्या कौन्सिलने एम.टेकच्या कार्यक्रमाच्या फीमध्ये ९०० टक्के वाढ करून ती वार्षिक दोन लाख रुपये केली आहे. सध्या एम.टेकसाठी प्रतिसत्र रु.५,००० ते १०,००० फी आकारण्यात येते. सरकारी आणि अनुदानित संस्थांमध्ये ती याहून जास्त असते. याशिवाय आयआयटीकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात येणार आहे. याचा अर्थ फीमध्ये दसपट वाढ होणे अपेक्षित असून त्याची गरज आहे का? याच पद्धतीचा अवलंब देशातील अन्य संस्थांकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी संस्थांमधील फीमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी या प्रस्तावात गरजू विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून सरकारतर्फे शैक्षणिक कर्ज देण्याबाबत विचार व्हायला हवा. अन्यथा पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरविण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे पदव्युत्तर क्षेत्रात रिकाम्या राहणाºया जागात वाढ होऊ शकते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यातील विद्यार्थ्यांच्या उदासीनतेची आणखीही कारणे आहेत.

अभ्यासक्रमाच्या प्रॅक्टिकल उपयोगाकडे फॅकल्टीजकडून दुर्लक्ष होणे हे एक कारण आहे. अभ्यास शिकविण्याची पद्धती किचकट हे आणखी एक कारण आहे. प्राध्यापकांकडून स्लाइडशोवर अधिक भर दिला जातो, त्याऐवजी त्यांनी पूर्वीप्रमाणे फळ्याकडे वळून विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे वळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. प्राध्यापक संशोधनाकडे अधिक लक्ष पुरवीत असल्याने त्यांचे शिकवणीकडे दुर्लक्ष होते. वास्तविक अध्यापन आणि संशोधनासाठी पूर्ण वेळ देण्याची गरज आहे. त्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरकही आहेत. त्यातून मार्ग काढावा लागेल.

गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून देऊ नये, याकडे शासनाने लक्ष पुरवले पाहिजे. फी परवडत नाही म्हणून विद्यार्थी शिक्षण घेण्यापासून वंचित राहता कामा नये. वाढीव फीमुळे जे शिक्षण घेण्याविषयी गंभीर आहेत तेच अभ्यासक्रमात प्रवेश घेतील, असाही युक्तिवाद करण्यात येतो. त्यासाठी मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाचे उदाहरण देण्यात येते; पण तांत्रिक शिक्षणाने जर रोजगार उपलब्ध होत असेल तरच फी वाढीचे समर्थन होऊ शकेल; पण रोजगार देणाºयांना पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार देऊन नंतर त्यांना प्रशिक्षण देणे अधिक परवडते कारण पदव्युत्तर शिक्षण घेऊन येणाºयांची पगाराची अपेक्षा अधिक असते. प्राध्यापकांच्या संशोधनात सक्तीचा भाग अधिक असतो, त्यामुळे संशोधनामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत नाही.

भारतात कोणतेही मॉडेल यशस्वी झाले की त्याचे अनुकरण करण्यासाठी सारेच प्रयत्न करतात. त्यामुळे त्याचे मूल्य आणि महत्त्व कमी होते. त्याचे परिणाम घातक ठरू शकतात. आयआयटी पद्धतीत केलेले बदल हळूहळू सर्व तºहेच्या अभ्यासक्रमात झिरपतात. त्यातही चांगल्या अभ्यासक्रमांनी त्याचे अनुकरण केले तर ते फायदेशीर ठरू शकते; पण जी पद्धत आयआयटीसाठी उपयुक्त असते ती अन्य अभ्यासक्रमांसाठी उपयोगी पडेलच असे नसते. कारण प्रत्येकाची कामाची स्वतंत्र पद्धत असल्याने मॉडेलही वेगळे असते. ज्या मॉडेलद्वारे गुणवत्ता साध्य होत असते त्यांची वारंवार चाचणी घेऊन त्यांची उपयुक्तता तपासावी लागते. अशा यशस्वी चाचणीनंतर त्या मॉडेलचे अनुकरण करणे योग्य ठरते; पण प्रत्येक अभ्यासक्रमाच्या परिसरातील परिस्थिती इतकी वेगळी असते की त्यातून समान निष्कर्ष निघणे क्वचितच साध्य होते. 

(लेखक कौशल्य विकास प्राधिकरण माजीचेअरमन, एआयसीटीई, सदस्य आहेत)

टॅग्स :Educationशिक्षण